शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका पटावर जामदारांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2016 23:39 IST

काँग्रेसच्या गटबाजीत अस्तित्वाची लढाई : कुरघोडीला लगाम घालण्याचे आव्हान

शीतल पाटील -- सांगली महापालिकेच्या राजकीय पटावरील वजीर म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांची सध्या मोठी कोंडी झाली आहे. पालिकेतील गटबाजीने डोके वर काढले असून, एकाचवेळी तीन गटांना सांभाळून काम करण्याची करसत त्यांना करावी लागत आहे. त्यात ते नेमके कुणाच्या गटाचे? याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिली पाच वर्षे शहराच्या राजकारणावर सांगलीकरांचे वर्चस्व राहिले. पालिकेचे नेतृत्व माजी मंत्री मदन पाटील यांच्याकडे असल्याने त्यांच्या निर्णयाला आव्हान देण्याची हिंमत कोणातच नव्हती. मदनभाऊ समर्थक नगरसेवकांना महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती अशा महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. किशोर जामदार हे मदनभाऊंचे सहकारी. मिरजेत त्यांचा चांगला वट होता. मिरजेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते. २००५ नंतर पालिकेच्या राजकारणात जामदारांचा खऱ्याअर्थाने उदय झाला. केवळ सहा महिन्यांसाठी मिळालेल्या महापौरपदावर त्यांनी तब्बल तीन वर्षे अधिराज्य केले. विरोधक मग, तो पक्षातील असो अथवा विरोधी पक्षातील, त्याला नामोहरण करण्याची कला त्यांच्याकडे होती. जामदारांनी महापौरपदाच्या काळातच पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चित करीत एकतर्फी सत्तेचा लाभ घेतला. त्यातून बीओटी, ऐनवेळी घुसडलेले ठराव, आरक्षित जागा उठविण्याचा घाट यावरून त्यांच्या कारभारावर प्रचंड टीका झाली. विरोधी पक्षातील काही महत्त्वाकांक्षी नगरसेवकांना सोबत घेतल्याने त्यांना पदावरून हटविणेही पक्षनेतृत्वाला अडचणीचे झाले होते. परिणामी पहिल्यांदाच २००८ मध्ये महापालिका निवडणुकीत मदनभाऊ गटाला पराभवाचा धक्का बसला.२०१३ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेसने बाजी मारली. पालिकेतील काँग्रेसमध्ये सर्वात ज्येष्ठ व अनुभवी असलेल्या किशोर जामदार यांच्याकडे गटनेते पदाची सूत्रे आली. पहिल्या दोन महिन्यातच स्वीकृत नगरसेवकांवरून काँग्रेसमध्ये वाद उफाळला. जामदारांनीच नावे घुसडल्याचा आरोप झाला. त्यांना पदावरून दूर करण्याची मागणीही झाली. शेवटी हे वादळ शांत झाले. कांचन कांबळे यांच्या महापौरपदाच्या काळात जामदारांचेच सभागृहात वर्चस्व होते. विवेक कांबळे यांच्या काळात मात्र त्याला शह बसला. त्यातून सत्ताधाऱ्यांत दुफळी निर्माण झाली. याच काळात मदनभाऊंचे निधन झाल्याने सत्ताधारी गटाला सर्वात मोठा धक्का बसला. सध्या पालिकेत मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीताई पाटील, पतंगराव कदम व विशाल पाटील असे तीन गट कार्यरत आहेत. या तीनही गटात एकमेकांवर कुरघोड्याचे राजकारण रंगले आहे. एकमेकांचा काटा काढण्याचा डाव आखला जात आहे. महासभा, स्थायी समितीतील ठरावावरून उणीदुणी काढण्याचे काम जोमाने सुरू आहे. सत्ताधाऱ्यांतील संघर्षाने परमोच्च बिंंदू गाठला आहे. विविध पदांवर सर्वच गटांकडून हक्क सांगितला जात आहे. या संघर्षात गटनेतेपदाला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. स्थायी समिती सदस्य निवडीपासून ते पक्षाचा व्हिप काढण्यापर्यंतचे अधिकार जामदारांकडे आहेत. कोणत्या नेत्याचे आदेश मानायचे, कोणत्या गटाला प्राधान्य द्यायचे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पालिकेच्या राजकारणात जामदार चाणाक्ष आहेत. आतापर्यंत त्यांनी नेत्यांपासून नगरसेवकांपर्यंत साऱ्यांनाच झुलवले आहे. त्यांचा अंदाज अजूनही कुणाला आलेला नाही. चाणक्य नितीने राजकारण करणाऱ्या किशोर जामदारांना आता मात्र असित्वाची लढाई खेळावी लागेल. कधीकाळी त्यांच्या गटाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट करून त्यांना आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर जामदारांचा वट काहीसा कमी झाल्याचे दिसते. आजही ते सर्व गटाशी जवळीक साधून आहेत. त्यांची खरी कसोटी पुढील अडीच वर्षात लागणार आहे. प्रभाग सभापती, स्थायी समिती सदस्य व सभापती निवड, दहा महिन्यानंतर होणाऱ्या महापौर व उपमहापौर निवडीत जामदारांची खऱ्या अर्थाने कसोटी लागेल. तेव्हा ते कोणत्या गटाचे हेही सिद्ध होईल. किशोरदादा : सांगा कुणाचे?किशोर जामदार हे नेमके कुणाचे? याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. जामदार हे मदनभाऊ समर्थक मानले जातात. त्यांची पतंगराव कदम यांच्याशीही जवळीक आहे. कदम गटाचे नगरसेवकही जामदार आमचेच आहेत, असे म्हणतात. आता त्यात विशाल पाटील गटाची भर पडली आहे. वसंतदादा कारखान्याचे ते संचालक असल्याने विशाल पाटील गटही दादा आमचे नेते आहेत, असे जाहीरपणे सांगत आहेत.