शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जत’ला २५ लाख भरल्यानंतरच पाणी पाटबंधारे

By admin | Updated: March 2, 2016 00:49 IST

विभागाचा निर्णय : म्हैसाळ पाणी योजनेकडे लक्ष; पुलाची कामे सुरू

भागवत काटकर--शेगाव म्हैसाळ योजनेचे पाणी कवठेमहांकाळच्या शिवारात पोहोचले आहे. जत तालुक्यालाही म्हैसाळ योजनेचे पाणी कधी येणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र जुनी थकबाकी ५० लाख रुपये असून त्यापैकी २५ लाख रुपये भरले, तर जतला पाणी देऊ, असा पवित्रा पाटबंधारे विभागाने घेतला आहे. योजना पूर्ण झालेल्या ठिकाणापर्यंतच हे पाणी येणार आहे. अर्थातच या पाण्याचा उपयोग जत पश्चिम व उत्तर भागातील १८ गावांना होणार आहे. मात्र सध्या या मुख्य कालव्यातील सीडी वर्क (पुलाची कामे) सुरु आहेत. त्यामुळे काही गावांना पाणी जाणार नाही. सध्या तालुक्यात भीषण दुष्काळ पडला असून ६४ टँकरने ४९ गावे व ४१९ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरु आहे. दरम्यान, शेगाव येथील शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. म्हैसाळ योजनेच्या लाभक्षेत्रातील १८ गावांतील तलाव भरल्यास या भागातील दुष्काळाची तीव्रता कमी होणार आहे. जनावरांना चारा व पाण्याची व्यवस्था होणार आहे. डोर्ली, अंकले, कंठी, हिवरे, गुळवंची, धावडवाडी, प्रतापपूर, बिरनाळ, तिप्पेहळ्ळी, कुंभारी, कोसारी, रेवनाळ, शेगाव, वाळेखिंडी, अचकनहळ्ळी, बनाळी व जत या गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे. यापैकी काही गावांतील तलावावर ग्रामपंचायतीच्या पाणी योजना अवलंबून आहेत. या पाण्याचा वापर सध्या पिण्यासाठी होत आहे. सध्या जतला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावातून उमराणी, बिळूर, बसर्गी, खोजनवाडी, देवनाळ, मेंढेगिरी या गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ही थकबाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतींनी हातभार लावावा, अशी मागणी होत आहे. शेतकरी व ग्रामपंचायतींच्या योगदानातून थकबाकीतील २५ लाख रुपये जमा करण्याचेही मोठे आव्हान आहे. त्यासाठी १८ गावांतील लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी रेवनाळपासून पुढे जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. शिवाय तिप्पेहळ्ळी तलावात सुद्धा पाणी सरकणे मुश्कील होणार आहे. कारण या दोन्ही ठिकाणी कालव्यातील पुलाची कामे सुरु आहेत. यापैकी जत-कऱ्हाड व जत-शेगाव या ठिकाणची कामे गतीने सुरु आहेत. या सीडी वर्क पुलाच्या कामामुळे पाणी येण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. याचाही विचार लोकप्रतिनिधींनी करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. ही कामे पूर्ण होण्यास किमान १ ते दीड महिना लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी आल्यास तिप्पेहळ्ळी, रेवनाळ, शेगाव, अचकनहळ्ळी, बनाळी ही गावे वंचित राहणार आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्यातही सोडण्यात येणार आहे. सांगोल्याचे आ. गणपतराव देशमुख यांनी ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. सांगोला तालुक्याला पाणी हे जत तालुक्याच्या मुख्य कालव्यातून जाते. तालुक्यातील लाभक्षेत्रातील ‘म्हैसाळ’ची थकबाकी ८२ लाख रुपये आहे. ही थकबाकी भरण्याची तयारी आ. देशमुखांनी दर्शविली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनीही या पाण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ५० लाखांसाठी अडवणूक कशासाठी? म्हैसाळ योजनेची जत तालुक्याची थकबाकी केवळ ५० लाख रुपये असताना, शेतकऱ्यांची अडवणूक कशासाठी? २५ लाख भरल्यास पाणी सोडण्याची पाटबंधारे विभागाची हमी तालुक्यातील मुख्य कालव्याची सीडी वर्कची कामे सुरु सांगोला (जि. सोलापूर) तालुक्यासही पाणी जत तालुक्यातून जाणार ग्रामपंचायतीच्या पाणी योजना सिंचन तलावावर, त्यांनीही थकबाकी भरावी जत व सांगोल्याच्या लोकप्रतिनिधींनी योजनेसाठी बैठक घेण्याची मागणी