शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जत पश्चिममधील विहिरींनी गाठला तळ

By admin | Updated: November 17, 2014 23:23 IST

कूपनलिका वाढल्या : विहीर असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

डफळापूर : जत पश्चिम भागात सतत दुष्काळाशी सामना करीत शेतकऱ्यांनी पाण्याच्या शोधात मोठ्या संख्येने कूपनलिका खोदल्या असल्याने, शेकडो विहिरींतील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरी मोठ्या प्रमाणात कोरड्या पडल्यामुळे त्या असून अडचण नसून खोळंबा बनल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.सतत दुष्काळ पडत गेल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करण्याचा उद्देश डोळ्यासभोर ठेवून पाण्याच्या शोधात गेली वीस ते पंचवीस वर्षे झाली. कूपनलिका खोदण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर विजेची मागणीही वाढली. विजेच्या मोटारी आल्याने विहिरीवर मोट टाकणे शेतकऱ्यांनी बंद केले. विहिरीत व कूपनलिकेमधून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केल्यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत गेला. मोठ्या प्रमाणात कूपनलिका खोदल्या गेल्याने जमिनीची अक्षरश: चाळण झाली. ठिबक सिंचनचा म्हणावा तसा वापर न केल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडून वाया गेल्याने भूगर्भातील पाणीसाठा रिकामा होत गेला. पाण्याच्या शोधात शेतकऱ्यांनी चढाओढीने ५०० ते हजार, बाराशे फूट कूपनलिका खोदल्या. साठ ते सत्तर फूट खोल असणाऱ्या विहिरीतील पाण्याने तळ गाठला. विहिरी उपयोगाच्या ठरत नसल्याने विहिरी खोदण्याचे प्रमाण कमी झाले व कूपनलिका खोदणे शेतकऱ्यांनी पसंत केले. यापूर्वी विहिरी असणे, पाणी टिकून राहणे हे शेतकऱ्यांना विश्वासाचे वाटत असे. परंतु आता कूपनलिका खोदली असता, पाणी जरी मोठ्या प्रमाणात लागले तरी, हे पाणी टिकून राहील यावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. खोदलेल्या कूपनलिकांपैकी ८० टक्के कूपनलिका पाण्याअभावी निकामी झाल्या आहेत. कूपनलिका वाढत गेल्या, त्या प्रमाणात पाणाड्या व्यक्तींचेही प्रमाण वाढत गेले. पाणाड्यावर विश्वास ठेवून त्यांना मोबदला देऊन शेतकरी कूपनलिका खोदत आहेत. पण अंधश्रध्देपोटी पाणी न लागल्यामुळे हजारो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. कूपनलिकांमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्यामुळे पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली आहे. पाण्याच्या शोधात जास्तीत जास्त खोलीवरून पाणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागली असली तरी, शेतकऱ्यांनी हातच्या विहिरी निरुपयोगी करून ठेवल्या, ही शोकांतिका म्हणावी लागेल. (वार्ताहर)शेतकऱ्यांची पिळवणूकपाणाड्यावर विश्वास ठेवून त्यांना मोबदला देऊन शेतकरी कूपनलिका खोदत आहेत. पण अंधश्रध्देपोटी पाणी न लागल्यामुळे हजारो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे. कूपनलिकांमुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्यामुळे पाण्याअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. कूपनलिका खोदणाऱ्यांनी मनमानी दर लावून शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे.