शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST

नेर्ले : आजूबाजूच्या डोंगरावरती गवताला आग लागणार नाही याची काळजी घ्या. पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे, ...

नेर्ले : आजूबाजूच्या डोंगरावरती गवताला आग लागणार नाही याची काळजी घ्या. पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे, असे मत वनपाल अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.

ते नेर्ले येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वनवणवा सप्ताहाच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर, सरपंच छायाताई रोकडे, मुख्याध्यापक एस.एन. निकम यांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदे म्हणाले, वनसंवर्धन करणे, त्याची काळजी घेणे हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. पृथ्वीवर आपणास जगण्याचा अधिकार आहे. निसर्गातील प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे. काही लोक डोंगरावरती आग लावतात. यामुळे अनेक जीव विषाणू नष्ट होतात. मोर गवतात अंडी घालत असल्यामुळे त्याची प्रजाती नष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. भारतातील चित्ता हा प्राणी नामशेष होण्याचे कारण वणवा हेच आहे. आपण सर्वांनी वन्यप्राणी व निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. झाडे लावावी निसर्गाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.

यावेळी एस.व्ही. वजरीणकर, एल.बी. पाटील, डी.एल. कुंभार, पी.एन. खोत, श्रीमती ए.सी. साळुंखे, श्रीमती ए.बी. कदम, एस.एस. खोत, ए.एस. नायकवडी आदी उपस्थित होते.

फोटो-०९०२२०२१-आयएसएलएल-नेर्ले न्यूज

नेर्ले (ता. वाळवा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वनवणवा सप्ताह कार्यक्रम झाला. यावेळी अमोल शिंदे, दीपाली सागावकर, छायाताई रोकडे, एस.एन. निकम, एस. व्ही. वजरीणकर, एल.बी. पाटील यांची उपस्थिती होती.