शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST

नेर्ले : आजूबाजूच्या डोंगरावरती गवताला आग लागणार नाही याची काळजी घ्या. पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे, ...

नेर्ले : आजूबाजूच्या डोंगरावरती गवताला आग लागणार नाही याची काळजी घ्या. पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे, असे मत वनपाल अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.

ते नेर्ले येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वनवणवा सप्ताहाच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर, सरपंच छायाताई रोकडे, मुख्याध्यापक एस.एन. निकम यांची उपस्थिती होती.

यावेळी शिंदे म्हणाले, वनसंवर्धन करणे, त्याची काळजी घेणे हे माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे. पृथ्वीवर आपणास जगण्याचा अधिकार आहे. निसर्गातील प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार आहे. काही लोक डोंगरावरती आग लावतात. यामुळे अनेक जीव विषाणू नष्ट होतात. मोर गवतात अंडी घालत असल्यामुळे त्याची प्रजाती नष्ट होण्याची शक्यता आहे. याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. भारतातील चित्ता हा प्राणी नामशेष होण्याचे कारण वणवा हेच आहे. आपण सर्वांनी वन्यप्राणी व निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. झाडे लावावी निसर्गाचे रक्षण करावे, असे आवाहन केले.

यावेळी एस.व्ही. वजरीणकर, एल.बी. पाटील, डी.एल. कुंभार, पी.एन. खोत, श्रीमती ए.सी. साळुंखे, श्रीमती ए.बी. कदम, एस.एस. खोत, ए.एस. नायकवडी आदी उपस्थित होते.

फोटो-०९०२२०२१-आयएसएलएल-नेर्ले न्यूज

नेर्ले (ता. वाळवा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वनवणवा सप्ताह कार्यक्रम झाला. यावेळी अमोल शिंदे, दीपाली सागावकर, छायाताई रोकडे, एस.एन. निकम, एस. व्ही. वजरीणकर, एल.बी. पाटील यांची उपस्थिती होती.