शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरचा विकास आराखडा कायद्याच्या कचाट्यात...

By admin | Updated: June 24, 2016 01:16 IST

राजकारण रंगणार : शासनाच्या विरोधात जाऊन पालिकेची मंजुरी; आराखड्यास राज्य शासन स्थगिती देईल : सदाभाऊ खोत

अशोक पाटील--इस्लामपूर  पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने शासनाविरोधात जाऊन विकास आराखडा मंजूर केला आहे. राष्ट्रवादीने हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविला होता. मात्र त्यांच्या निर्णयाची वाट न पाहताच नगरविकास खात्याला अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. या आराखड्याला शासन निश्चितच स्थगिती देईल, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे.१९८० च्या आराखड्यानंतर नियोजित विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आतापर्यंत तक्रारी, हरकतींमुळे पालिकेने शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तरीसुध्दा हा आराखडा अन्यायी असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. खासदार राजू शेट्टी यांनी हा आराखडा रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दोन-तीन बैठका घेतल्या आहेत. सर्व विरोधी पक्षांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले आहे. या आराखड्यासंदर्भात चौकशी केल्यानंतरच मंजुरी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु याला बराच कालावधी लोटल्याने सत्ताधारी राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर हा आराखडा मंजूर करून थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले आहे.१९८0 मधील काही आरक्षणे सत्ताधाऱ्यांनी आजही विकासित केलेली नाहीत. आरक्षणाची भीती दाखवून काही भूखंड नाममात्र किंमतीत खरेदी करुन त्यावर सध्या बांधकामे उभी केली आहेत. तर सत्ताधारी राष्ट्रवादीतील काही मालमत्ताधारकांनी स्वत:ची मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा विकास आराखडा मंजूर होणे सत्ताधाऱ्यांच्या गरजेचे होते. याउलट सर्वसामान्यांच्या घरावर पुन्हा आरक्षणे टाकून हा आराखडा अन्यायी केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून, तो बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.सत्ताधारी राष्ट्रवादीने स्वत:च्या मालमत्ता २0३0 पर्यंत सुरक्षित करण्यासाठी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना हाताशी धरुन ए. डी. डी. पी. कलम ३१ चा चुकीचा अर्थ काढून २३ मालमत्ताधारकांच्या घरावर नांगर फिरवला आहे. त्यांच्या तक्रारी असतानाही सत्ताधाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने आराखडा मंजूर करुन घेतला आहे. शासनाच्या विरोधात जाऊन बहुमतावर केलेल्या आराखड्याविरोधात शासनाकडे दाद मागणार आहोत.-विजय कुंभार, विरोधी पक्ष नेते, इस्लामपूरमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्षइस्लामपूर येथील विकास आराखडा रद्द करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. यावर दोन ते तीन बैठकाही झाल्या. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी आराखडा प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केले. त्यामुळेच राष्ट्रवादीने बहुमताने आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये भाजपची मोठी चूक आहे, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी केला आहे.१९८0 च्या विकास आराखड्यात ५६ आरक्षणे होती. त्यातील ५ ते ७ आरक्षणे रद्द झाली. जी आरक्षणे राहिली, परंतु आमदार जयंत पाटील यांनी प्रामाणिकपणे ज्यांना सत्ता दिली, त्याच सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची आरक्षणे सभागृहात ठराव करुन उठवली आणि त्याची विक्री केली आहे. विकास आराखड्याचा ठराव सभागृहाने केला आहे. यावर मतदान घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनी ती फेटाळली. त्यामुळे विरोधकांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे आराखड्याविरोधात लढा उभारावा.- वैभव पवार, माजी नगरसेवक, इस्लामपूर.