शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

‘जय जय रघुवीर समर्थ’ नामाचा जयघोष...

By admin | Updated: February 20, 2017 23:49 IST

३३५ वा दासनवमी महोत्सव : सज्जनगडावर राज्यभरातील भाविकांची हजेरी; लळिताच्या कीर्तनाने आज सांगता होणार

सातारा : सज्जनगड, ता. सातारा येथे श्री रामदास स्वामी संस्थान व श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने दासनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा हा ३३५ वा दासनवमी उत्सव होता. श्री समर्थ सेवा मंडळ व रामदास स्वामी संस्थानच्या वतीने महोत्सवात दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन, संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. भारतातील नामवंत कलाकारांनी आपली कला महोत्सवाच्या निमित्ताने समर्थ चरणी अर्पण केली. सज्जनगडावर ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष झाला.दरम्यान, मंगळवारी लळिताच्या कीर्तनाने सांगता होणार आहे, यंदा राज्यातून दासनवमी उत्सव काळात लाखापेक्षा जास्त संख्येने भाविक गडावर दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी आले होते. समर्थ रामदास स्वामींच्या ३३५ व्या पुण्यतिथी निमित्त तेर, मिरज येथून शेकडो समर्थ भक्त आले होते. तसेच पायी दिंड्याही सज्जनगडावर आल्या होत्या. दासनवमी उत्सवानिमित्त पहाटे दोन वाजता काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे ४ वाजता समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस रामदास स्वामींचे वंशज, अधिकारी व अध्यक्ष अभिराम अयोध्यानाथ स्वामी व समर्थ भक्तांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर ६.३० ते १० वाजेपर्यंत गडावर सांप्रदायिक भिक्षेचा कार्यक्रम झाला. सकाळी १० ते ११ यावेळेत पारंपरिक पोशाखातील मानकरी तसेच छत्र, चामर, दंड, आबदागिऱ्या, शिंग तुताऱ्यांच्या निनादात छबिना काढण्यात आला. ११.३० ते १२ या वेळेत समर्थ समाधी मंदिरास समर्थ वंशज तसेच अधिकारी स्वामी आणि पदाधिकारी तसेच हजारो समर्थ भक्तांनी १३ प्रदक्षिणा घालून समर्थांच्या नावाचा ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जय जयकार केला. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत निर्वाण कथेचे वाचन करण्यात आले. रामायण वाचनानंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप असा कार्यक्रम झाला. गडावर ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भाविकांनी रात्रीपासूनच गडावर मोठी गर्दी केली असल्याने क्लोज सर्किट टीव्हीच्या माध्यमातून भाविकांना महापूजेचे दर्शन घडविण्यात येत होते. सोमवारी सकाळी आठवडाभर चालेल्या सामुदायिक दासबोध वाचनाची सांगता नितीन बुवा रामदासी व रसिकाताई ताम्हणकर यांनी केली. या पारायण सोहळ्यात १५० हून अधिक समर्थ भक्त सहभागी झाले होते. दासनवमी उत्सवाची सांगता दि. २१ फेब्रुवारी रोजी लळिताच्या कीर्तनाने होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष अभिराम स्वामी यांनी दिली. (प्रतिनिधी)