शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

खानापूर येथे उद्या जनसंकल्प बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र प्राधान्याने खानापूर येथेच व्हावे या मागणीला गती देण्यासाठी खानापूर येथे उद्या, शनिवारी खानापूर घाटमाथा ...

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र प्राधान्याने खानापूर येथेच व्हावे या मागणीला गती देण्यासाठी खानापूर येथे उद्या, शनिवारी खानापूर घाटमाथा व परिसरातील लोकांसाठी जनसंकल्प बैठकीचे आयोजन केल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस गोपीनाथ सूर्यवंशी यांनी दिली.

ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्याबाबत समिती नियुक्त केली होती. या समितीने खानापूर येथे जागेची पाहणी केली. त्यावेळी पाच ते सहा तालुक्यांचा हा मध्यवर्ती तालुका आहे व उपकेंद्रासाठी लागणारे सर्व निकष (महामार्ग, जमीन, पाझर तलाव पाणी) हे सर्व खानापूर येथे उपलब्ध असल्याने उपकेंद्र खानापूर येथेच उपकेंद्र होण्यास अनुकूलता दर्शविली होती.

परंतु, कालांतराने उपकेंद्राची मागणी मागे पडली व त्यात काही राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करून खानापूर येथे होणारे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगाव किंवा सांगली येथे होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे खानापूरकरांवर अन्याय होत आहे. परिणामी, उपकेंद्र खानापूर येथेच होण्यासाठी घाटमाथ्यावर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी खानापूर येथे शनिवारी दुपारी चार वाजता जनसंकल्प बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व बळवंत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जी. एन. मुळीक मार्गदर्शन करणार असल्याचे गोपीनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.