शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘जय जय रघुवीर समर्थ’ नामाचा जयघोष...

By admin | Updated: February 20, 2017 23:49 IST

३३५ वा दासनवमी महोत्सव : सज्जनगडावर राज्यभरातील भाविकांची हजेरी; लळिताच्या कीर्तनाने आज सांगता होणार

सातारा : सज्जनगड, ता. सातारा येथे श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने दासनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा हा ३३५ वा दासनवमी उत्सव होता. श्री समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थानच्या वतीने महोत्सवात दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन, संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. भारतातील नामवंत कलाकारांनी आपली कला महोत्सवाच्या निमित्ताने समर्थ चरणी अर्पण केली. सज्जनगडावर ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष झाला.दरम्यान, मंगळवारी लळिताच्या कीर्तनाने सांगता होणार आहे, यंदा राज्यातून दासनवमी उत्सव काळात लाखापेक्षा जास्त संख्येने भाविक गडावर दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी आले होते. समर्थ रामदास स्वामींच्या ३३५ व्या पुण्यतिथी निमित्त तेर, मिरज येथून शेकडो समर्थ भक्त आले होते. तसेच पायी दिंड्याही सज्जनगडावर आल्या होत्या. दासनवमी उत्सवानिमित्त पहाटे दोन वाजता काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे ४ वाजता समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस रामदास स्वामींचे वंशज, अधिकारी व अध्यक्ष अभिराम अयोध्यानाथ स्वामी व समर्थ भक्तांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर ६.३० ते १० वाजेपर्यंत गडावर सांप्रदायिक भिक्षेचा कार्यक्रम झाला. सकाळी १० ते ११ यावेळेत पारंपरिक पोशाखातील मानकरी तसेच छत्र, चामर, दंड, आबदागिऱ्या, शिंग तुताऱ्यांच्या निनादात छबिना काढण्यात आला. ११.३० ते १२ या वेळेत समर्थ समाधी मंदिरास समर्थ वंशज तसेच अधिकारी स्वामी आणि पदाधिकारी तसेच हजारो समर्थ भक्तांनी १३ प्रदक्षिणा घालून समर्थांच्या नावाचा ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जय जयकार केला. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत निर्वाण कथेचे वाचन करण्यात आले. रामायण वाचनानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप असा कार्यक्रम झाला. गडावर ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी रात्रीपासूनच गडावर मोठी गर्दी केली असल्याने क्लोज सर्किट टीव्हीच्या माध्यमातून भाविकांना महापूजेचे दर्शन घडविण्यात येत होते. सोमवारी सकाळी आठवडाभर चालेल्या सामुदायिक दासबोध वाचनाची सांगता नितीन बुवा रामदासी व रसिकाताई ताम्हणकर यांनी केली. या पारायण सोहळ्यात १५० हून अधिक समर्थ भक्त सहभागी झाले होते. दासनवमी उत्सवाची सांगता दि. २१ फेब्रुवारी रोजी लळिताच्या कीर्तनाने होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष अभिराम स्वामी यांनी दिली. (प्रतिनिधी)