शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

इस्लामपूरचा विकास आराखडा वादात

By admin | Updated: December 17, 2015 01:22 IST

राजकीय संघर्ष : सत्ताधारी, विरोधकांची भूमिका गुलदस्त्यात

अशोक पाटील-- इस्लामपूर -पस्तीस वर्षांपूर्वीच्या म्हणजे १९८० च्या विकास आराखड्यानंतर इस्लामपूर शहरातील विकासाचे तीनतेरा वाजले तरी, नवीन विकास आराखडा प्रसिध्द करण्याकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. विरोधकांनीही केवळ बघ्याची भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे, तर इस्लामपूर मतदार संघासह पालिकेवर राष्ट्रवादीचे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या राजकीय संघर्षात शहराचा विकास आराखडा अडकला आहे. शहरातील गुंठेवारी विकास, चौकांचे सुशोभिकरण, भुयारी गटार योजना, चोवीस तास पाणी योजना, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. १९८० मधील इस्लामपूरचे चित्र आणि आताच्या म्हणजे २०१५ मधील परिस्थितीत मोठा फरक आहे. ३५ वर्षांत बदल झाले आहेत. शहराची लोकसंख्या, वाढती उपनगरे, जागांचे बेकायदेशीर खरेदी-विक्रीचे व्यवहार त्यामुळे गुंठेवारीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. जागांचे सर्व व्यवहार कायदेशीर न होता सर्रास नोटरी केली जाते. अशा जागांवर टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. याला सत्ताधारी राष्ट्रवादीच जबाबदार असल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीतीलच काही बड्या नेत्यांनी गुंठेवारीचा फायदा उठवून भूखंड हडप केले आहेत. या व्यवहारात त्यांनी कोट्यवधी रुपये मिळवल्याची चर्चा आहे. शहरातील बड्या जमीनदारांनी स्वत:च्या मालमत्ता वाचवण्यासाठी नगररचना कार्यालयाच्या वाऱ्याही केल्याचे समजते. गेल्या ३५ वर्षांत सत्ताधाऱ्यांतील काही नेत्यांनी जमीनधारकांना आरक्षणाची भीती दाखवून कमी किमतीत जागा खरेदी केल्याचेही बोलले जाते. गुंठेवारीचा फायदा उठवून काही गुंडांनी मोकळ्या जागेवर कुंपण घालून काही भूखंड हडप केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नियोजित विकास आराखड्याबाबत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आमचे काम आम्ही केले आहे. आराखडा मंजूर करण्याचे काम सरकारचे आहे’, असे सांगत त्यांनी हात वर केले. विरोधी बाकावरील विजय कुंभार, आनंदराव पवार, कपिल ओसवाल हे तर आराखड्याबाबतच अनभिज्ञ आहेत. त्यामुळे विकास आराखडा कधी मंजूर होणार?, हा प्रश्न कायम आहे.आमचे काम झाले : आता जबाबदारी सरकारचीइस्लामपूर शहराच्या नियोजित विकास आराखड्याबाबत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, ‘अनेक अडचणीतून मार्ग काढत आमचे काम आम्ही यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आराखडा मंजूर करण्याचे काम सरकारचे आहे’, असे सांगत त्यांनी हात वर केले, विरोधकही आराखड्याबाबत अनभिज्ञ आहेत. यामुळे विकास आराखड्याचे भवितव्य अद्याप तरी अधांतरी आहे.सद्यस्थितीत विकास आराखडा मंजूर होणे गरजेचे आहे. शासनदरबारातून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. ३०-३५ वर्षांहून अधिक काळ रखडलेला विकास आराखडा तातडीने मंजूर केला नाही, तर शहराचा विकास खुंटणार आहे.- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी