शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

जातीअंतासाठी जनशक्तीचा लढा

By admin | Updated: August 29, 2016 23:14 IST

भारत पाटणकर : मराठा समाजाची नेत्यांकडून फसवणूकच

सांगली : केवळ तक्रारी करून अथवा न्यायालयात दाद मागून जातीअंताची लढाई पूर्ण होणार नाही. त्यासाठी आता लोकाभिमुख लढा उभारण्याची वेळ आली आहे. कोणाचीही वाकडी नजर पडणार नाही किंवा अत्याचार करण्यापूर्वी तो शंभरवेळा विचार करेल, अशी जरब निर्माण करण्याकरिता जातीअंताच्या लढ्यासाठी जनशक्तीचा आधार घेऊन राज्यभर लढा उभारणार असल्याचे सांगून मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून समाजाची फसवणूकच सुरू असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी सोमवारी सांगलीत केले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जाती मुक्ती आंदोलनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक अत्याचारविरोध लढा परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचे आणि त्यातील अटी रद्द करण्याचे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना आता आठवले आहे. कोपर्डी प्रकरणानंतरच त्यांना का आठवले? असा सवाल करीत पाटणकर म्हणाले की, महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, आंतरजातीय विवाहितांना कायद्याचे संरक्षण मिळावे, जातीअंत करण्यासाठी त्यांनी लढा उभारणे अपेक्षित होते. त्यांनी अशी सर्वसमावेशक भूमिका घेतली असती, तर त्याचे स्वागतच झाले असते. मराठा समाजात ८० टक्क्यांहून अधिक समाज गरिबीत असून. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, आरक्षणाच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांनी आपल्या हिताला प्राधान्य दिल्याने, समाजाची फसवणूक सुरू आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले की, आता पोलिसांकडूनच समाजाला संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. ही स्थिती भयावह असून याला जोरदार लढा द्यायला हवा. जातीयवादी मानसिकतेविरोधात लढा उभारण्याची वेळ आली असून, जातीअंतासाठी आता लढ्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, उमेश देशमुख, गौतम लोटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)अत्याचाराचा वाचला पाढासामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जाती मुक्ती आंदोलनाच्यावतीने आयोजित लढा परिषदेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी यात भाग घेत आपले म्हणणे मांडले. यावेळी जिल्ह्यातील अनेकांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. अत्याचार करणाऱ्यांविरोधात तक्रार देण्यास पोलिसात गेल्यास त्याकडे दुर्लक्ष झाल्याचीही कैफियत त्यांनी मांडली. अत्याचार होऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घालणारे पोलिस व यंत्रणेवर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली.