शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

कारागृह, आरटीओ कार्यालय कवलापूरलाच...

By admin | Updated: August 5, 2016 02:01 IST

स्थलांतरावर शिक्कामोर्तब : विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य शासनाकडे; निधी मिळण्याचे संकेत

सचिन लाड-- सांगली --जिल्हा मध्यवर्ती कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालये कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर स्थलांतर करण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवालही मागवून घेतला आहे. येत्या काही महिन्यात शासकीय कार्यालयांना जागेचे वाटप करून इमारत बांधकामास निधी मिळण्याचे संकेत आहेत. कवलापूर येथे नियोजित विमानतळाची दीडशे एकर जागा आहे. याठिकाणी विमानतळ करण्याचा राज्य शासनाने दोनवेळा निर्णय घेतला. दोनवेळा उद्घाटनही केले; पण शेती जाणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. अगदी हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यानंतर शासनाने नमते घेत विमानतळ करण्याचा निर्णय रद्द केला. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीक आहे. सांगलीत अनेक शासकीय कार्यालये अडगळीच्या ठिकाणी आहेत. त्यांना स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी जागाही नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने खचाखच भरले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने हे कारागृह शहरातून हलविण्याची गरज आहे. यासाठी कारागृह प्रशासनाने कवलापुरातील जागेची मागणी केली होती. आरटीओ कार्यालयही भाड्याच्या जागेत आहे. त्यांनीही ३२ एकर जागा देण्याची मागणी केली. त्यानंतर अन्य शासकीय कार्यालयांनीही याच जागेला पसंती दिली. कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालयांनी कवलापुरातील जागेची मागणी करून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना प्रस्ताव सादर केला होता. गायकवाड यांनी हा प्रस्ताव पुढे राज्य शासनाला सादर केला होता. शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनीही अहवाल सादर केला आहे. अहवालात काय म्हटले आहे, हे समजू शकले नाही. पण ज्या शासकीय कार्यालयांनी जागेची मागणी केली आहे, ती त्यांना देण्यासाठी शासनाने शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. शासनाकडून भविष्यात ही जागा मिळू शकते. अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे. पण त्यांची ताकद कमी पडते. लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करण्याची गरज आहे. कारागृहाला गरज जागेचीजागेची सर्वात जास्त गरज कारागृहाला आहे. सध्या कारागृहात चारशेहून अधिक कैदी झाले आहेत. त्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सत्तरहून अधिक कैदी कळंबा व येरवडा कारागृहात हलविले आहेत. अन्यथा येथे पाचशेपेक्षा जादा कैदी झाले असते.