शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

कारागृह, आरटीओ कार्यालय कवलापूरलाच...

By admin | Updated: August 5, 2016 02:01 IST

स्थलांतरावर शिक्कामोर्तब : विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य शासनाकडे; निधी मिळण्याचे संकेत

सचिन लाड-- सांगली --जिल्हा मध्यवर्ती कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालये कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर स्थलांतर करण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवालही मागवून घेतला आहे. येत्या काही महिन्यात शासकीय कार्यालयांना जागेचे वाटप करून इमारत बांधकामास निधी मिळण्याचे संकेत आहेत. कवलापूर येथे नियोजित विमानतळाची दीडशे एकर जागा आहे. याठिकाणी विमानतळ करण्याचा राज्य शासनाने दोनवेळा निर्णय घेतला. दोनवेळा उद्घाटनही केले; पण शेती जाणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. अगदी हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यानंतर शासनाने नमते घेत विमानतळ करण्याचा निर्णय रद्द केला. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीक आहे. सांगलीत अनेक शासकीय कार्यालये अडगळीच्या ठिकाणी आहेत. त्यांना स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी जागाही नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने खचाखच भरले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने हे कारागृह शहरातून हलविण्याची गरज आहे. यासाठी कारागृह प्रशासनाने कवलापुरातील जागेची मागणी केली होती. आरटीओ कार्यालयही भाड्याच्या जागेत आहे. त्यांनीही ३२ एकर जागा देण्याची मागणी केली. त्यानंतर अन्य शासकीय कार्यालयांनीही याच जागेला पसंती दिली. कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालयांनी कवलापुरातील जागेची मागणी करून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना प्रस्ताव सादर केला होता. गायकवाड यांनी हा प्रस्ताव पुढे राज्य शासनाला सादर केला होता. शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनीही अहवाल सादर केला आहे. अहवालात काय म्हटले आहे, हे समजू शकले नाही. पण ज्या शासकीय कार्यालयांनी जागेची मागणी केली आहे, ती त्यांना देण्यासाठी शासनाने शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. शासनाकडून भविष्यात ही जागा मिळू शकते. अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे. पण त्यांची ताकद कमी पडते. लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करण्याची गरज आहे. कारागृहाला गरज जागेचीजागेची सर्वात जास्त गरज कारागृहाला आहे. सध्या कारागृहात चारशेहून अधिक कैदी झाले आहेत. त्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सत्तरहून अधिक कैदी कळंबा व येरवडा कारागृहात हलविले आहेत. अन्यथा येथे पाचशेपेक्षा जादा कैदी झाले असते.