शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी भरल्यानंतरच ‘म्हैसाळ’ सुरू

By admin | Updated: January 14, 2016 00:09 IST

खासदार, जिल्हाधिकारी ठाम : टंचाई निधीतून थकबाकी भरण्यास नकार, मिरजेत बैठक

मिरज : शेतकऱ्यांनी एकरी पाच हजार रुपये पाणीपट्टी भरल्यानंतरच म्हैसाळ योजना सुरू होणार असल्याचे खा. संजय पाटील यांनी बुधवारी सांगितले, तर टंचाई निधीतून म्हैसाळचे थकीत बिल भरले जाणार नाही. पाणीपट्टीची रक्कम भरली नाही, तर पंपहाऊसला टाळे ठोकून म्हैसाळ योजनेचे खासगीकरण करावे लागेल, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी येथे स्पष्ट केले. पाणी संघर्ष समितीतर्फे मिरजेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या मागणीसाठी मिरजेत शेतकरी, प्रशासन व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. आवर्षण व दुष्काळी परिस्थितीत थकीत पाणीपट्टी भरण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नसल्याने म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी केली. त्यावर खा. पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी जूनपर्यंत सहा महिन्यांसाठी एकरी पाच हजार रुपये भरल्यास पाणी सुरू करता येईल. योजनेच्या २० कोटी थकबाकीपैकी ३३ टक्के माफ करण्यात आले आहेत. यापूर्वी थकबाकी न भरता आवर्तन सुरू केल्याने आता पाणीपट्टीची रक्कम भरल्याशिवाय पाणी सुरू होणार नाही. शेतकऱ्यांनी वर्षाला केवळ सात हजार रुपये भरल्यास वर्षातून ५० दिवसांची चार आवर्तने याप्रमाणे पाणी सोडण्यात येईल. जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, आपल्याकडे जूनपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. म्हैसाळची पाणीपट्टी वसुली आता महसूल विभागातील तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कारखान्यामार्फत भरण्याच्या निर्णयाबाबत सभासद शेतकऱ्यांसोबत विचारविनिमय करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. बैठकीत एकरी पाच हजार रुपये पाणीपट्टी भरण्याच्या निर्णयास काही शेतकऱ्यांनी विरोध करीत मागील थकबाकी टंचाई निधीतून भरा, त्यानंतर पुढील आवर्तनाची पाणीपट्टी शेतकरी देतील, असे सांगितले. बैठकीस तहसीलदार किशोर घाडगे, गजेंद्र कुळ्ळोळी, खंडेराव जगताप, दिनकर पाटील, काँग्रसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, जि. प. सदस्य प्रकाश कांबळे, प्रकाश देसाई, परशुराम नागरगोजे, प्रकाश इनामदार उपस्थित होते. (वार्ताहर) ...तर पंपगृहाला टाळे ठोकून योजनेचे खासगीकरण टंचाई निधीतून थकीत बिल भरले जाणार नाही. पैसे भरण्याची शेतकऱ्यांची तयारी नसेल, तर म्हैसाळ पंपगृहाला टाळे ठोकून योजनेचे खासगीकरण करावे लागेल. म्हैसाळच्या पाण्यासाठी ही अंतिम बैठक आहे. पुन्हा या विषयावर बैठकीची तयारी नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सुनावले. पतंगरावांची गुगली कशासाठी ? पतंगराव कदम यांचे नाव न घेता खा. संजय पाटील म्हणाले की, ताकारी योजनेतून पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे नेते दीड कोटीचा धनादेश देतात व दुसऱ्यादिवशी म्हैसाळ योजनेची थकबाकी टंचाई निधीतून भरता येणे शक्य असल्याची गुगली टाकतात. म्हैसाळ योजना सुरू राहावी, यासाठी पाणीपट्टी भरण्याची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. कोणीही पाण्याचे राजकारण करून योजना बंद पाडू नये.