शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

इस्लामपुरातील भुयारी गटार योजनेचं चांगभलं!

By admin | Updated: December 25, 2014 00:08 IST

सत्ताधाऱ्यांचा भूलभुलैया : विरोधकांची घालमेल

अशोक पाटील - इस्लामपूर पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांना विकासाचे गाजर दाखवले आहे. शहरातील भुयारी गटार योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानंतर केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्याने खा. राजू शेट्टी यांनी आपणच या योजनेसाठी निधी मंजूर करून आणल्याचे जाहीर केले. या दोघांच्यावर कडी करून भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाटील, विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ही योजनाच रद्द झाल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे सर्वसामान्यांपुढे कोण खरे, कोण खोटे? असा प्रश्न पडला आहे.सध्या शहरात अस्तित्वात असलेल्या गटारींची अवस्था दयनीय झाली आहे. बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात गटारी उपसण्याचे नाटक सत्ताधारी मंडळींनी केले. प्रभागातील बांधण्यात आलेली गटारे ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांतील काही मंडळींनी संगनमताने बांधली आहेत. त्यांचा दर्जा पाहता, सध्या ती गटारे ढासळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात डेंग्यूसारख्या आजाराचा फैलाव झाला होता. यावर आरोग्य विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही.भविष्यात शहरात भुयारी गटारी असाव्यात म्हणून जयंत पाटील यांनी सत्तेत असताना कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निधी कुठे मुरला, याचे गणित सत्ताधाऱ्यांना मांडता आले नाही. याउलट भुयारी गटार योजना होणारच, अशा भूलभुलैया मारण्यात काही नेते आघाडीवर होते. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी आपल्याच ताकदीवर या योजनेसाठी निधी उपलब्ध केल्याचे जाहीर करून तसे पत्र सादर केले आणि जयंत पाटील यांच्यावर कडी केली.या दोघांचा श्रेयवाद पेटला असताना, भाजपचे विक्रम पाटील, विजय कुंभार यांनी ही गटार योजना रद्द झाल्याचे जाहीर करून सर्वसामान्यांची स्वप्ने धुळीस मिळवली. त्यामुळे सध्या तरी सत्ताधारी आणि विरोधकांवर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार नाही. शहरातील बहुतांश विकासकामे अर्धवट राहणार का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. यातूनच शहरात होणाऱ्या भुयारी गटार योजनेचं चांगभलं झाल्याचे बोलले जात आहे.भविष्यात शहरात भुयारी गटारी असाव्यात यासाठी जयंत पाटील यांनी दूरदृष्टीने सत्तेत असताना या योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निधी कुठे मुरला, याचे गणित सत्ताधाऱ्यांना मांडता आले नाही. याचा फटका या योजनेला बसला. परिणामी इतर विकास कामेही रखडण्याची चिन्हे आहेत.