शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

देवराष्ट्रे वसतिगृहातील मुलांवर अन्न मागून खाण्याची वेळ

By admin | Updated: October 7, 2016 00:05 IST

प्रशासनाचा ढिसाळ कारभार : नागरिकांमधून संताप

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील विठामाता चव्हाण विद्यार्थी वसतिगृहातील मुलांवर अन्न मागून खाण्याची वेळ आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून इंधनासाठी जळण नसल्याने मुलांना अन्न मिळालेले नाही. जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा आहे. संबंधित कर्मचारी व संस्थाचालक यांच्यात समन्वय नाही. येथील विद्यार्थी स्थानिक मित्रांच्या मदतीने उपजीविका करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे वसतिगृह प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे.माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गरीब व अनाथ मुलांना शिक्षण मिळावे, त्यांना राहण्याची उत्तम सोय व्हावी व दोनवेळचे जेवण मिळावे या उद्देशाने मातोश्री विठामाता चव्हाण यांच्या नावाने ७० च्या दशकात देवराष्ट्रे येथे विठामाता चव्हाण विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना केली. सुरुवातीला हे वसतिगृह जागेअभावी यशवंतरावांच्या जन्मघरात सुरू होते. यशवंत एज्युकेशन संस्थेमार्फत हे वसतिगृह चालवले जाते. अनेक गरीब विद्यार्थी येथे राहून शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र या वसतिगृहाला आज उतरती कळा लागली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या वसतिगृहात अन्नाचा कणही शिजलेला नाही. जळण नाही, तांदूळ व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आहे, असे कर्मचारी सांगत आहेत. दुसरीकडे संस्था संचालकांकडून वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना दोषी धरण्यात येत आहे. या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील स्वयंपाकी आठ दिवसांपासून वसतिगृहाकडे फिरकलेच नाहीत, तर सुरक्षारक्षक सवडीने येत असल्याचे येथील विद्यार्थी सांगत आहेत. (वार्ताहर)दोषींवर कठोर कारवाई करणार : मोहनराव मोरेविठामाता वसतिगृहात जो प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे संस्था बदनाम होत आहे. वारंवार अशा घटना उघडकीस आल्या आहेत. येथील कर्मचाऱ्यांना सुधारण्याच्या अनेक संधी दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीचा अहवाल समाजकल्याण विभागाला सादर करून, कर्मचाऱ्यांचा पगार अनेक महिन्यांपासून रोखला आहे.स तरीही त्यांच्यात सुधारणा दिसून येत नाही. समाजकल्याण अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचे यशवंत एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोहनराव मोरे यांनी सांगितले. यावेळी आनंदराव मोरे, सचिव संजय मोरे, आत्माराम ठोंबरे, मुख्याध्यापक सतीश बनसोडे उपस्थित होते.अस्वच्छतेचे साम्राज्यएकीकडे विद्यार्थ्यांना जेवण मिळत नसताना वसतिगृहाच्या अनेक खोल्यांत, स्वयंपाकघरात, तसेच स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसत आहे.वसतिगृहाला गॅस नाहीकेंद्रासह राज्य शासन वृक्षतोडीला लगाम घालण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. गरीब व इतर कुटुंबांसह शाळा, विद्यालये यांना सरकार सवलतीच्या दराने गॅस देत आहे. मात्र या वसतिगृहाची चूल जळणाशिवाय पेटत नाही.