शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

मिरजेत आर्थिक विवंचनेतून जाेडप्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:29 IST

मिरज : आर्थिक विवंचनेतून मिरजेतील खॉंजा बस्ती येथे जाेडप्याने गळफास लावून आत्महत्या केली. लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने त्यांनी ...

मिरज : आर्थिक विवंचनेतून मिरजेतील खॉंजा बस्ती येथे जाेडप्याने गळफास लावून आत्महत्या केली. लॉकडाऊनमध्ये उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती.

खॉंजा वसाहतीत राहणारे सलिम गाैससाहेब सय्यद ऊर्फ भटकळ (वय ४७) व मरियम बशीर नदाफ (वय ४०) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सलीम हा रेल्वे स्थानक परिसरात पानपट्टीत काम करत होता. रेल्वेत चहा विक्री व मिळेल ते काम करत होता. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. मरियम काही दिवसांपासून आजारी होती. बचतगटाचा कर्जाचा हप्ता थकीत होता. घराचा खर्च चालविणे कठीण झाल्यामुळे सलीम निराश होता.

मंगळवार बचत गटाचा हप्ता भरण्याचा दिवस असल्याने सलीमने काही जणांकडून उसनवार पैसे मिळविण्याचाही प्रयत्न केला; मात्र कोणाकडूनही पैसे मिळाले नसल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. मंगळवारी दोघांनीही घरात गळफास लावून आत्महत्या केली. घरातील छोट्या खोलीत सलीम हा दोरीला लटकला होता. तर मरियम मृतावस्थेत जमिनीवर पडली होती. मरियमने प्रथम आत्महत्या केल्यानंतर सलीमने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे रोजगार बंद असल्याचा गरीब जाेडप्यास फटका बसल्याची चर्चा हाेती. अर्थिक विवंचनेतून दोघांनी आत्महत्या केल्याच्या या घटनेबाबत तपास सुरू असल्याचे गांधी चाैक पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.

चाैकट

उपचारासाठीही पैसे नव्हते

कर्नाटकातील भटकळ येथून दहा वर्षांपूर्वी मिरजेत आलेल्या सलीम याच्यासोबत विधवा मरियम नदाफ सहा महिन्यापासून एकत्र रहात होती. मरियम ही गेली काही दिवस आजारी होती. तिच्या उपचारासाठीही सलीमकडे पैसे नव्हते. अशीही माहिती मिळाली.