शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाविकास आघाडीसोबत गेलो ही चूकच, यापुढे सर्व निवडणुका स्वतंत्रच लढणार- राजू शेट्टी

By अशोक डोंबाळे | Updated: February 17, 2023 20:30 IST

'लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रच लढणार.' 

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे लढत होती, तेव्हा लोक ताकदीने आमच्यासोबत उभे होते. आम्ही महाविकास आघाडीसोबत गेलो ती आमची चूक होती, ती पुन्हा होणार नाही. आम्ही आता स्वतंत्रच लढू, अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत मांडली.

शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीसोबतचे संबंध एक वर्षापूर्वीच तोडले आहेत. त्यावर पुनर्विचार करावा, अशी गरज आम्हाला वाटत नाही. संबंध तोडणे चुकीचे होते, असेही आम्हाला वाटत नाही. कारण, प्रत्येक सरकारने आणि पक्षाने आमच्या भूमिकांना बगल दिली आहे.

शेतकरी हिताला बाधा येईल, अशीच धोरणे राबविली आहेत. त्याविरुद्धची लढाई स्वतंत्रपणे सुरू राहील. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आम्ही स्वतंत्रपणेच लढणार आहोत. आघाड्यांच्या भानगडीत पडणे ही आमची चूक होती. यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या आघाड्यांमध्ये आम्ही थेट सहभागी होणार नाही. या आघाड्यांच्या भानगडींमुळे आमचे नुकसान झाले आहे.ठाकरेंनी हात पुढे केला तरी आम्ही स्वतंत्रच राहूशिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील छोटे पक्ष एकत्र करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनी हात पुढे केला तर विचार करणार का, या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, आता कोणत्याच पक्षावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे पुन्हा ती चूक करणार नाही. कोणत्याच आघाड्यांत सहभागी होणार नाही.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी