शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
2
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
3
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
4
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
5
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
6
मयंतीची पँट नेहमी मी घातलो, आज तू का घातलीस? Live शोमध्ये गावस्करांनी विचारला मिश्किल प्रश्न, मग...  
7
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
8
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
9
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
10
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
11
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
12
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
13
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
14
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
15
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
16
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
17
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
18
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
19
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
20
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

वाळव्यातून सांगलीत येण्यास उशीर झाला!

By admin | Updated: May 21, 2015 00:10 IST

दिलीपतात्या पाटील : ही खंत नव्हे, माझ्या राजकीय प्रवासाचे वर्णन..

सांगली : राजारामबापू उद्योग समूहातील अनेक संस्था, उपसा सिंचन प्रकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविण्यात मला यश मिळाले. यासाठी मला बराच कालावधी मिळाला. त्यामुळे वाळवा तालुक्यातून सांगलीपर्यंत येण्यास मला उशीर झाला, अशी भावना जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, ही खंत नव्हे, माझ्या राजकीय प्रवासाचे वर्णन आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. ते म्हणाले की, राज्यातील सर्वात आदर्श संस्था म्हणून आमच्या अनेक संस्थांचा गौरव झालेला आहे. या संस्थांची जबाबदारी माझ्यावर सोपविली, तेव्हा अनेक अडचणी होत्या. वस्त्रोद्योग अडचणीत असताना मला सूतगिरणीची जबाबदारी दिली. अथक् प्रयत्नानंतर एक आदर्श सूतगिरणी उभारण्यात यश आले. संस्था, प्रकल्प आणि योजना राबविताना काम करण्यासाठी बराच कालावधी मिळाला. त्यामुळेच सांगलीपर्यंत येण्यास थोडा उशीर झाला. ही खंत आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर ते म्हणाले की, ही खंत नाही, माझ्या राजकीय प्रवासाची माहिती आहे. कोणतीही वाढ नैसर्गिक असावी, असे माझे मत आहे. अशीच नैसर्गिक वाढ झाल्यामुळे आता जिल्हा बँकेपर्यंत मी पोहोचलो आहे. राजकारणात अनेकांना लगेच संधी मिळत असली तरी, वेगवेगळ्या मातीचा तो गुणधर्म आहे. काही ठिकाणी शेती लगेच पिकते, काही ठिकाणी पीक यायला उशीर होतो.बँकेतील वादग्रस्त गैरव्यवहार प्रकरणांविषयी ते म्हणाले की, या गोष्टी आता न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्यावर मी कोणतेही भाष्य करणार नाही. तरीही यापुढील काळात चांगला कारभार निश्चितपणे दिसून येईल. पारदर्शी कारभारावर लक्ष केंद्रित केले जाईल. प्रशासकांनी गेल्या तीन वर्षात जो कारभार केला, तो अत्यंत चांगला आहे. त्यांनी सुरू केलेल्या सर्व चांगल्या योजना, गोष्टी आम्ही पुढे चालू ठेवू. जिल्हा बँकेतील कारभाराचा मला अनुभव नाही. त्याविषयीचा अभ्यासही अद्याप केलेला नाही. अभ्यास करून बँकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने करू. पुणे आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँका जशा नावाजलेल्या आहेत, तसाच नावलौकिक किंवा त्याहून अधिक चांगला कारभार करणार आहोत. (प्रतिनिधी)नोकरभरती पारदर्शीचलवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरभरती होणार आहे. ही भरती कशी होईल, याविषयी शंका उपस्थित होत असल्या तरी, आम्ही पारदर्शीपणाने ही भरती करणार आहोत. कोणतीही शंका उपस्थित होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.