शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
5
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
6
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
7
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
8
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
9
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
10
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
11
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
12
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
13
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
14
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
15
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
16
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
17
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
18
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
19
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
20
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार

इस्लामपुरातील भुयारी गटार योजनेचं चांगभलं!

By admin | Updated: December 25, 2014 00:08 IST

सत्ताधाऱ्यांचा भूलभुलैया : विरोधकांची घालमेल

अशोक पाटील - इस्लामपूर पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांना विकासाचे गाजर दाखवले आहे. शहरातील भुयारी गटार योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानंतर केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्याने खा. राजू शेट्टी यांनी आपणच या योजनेसाठी निधी मंजूर करून आणल्याचे जाहीर केले. या दोघांच्यावर कडी करून भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ही योजनाच रद्द झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे सर्वसामान्यांपुढे कोण खरे, कोण खोटे? असा प्रश्न पडला आहे.सध्या शहरात अस्तित्वात असलेल्या गटारींची अवस्था दयनीय झाली आहे. बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात गटारी उपसण्याचे नाटक सत्ताधारी मंडळींनी केले. प्रभागातील बांधण्यात आलेली गटारे ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांतील काही मंडळींनी संगनमताने बांधली आहेत. त्यांचा दर्जा पाहता, सध्या ती गटारे ढासळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात डेंग्यूसारख्या आजाराचा फैलाव झाला होता. यावर आरोग्य विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही.भविष्यात शहरात भुयारी गटारी असाव्यात म्हणून जयंत पाटील यांनी सत्तेत असताना कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निधी कुठे मुरला, याचे गणित सत्ताधाऱ्यांना मांडता आले नाही. याउलट भुयारी गटार योजना होणारच, अशा भूलभुलैया मारण्यात काही नेते आघाडीवर होते. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी आपल्याच ताकदीवर या योजनेसाठी निधी उपलब्ध केल्याचे जाहीर करून तसे पत्र सादर केले आणि जयंत पाटील यांच्यावर कडी केली.या दोघांचा श्रेयवाद पेटला असताना, भाजपचे विक्रम पाटील, विजय कुंभार यांनी ही गटार योजना रद्द झाल्याचे जाहीर करून सर्वसामान्यांची स्वप्ने धुळीस मिळवली. त्यामुळे सध्या तरी सत्ताधारी आणि विरोधकांवर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार नाही. शहरातील बहुतांश विकासकामे अर्धवट राहणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. यातूनच शहरात होणाऱ्या भुयारी गटार योजनेचं चांगभलं झाल्याचे बोलले जात आहे.भविष्यात शहरात भुयारी गटारी असाव्यात यासाठी जयंत पाटील यांनी दूरदृष्टीने सत्तेत असताना या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निधी कुठे मुरला, याचे गणित सत्ताधाऱ्यांना मांडता आले नाही. याचा फटका या योजनेला बसला. परिणामी इतर विकास कामेही रखडण्याची चिन्हे आहेत.