शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी भरल्यानंतरच ‘म्हैसाळ’ सुरू

By admin | Updated: January 14, 2016 00:09 IST

खासदार, जिल्हाधिकारी ठाम : टंचाई निधीतून थकबाकी भरण्यास नकार, मिरजेत बैठक

मिरज : शेतकऱ्यांनी एकरी पाच हजार रुपये पाणीपट्टी भरल्यानंतरच म्हैसाळ योजना सुरू होणार असल्याचे खा. संजय पाटील यांनी बुधवारी सांगितले, तर टंचाई निधीतून म्हैसाळचे थकीत बिल भरले जाणार नाही. पाणीपट्टीची रक्कम भरली नाही, तर पंपहाऊसला टाळे ठोकून म्हैसाळ योजनेचे खासगीकरण करावे लागेल, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी येथे स्पष्ट केले. पाणी संघर्ष समितीतर्फे मिरजेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या मागणीसाठी मिरजेत शेतकरी, प्रशासन व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. आवर्षण व दुष्काळी परिस्थितीत थकीत पाणीपट्टी भरण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नसल्याने म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी केली. त्यावर खा. पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी जूनपर्यंत सहा महिन्यांसाठी एकरी पाच हजार रुपये भरल्यास पाणी सुरू करता येईल. योजनेच्या २० कोटी थकबाकीपैकी ३३ टक्के माफ करण्यात आले आहेत. यापूर्वी थकबाकी न भरता आवर्तन सुरू केल्याने आता पाणीपट्टीची रक्कम भरल्याशिवाय पाणी सुरू होणार नाही. शेतकऱ्यांनी वर्षाला केवळ सात हजार रुपये भरल्यास वर्षातून ५० दिवसांची चार आवर्तने याप्रमाणे पाणी सोडण्यात येईल. जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, आपल्याकडे जूनपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. म्हैसाळची पाणीपट्टी वसुली आता महसूल विभागातील तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कारखान्यामार्फत भरण्याच्या निर्णयाबाबत सभासद शेतकऱ्यांसोबत विचारविनिमय करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. बैठकीत एकरी पाच हजार रुपये पाणीपट्टी भरण्याच्या निर्णयास काही शेतकऱ्यांनी विरोध करीत मागील थकबाकी टंचाई निधीतून भरा, त्यानंतर पुढील आवर्तनाची पाणीपट्टी शेतकरी देतील, असे सांगितले. बैठकीस तहसीलदार किशोर घाडगे, गजेंद्र कुळ्ळोळी, खंडेराव जगताप, दिनकर पाटील, काँग्रसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, जि. प. सदस्य प्रकाश कांबळे, प्रकाश देसाई, परशुराम नागरगोजे, प्रकाश इनामदार उपस्थित होते. (वार्ताहर) ...तर पंपगृहाला टाळे ठोकून योजनेचे खासगीकरण टंचाई निधीतून थकीत बिल भरले जाणार नाही. पैसे भरण्याची शेतकऱ्यांची तयारी नसेल, तर म्हैसाळ पंपगृहाला टाळे ठोकून योजनेचे खासगीकरण करावे लागेल. म्हैसाळच्या पाण्यासाठी ही अंतिम बैठक आहे. पुन्हा या विषयावर बैठकीची तयारी नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सुनावले. पतंगरावांची गुगली कशासाठी ? पतंगराव कदम यांचे नाव न घेता खा. संजय पाटील म्हणाले की, ताकारी योजनेतून पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे नेते दीड कोटीचा धनादेश देतात व दुसऱ्यादिवशी म्हैसाळ योजनेची थकबाकी टंचाई निधीतून भरता येणे शक्य असल्याची गुगली टाकतात. म्हैसाळ योजना सुरू राहावी, यासाठी पाणीपट्टी भरण्याची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. कोणीही पाण्याचे राजकारण करून योजना बंद पाडू नये.