शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

इस्लामपूरचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती विकासाची कोल्हेकुई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 23:57 IST

विजय कुंभार : सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांचा नुसता फार्स

इस्लामपूर : इस्लामपूर शहराचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादीने २०१६-१७ चा सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे विकास कामाची कोल्हेकुई आहे. सभागृहात सादर केलेला १०७ कोटींचा अर्थसंकल्प म्हणजे सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. झालेला विकास आणि आगामी काळात होणारी विकासकामे याचा सत्ताधाऱ्यांनी नुसता फार्स केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना केला.विजय कुंभार म्हणाले की, १९८५ पासून सत्ताधाऱ्यांनी फक्त कुसूमगंध बगीचा, राजारामबापू नाट्यगृह, बंद पडलेला पोहण्याचा तलाव, उद्ध्वस्त केलेले अंबिका उद्यान, तेथून गायब झालेली मिनी रेल्वे, तोट्यातील क्लब हाऊस, कोट तलावातील बोटिंग क्लब, निकृष्ट दर्जाची घरकुल योजना, गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला गांडूळ खत प्रकल्प ही विकासकामे केली आहेत. यातील बहुतांशी प्रकल्प बंद आहेत. यावर कोट्यवधी रुपये केलेला खर्च पाण्यात गेला आहे.सत्ताधारी सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांवर चर्चा न करता वाय-फायवर हाय-फाय चर्चा करतात. कोणतीही करवाढ केली नाही, असा डांगोरा पिटणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी दुसरीकडे मात्र नवीन मालमत्ताधारकांवर प्रचंड करवाढ लादली आहे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजना कागदावरच राहिली असल्याचे अर्थसंकल्पात दिसते. शहराची एकूण पाणीपट्टी २ कोटी ८ लाख रुपये भरली जाते. एकूण पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च १ कोटी ३६ लाख असून, पालिकेस ७२ लाख नफा होतो. मुंबईसारख्या मेट्रो शहरातही घरगुती एक हजार लिटर पाण्यासाठी ४.५० पैसे दर आहे. (वार्ताहर)नागरिकांमध्ये नाराजीपालिकेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावर अर्थसंकल्प फुगवला आहे. त्यामध्ये भुयारी गटारी ३० कोटी, घरकुल ११ कोटी अशा ४१ कोटी अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे. तसेच इस्लामपूर शहरातील रस्ते प्रकल्पासाठी शासनाने २४ कोटी ५८ लाख रुपये मंजूर केले आहेत. ते २ वर्षे बँकेत ठेवल्याने त्याचे ५ कोटींचे व्याज पालिकेने घेतले आहे. परंतु शहरातील रस्ते आणि भुयारी गटार योजना हे केवळ दिवास्वप्नच ठरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे कुंभार यांनी स्पष्ट केले.