शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. परंतु अनेकांना लस घेतल्यानंतर केंद्रात बसणे जीवावर येते. लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते.

कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. आतापर्यंत केवळ ४५ वयाच्या वरील नागरिकांनाच लस दिली जात होती. परंतु आता पुन्हा ३० ते ४४ वयोगटातील लसीकरणालाही १९ जूनपासून सुरुवात करण्यात आल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्काही आता पुढील काही दिवसातच वाढणार आहे. येणारा आठवडा लसीकरणाचे लाभार्थी वाढविणारा आहे. परंतु लस घेत असताना आरोग्य विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणेही आवश्यक आहे. बहुतांश लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात अर्धा तास थांबणे अत्यंत आवश्यक असताना, काही नागरिक लस घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे थांबतात आणि लगेच निघून जात असल्याचे प्रकार अनेक केंद्रांच्या ठिकाणी समोर येत आहेत.

चौकट

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लसीकरणानंतर अर्धा तास ठेवण्याच्या मागचे कारण म्हणजे कुणाला चक्कर येऊ शकते. कुणाला रिॲक्शन होऊ शकते. कुणाला पुरळ येऊ शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तिला निरीक्षणाखाली ठेवावे लागते.

कोट

लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार केंद्रावर काहीवेळ थांबावे लागते. नागरिकांच्या भल्यासाठीच ती सूचना आहे. अद्याप जिल्ह्यात कोणालाही रिॲक्शन आल्याचा प्रकार घडलेला नाही. तरीही काळजी घेतली जात आहे. लस घेणाऱ्यांनीही सुचनांचे पालन करावे.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली

चौकट

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण लसीकरण ७,६०,४२०

पहिला डोस ६,२८,३६६

दुसरा डोस १,३२,०५४

एकूण केंद्र ३,४६२

प्राथमिक आरोग्य केंद्रे २,१३७

चौकट

लस हेच औषध

सध्या लसीकरण हाच एकमेव चांगला पर्याय लोकांसमोर आहे. लसीकरणामुळे मोठे सुरक्षाकवच मिळणार असल्याने नागरिकांनी शक्य तेवढ्या लवकरण लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न करावा. आता लसही उपलब्ध होत आहे.