शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

जत तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी चार दिवसात

By admin | Updated: March 8, 2016 00:49 IST

विलासराव जगताप : शेगावमध्ये संयुक्त बैठक; शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेण्यासाठी पर्यायी कार्यालय सुरू करणार

जत/शेगाव : म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्यातून येत्या चार ते पाच दिवसांत जत तालुक्याच्या शिवारात पाणी येणार आहे. कुची (ता. कवठेमहांकाळ) ऐवजी जत येथेच शेतकऱ्यांकडून पैसे भरुन घेण्यासाठी पर्यायी कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.शेगाव येथे म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, म्हैसाळ योजनेचे पदाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त बैठकीत आ. जगताप बोलत होते. शेगाव येथे ‘म्हैसाळ’च्या पाण्यासंदर्भात लाभक्षेत्रातील शेगाव, वाळेखिंडी, कुंभारी, कोसारी, रेवनाळ, तिप्पेहळ्ळी, बनाळी, वायफळ, अंतराळ, काशिलिंगवाडी, बागलवाडी, कंठी, डोर्ली, बाज आदी वीस गावांतील शेतकरी उपस्थित होते. जि. प. सदस्य सुरेश मुटेकर, जि. प. सदस्य संजीवकुमार सावंत, लक्ष्मण बोराडे, तहसीलदार अभिजित पाटील, म्हैसाळ योजनेचे अधिकारी सचिन पवार उपस्थित होते.यावेळी आ. जगताप यांनी १५ गावांतील लाभक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांच्या पाण्यासंदर्भात अडचणी जाणून घेतल्या. पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी लगेच मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्या शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ, सांगली कारखान्यांना ऊस घातला आहे, अशा शेतकऱ्यांनी थकबाकी ऊस बिलातून वळती केली असल्यास तशी कारखान्याकडून पोहोच घ्यावी. त्या शेतकऱ्यांनी सध्या थकबाकी भरण्याची आवश्यकता नाही. ‘म्हैसाळ’चे पाणी हे तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे नवीन बागायत क्षेत्र न वाढवता उपलब्ध बागा, पिके जगविणे महत्त्वाचे आहे, असेही आ. जगताप यांनी सांगितले.यावेळी काही शेतकऱ्यांनी जतच्या राजारामबापू साखर कारखान्याच्या युनिट क्र. ४ ने म्हैसाळ योजनेची थकबाकी का भरली नाही?, असा सवाल करत हा कारखाना म्हैसाळ योजनेचे पाणी वापरतो, मग त्यांनीही बिलाच्या थकबाकीची रक्कम भरावी. बिल न भरल्यास तहसीलदारांनी उपसाबंदी आदेश लागू करावा, असे सांगितले. यावर म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी, जत साखर कारखान्याला पाणी पुरवठा करणारी योजना सांगली एमआयडीसीच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. त्यामुळे म्हैसाळ कार्यालयाकडून त्यांना पाणीपट्टी भरण्याविषयी पत्र देण्यात आले.यावेळी १५ गावांतील शेतकऱ्यांनी वाढीव वीज बिल भरण्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी नारायण सावंत, सरपंच एन. डी. शिंदे, सतीश बुवा, गणेश साबळे, महादेव पाटील, राजू चौगुले, धनंजय नरके, डॉ. सुभाष खिलारे, सचिन बोराडे, उपेंद्र रानडे उपस्थित होते. (वार्ताहर)शेतकऱ्यांनी थकबाकी भरून सहकार्य करावेम्हैसाळ योजनेचे पाणी शेतीसाठी जे वापरतात, त्यांनी थकबाकी भरणे आवश्यक आहे. सध्या कवठेमहांकाळ, मिरज या भागातील शेतकऱ्यांनी व कारखान्यांनी थकबाकी भरल्याने त्यांचे पाणी सुरू आहे. मात्र जतमधील शेतकऱ्यांनी मागणी अर्ज व थकबाकी भरल्याशिवाय पाणी मिळणे अवघड होणार आहे. आम्हाला शासनाकडे पाण्यासाठी विचारणा करावयाची झाल्यास, तुमच्याकडून एकही पाणी मागणी अर्ज आला नाही व पैसे भरले नाहीत, असे उत्तर मिळते. त्यामध्ये प्रथम ‘म्हैसाळ’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज देऊन थकबाकी भरावी. त्यानंतर ५ ते ६ दिवसांत पाणी जत तालुक्यात दाखल होईल, असे प्रतिपादन आ. विलासराव जगताप यांनी शेगाव (ता. जत) येथे केले.वीस गावांतील शेतकरी उपस्थितकुंभारी, कोसारी, धावडवाडी, सिंगनहळ्ळी, शेगाव, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, रेवनाळ, डोर्ली, अंकले, बेळुंखी, वाळेखिंडी आदी वीस गावांतील लाभार्थी या बैठकीसाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त थकबाकी जमा करावी, असेही आवाहन आ. जगताप यांनी केले. तसेच थकबाकी जमा झाली नाही, तर पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.