शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

जनता जनार्दन हो, आता तुम्हीच सांगा, ठराव झाला की नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:26 IST

सांगली : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना शासनाकडे परत पाठविण्याच्या मागणीसह सदस्यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत ...

सांगली : जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांना शासनाकडे परत पाठविण्याच्या मागणीसह सदस्यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दोन तास सभागृह डोक्यावर घेतले. कोट्यवधींच्या विकासकामांचे ठराव मागे ठेवून एका अधिकाऱ्याच्या उचलबांगडीचा विषय लाऊन धरला, पण ज्या ठरावावरून रणकंदन माजले, तो खरोखरच झाला होता की नाही, यावर धुक्याचा पडदा कायम राहिला.

२६ ऑक्टोबरच्या सभेत सदस्यांच्या शिफारशीशिवाय कामे देऊ नयेत असा ठराव सदस्यांनी केल्याचा प्रशासनाचा ठपका आहे. बेकायदेशीर ठरावामुळे जिल्हा परिषद बरखास्तीचा प्रस्तावही गुडेवार यांनी पाठविला होता, पण ठराव झालाच नाही, असा सदस्यांचा घोषा आहे. पुराव्यासाठी सभेचे ध्वनीमुद्रणही वाजविले, पण सुस्पष्ट नसल्याने नेमका खुलासा झाला नाही.

सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी ठराव झाल्याचे ठामपणे सांगितले. तसे इतिवृत्त अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी मान्य करूनच स्वाक्षरी केल्याचे स्पष्ट केले. सतीश पवार यांनी फक्त चर्चा झाल्याचे सांगत चर्चा म्हणजे ठराव नव्हे, असा आक्षेप घेतला. सुहास बाबर म्हणाले, ठराव अपेक्षित होता, पण झाला नाही. अध्यक्षा कोरे यांनी नरो वा कुंजरो वा ची भूमिका घेतली. ठराव झाल्यास बेकायदेशीर आहे, करता येणार नाही असे अधिकाऱ्यानी निदर्शनास आणून द्यायला हवे होते, असा दावा केला. सही झाली असली तरी ठराव झालाच नाही, असे सांगितले. ज्येष्ठ सदस्य डी. के. पाटील यांनीही अध्यक्षांना कामकाजाची माहिती व्हायला अद्याप वेळ लागेल असे पांघरूण घातले. प्रमोद शेेंडगे यांनी मी विरोध केला असतानाही ठराव झाला कसा, अशी विचारणा केली. ठराव अनवधानाने लिहिला गेल्याचीही पुष्टी जोडली. सुषमा नायकवडी यांनी विश्वासात न घेता ठराव झालाच कसा, असा प्रश्न विचारला.

गुडेवार यांनी ठराव झाल्याचे ठामपणे सांगत त्यामुळेच बरखास्तीचा प्रस्ताव पाठविल्याचा दावा केला. आता या सर्व गोंधळात जनता जनार्दन हो, तुम्हीच सांगा, ठराव झाला होता की नाही? असे म्हणावे लागत आहे.

------------