शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह, आरटीओ कार्यालय कवलापूरलाच...

By admin | Updated: August 5, 2016 02:01 IST

स्थलांतरावर शिक्कामोर्तब : विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य शासनाकडे; निधी मिळण्याचे संकेत

सचिन लाड-- सांगली --जिल्हा मध्यवर्ती कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालये कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर स्थलांतर करण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवालही मागवून घेतला आहे. येत्या काही महिन्यात शासकीय कार्यालयांना जागेचे वाटप करून इमारत बांधकामास निधी मिळण्याचे संकेत आहेत. कवलापूर येथे नियोजित विमानतळाची दीडशे एकर जागा आहे. याठिकाणी विमानतळ करण्याचा राज्य शासनाने दोनवेळा निर्णय घेतला. दोनवेळा उद्घाटनही केले; पण शेती जाणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. अगदी हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यानंतर शासनाने नमते घेत विमानतळ करण्याचा निर्णय रद्द केला. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीक आहे. सांगलीत अनेक शासकीय कार्यालये अडगळीच्या ठिकाणी आहेत. त्यांना स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी जागाही नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने खचाखच भरले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने हे कारागृह शहरातून हलविण्याची गरज आहे. यासाठी कारागृह प्रशासनाने कवलापुरातील जागेची मागणी केली होती. आरटीओ कार्यालयही भाड्याच्या जागेत आहे. त्यांनीही ३२ एकर जागा देण्याची मागणी केली. त्यानंतर अन्य शासकीय कार्यालयांनीही याच जागेला पसंती दिली. कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालयांनी कवलापुरातील जागेची मागणी करून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना प्रस्ताव सादर केला होता. गायकवाड यांनी हा प्रस्ताव पुढे राज्य शासनाला सादर केला होता. शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनीही अहवाल सादर केला आहे. अहवालात काय म्हटले आहे, हे समजू शकले नाही. पण ज्या शासकीय कार्यालयांनी जागेची मागणी केली आहे, ती त्यांना देण्यासाठी शासनाने शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. शासनाकडून भविष्यात ही जागा मिळू शकते. अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे. पण त्यांची ताकद कमी पडते. लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करण्याची गरज आहे. कारागृहाला गरज जागेचीजागेची सर्वात जास्त गरज कारागृहाला आहे. सध्या कारागृहात चारशेहून अधिक कैदी झाले आहेत. त्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सत्तरहून अधिक कैदी कळंबा व येरवडा कारागृहात हलविले आहेत. अन्यथा येथे पाचशेपेक्षा जादा कैदी झाले असते.