शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महापौरांच्या जनता दरबारात कौटुंबिक वादांचीही भर

By admin | Updated: January 7, 2015 00:06 IST

एकूण ४१ तक्रारी : तत्काळ तक्रार निवारणाच्या तृप्ती माळवी यांच्या सूचना

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांनी सुरू केलेल्या चौथ्या महापौर जनता दरबारात आज, मंगळवारी तब्बल ४१ नागरिकांनी तक्रारी केल्या. दरबारात कौटुंबिक वादाबरोबरच वैयक्तिक स्वरूपाच्या आलेल्या तक्रारींबाबत उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. न्यायालयीन वादवगळता महापालिकेशी संबंधित सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचे आदेश महापौरांनी दिले. नागरिकांनी गेल्या चार महिन्यांत तब्बल तीनशेहून अधिक तक्रारींद्वारे गाऱ्हाणी मांडली. महापालिका निवडणूक जवळ आल्याने प्रभागातील तक्रारी घेऊन आलेल्या इच्छुकांनी दरबारात गर्दी केली होती.अधिकारी व प्रशासन कामच करत नाही, अधिकारी भेटत नाहीत, भेटले तरी उद्धट उत्तरे मिळतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. नागरिकांच्या प्रश्नांवर बऱ्याचवेळा अधिकाऱ्यांना निरूत्तर होण्याची वेळ आली. महापालिका प्रशासन नागरिकांच्या सर्वाधिक २२ तक्रारी या बांधकाम विभागाशी संबंधित होत्या. त्यानंतर घरफाळा विभाग (५), आरोग्य (४), परवाना (१), विद्युत (३), उद्यान (२), पाणीपुरवठा (७), नगररचना (५), कामगार विभाग (५), उद्यान व शिक्षण विभागाशी संबंधित प्रत्येकी एक तक्रार दरबारात आली. महापौर दरबारासाठी सर्व विभागांचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी प्रश्न व तक्रार उपस्थित केल्यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यास उत्तर देण्यास पाचारण करण्यात येत होते. सर्व तक्रारींचे येत्या पंधरा दिवसांत निराकरण करण्याचे आदेश महापौरांनी दिले. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, नगरसेवक राजेश लाटकर, प्रदीप उलपे, वैशाली डकरे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे व अश्विनी वाघमळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)+पायाभूत सुविधा द्याकदमवाडी-पाटोळेवाडीत गौरीनंदन पार्क येथे महापालिकेने गेल्या २० वर्षांत पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. रस्ते, गटारी, सांडपाणी नियोजन, कचऱ्याचा उठाव, आदींपासून येथील परिसर वंचित आहे. या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी महापौर दरबारात केली. याबाबतचे महापालिका आयुक्त बिदरी यांनाही नागरिकांनी निवेदन दिले.