शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

पाणीपट्टी भरल्यानंतरच ‘म्हैसाळ’ सुरू

By admin | Updated: January 14, 2016 00:09 IST

खासदार, जिल्हाधिकारी ठाम : टंचाई निधीतून थकबाकी भरण्यास नकार, मिरजेत बैठक

मिरज : शेतकऱ्यांनी एकरी पाच हजार रुपये पाणीपट्टी भरल्यानंतरच म्हैसाळ योजना सुरू होणार असल्याचे खा. संजय पाटील यांनी बुधवारी सांगितले, तर टंचाई निधीतून म्हैसाळचे थकीत बिल भरले जाणार नाही. पाणीपट्टीची रक्कम भरली नाही, तर पंपहाऊसला टाळे ठोकून म्हैसाळ योजनेचे खासगीकरण करावे लागेल, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी येथे स्पष्ट केले. पाणी संघर्ष समितीतर्फे मिरजेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या मागणीसाठी मिरजेत शेतकरी, प्रशासन व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. आवर्षण व दुष्काळी परिस्थितीत थकीत पाणीपट्टी भरण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती नसल्याने म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी केली. त्यावर खा. पाटील म्हणाले की, म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यासाठी जूनपर्यंत सहा महिन्यांसाठी एकरी पाच हजार रुपये भरल्यास पाणी सुरू करता येईल. योजनेच्या २० कोटी थकबाकीपैकी ३३ टक्के माफ करण्यात आले आहेत. यापूर्वी थकबाकी न भरता आवर्तन सुरू केल्याने आता पाणीपट्टीची रक्कम भरल्याशिवाय पाणी सुरू होणार नाही. शेतकऱ्यांनी वर्षाला केवळ सात हजार रुपये भरल्यास वर्षातून ५० दिवसांची चार आवर्तने याप्रमाणे पाणी सोडण्यात येईल. जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले की, आपल्याकडे जूनपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. म्हैसाळची पाणीपट्टी वसुली आता महसूल विभागातील तलाठ्यांमार्फत करण्यात येणार आहे. मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणीपट्टी कारखान्यामार्फत भरण्याच्या निर्णयाबाबत सभासद शेतकऱ्यांसोबत विचारविनिमय करूनच निर्णय घेणार असल्याचे सांगितले. बैठकीत एकरी पाच हजार रुपये पाणीपट्टी भरण्याच्या निर्णयास काही शेतकऱ्यांनी विरोध करीत मागील थकबाकी टंचाई निधीतून भरा, त्यानंतर पुढील आवर्तनाची पाणीपट्टी शेतकरी देतील, असे सांगितले. बैठकीस तहसीलदार किशोर घाडगे, गजेंद्र कुळ्ळोळी, खंडेराव जगताप, दिनकर पाटील, काँग्रसचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, जि. प. सदस्य प्रकाश कांबळे, प्रकाश देसाई, परशुराम नागरगोजे, प्रकाश इनामदार उपस्थित होते. (वार्ताहर) ...तर पंपगृहाला टाळे ठोकून योजनेचे खासगीकरण टंचाई निधीतून थकीत बिल भरले जाणार नाही. पैसे भरण्याची शेतकऱ्यांची तयारी नसेल, तर म्हैसाळ पंपगृहाला टाळे ठोकून योजनेचे खासगीकरण करावे लागेल. म्हैसाळच्या पाण्यासाठी ही अंतिम बैठक आहे. पुन्हा या विषयावर बैठकीची तयारी नसल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सुनावले. पतंगरावांची गुगली कशासाठी ? पतंगराव कदम यांचे नाव न घेता खा. संजय पाटील म्हणाले की, ताकारी योजनेतून पाणी सोडण्यासाठी काँग्रेसचे नेते दीड कोटीचा धनादेश देतात व दुसऱ्यादिवशी म्हैसाळ योजनेची थकबाकी टंचाई निधीतून भरता येणे शक्य असल्याची गुगली टाकतात. म्हैसाळ योजना सुरू राहावी, यासाठी पाणीपट्टी भरण्याची मानसिकता तयार करणे आवश्यक आहे. कोणीही पाण्याचे राजकारण करून योजना बंद पाडू नये.