शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सारेच आहे बंद, मग नागरिक कसे बेबंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST

सांगली : अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्वकाही बंद असताना शहरांमधील हजारो नागरिकांची रस्ते, चौक, बाजारपेठांमधील भटकंती नेमकी कशासाठी सुरू ...

सांगली : अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्वकाही बंद असताना शहरांमधील हजारो नागरिकांची रस्ते, चौक, बाजारपेठांमधील भटकंती नेमकी कशासाठी सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवारी सांगलीत सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचा मुक्तसंचार सुरू होता.

लॉकडाऊन काळात एकीकडे व्यापारी, व्यावसायिकांनी सर्वांनी प्रामाणिकपणे शासनाचे निर्बंध पाळत व्यावसाय बंद केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठा, व्यावसाय बंद आहेत. तरीही नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. हजारो लोक दररोज जाताहेत तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांकडून कारवाईत ढिलाईपणा होत असल्याने नागरिकांची संचारबंदीबद्दलची भीती मोडली आहे. या काळात नागरिक मुक्तसंचार अधिक करीत आहेत. रस्ते, चौक, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी दुचाकी व चारचाकींची वर्दळ दिसून आली. वाहने अडविताना व संबंधितांना विचारणा करतानाचे चित्र अपवादात्मक होते.

दवाखान्याला जायचेय, किराणा माल खरेदी करायचा आहे, नातेवाइकांच्या घरी कार्यक्रम आहे, कामावर जात आहे, कुत्र्याला बरे नाही, औषध आणायचे आहे, अशी एक ना अनेक कारणे देत लोक भटकंती करीत आहेत.

चौकट

बेकऱ्या, किराणा दुकाने बंद

शनिवार व रविवारचा कडक लॉकडाऊनचा नियम कायम असल्याचा ग्रह करून अनेक बेकरीचालक व किराणा दुकानदारांनी शनिवारी व्यवसाय बंद ठेवला होता. त्यामुळे शनिवारी केवळ मेडिकल्स, पेट्रोलपंप, दवाखाने, अन्य वैद्यकीय सेवा इतकेच सुरू होते.

चौकट

श्वानासह भटकंती, घोडागाडी रपेट

संचारबंदी व लॉकडाऊन काळात दररोज सायंकाळी शहराच्या कानाकोपऱ्यात ट्रॅक पँट घालून श्वानासह भटकंती करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी रात्री माधवनगर रोडवर काही मुलांनी घोडागाडी पळविण्याचा आनंद लुटला. अशा कोणत्याही लोकांवर निर्बंध नाहीत.

चौकट

मागील संचारबंदी कडक

गतवर्षी राबविण्यात आलेली संचारबंदी कडक होती. रस्ते, चौक, बाजारपेठा पूर्णपणे ओस पडल्या होत्या. रस्त्यावर दिसणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. यंदा नेमकी उलटी परिस्थिती आहे. संचारबंदीत मुक्तसंचार अधिक दिसत आहे.