शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जत पश्चिममधील विहिरींनी गाठला तळ

By admin | Updated: November 17, 2014 23:23 IST

कूपनलिका वाढल्या : विहीर असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

डफळापूर : जत पश्चिम भागात सतत दुष्काळाशी सामना करीत शेतकऱ्यांनी पाण्याच्या शोधात मोठ्या संख्येने कूपनलिका खोदल्या असल्याने, शेकडो विहिरींतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरी मोठ्या प्रमाणात कोरड्या पडल्यामुळे त्या असून अडचण नसून खोळंबा बनल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.सतत दुष्काळ पडत गेल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्याचा उद्देश डोळ्यासभोर ठेवून पाण्याच्या शोधात गेली वीस ते पंचवीस वर्षे झाली. कूपनलिका खोदण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर विजेची मागणीही वाढली. विजेच्या मोटारी आल्याने विहिरीवर मोट टाकणे शेतकऱ्यांनी बंद केले. विहिरीत व कूपनलिकेमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केल्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत गेला. मोठ्या प्रमाणात कूपनलिका खोदल्या गेल्याने जमिनीची अक्षरश: चाळण झाली. ठिबक सिंचनचा म्हणावा तसा वापर न केल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडून वाया गेल्याने भूगर्भातील पाणीसाठा रिकामा होत गेला. पाण्याच्या शोधात शेतकऱ्यांनी चढाओढीने ५०० ते हजार, बाराशे फूट कूपनलिका खोदल्या. साठ ते सत्तर फूट खोल असणाऱ्या विहिरीतील पाण्याने तळ गाठला. विहिरी उपयोगाच्या ठरत नसल्याने विहिरी खोदण्याचे प्रमाण कमी झाले व कूपनलिका खोदणे शेतकऱ्यांनी पसंत केले. यापूर्वी विहिरी असणे, पाणी टिकून राहणे हे शेतकऱ्यांना विश्वासाचे वाटत असे. परंतु आता कूपनलिका खोदली असता, पाणी जरी मोठ्या प्रमाणात लागले तरी, हे पाणी टिकून राहील यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. खोदलेल्या कूपनलिकांपैकी ८० टक्के कूपनलिका पाण्याअभावी निकामी झाल्या आहेत. कूपनलिका वाढत गेल्या, त्या प्रमाणात पाणाड्या व्यक्तींचेही प्रमाण वाढत गेले. पाणाड्यावर विश्वास ठेवून त्यांना मोबदला देऊन शेतकरी कूपनलिका खोदत आहेत. पण अंधश्रध्देपोटी पाणी न लागल्यामुळे हजारो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. कूपनलिकांमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्यामुळे पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली आहे. पाण्याच्या शोधात जास्तीत जास्त खोलीवरून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली असली तरी, शेतकऱ्यांनी हातच्या विहिरी निरुपयोगी करून ठेवल्या, ही शोकांतिका म्हणावी लागेल. (वार्ताहर)शेतकऱ्यांची पिळवणूकपाणाड्यावर विश्वास ठेवून त्यांना मोबदला देऊन शेतकरी कूपनलिका खोदत आहेत. पण अंधश्रध्देपोटी पाणी न लागल्यामुळे हजारो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. कूपनलिकांमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्यामुळे पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे.