शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

इस्लामपूरचा आराखडा नगरपालिकेमध्ये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:46 IST

सर्वसाधारण सभा : राज्य शासनावर ठपका

इस्लामपूर : गेल्या तीन वर्षांपासून शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सभागृहाने शासनाच्या मंजुरीची वाट न बघता बहुमताने मंजुरी दिली. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी प्रशासनाच्या बेकायदेशीर कामाचे वाभाडे काढताना, विकासासाठी आलेला कोट्यवधींचा निधी कुठे मुरला, याची आठ दिवसात माहिती द्या, अशी मागणी करीत वातावरण तापवले.पालिका नाट्यगृहात नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली.बी. ए. पाटील प्रारूप विकास आराखड्यावर म्हणाले की, नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार पालिकेने कार्यवाही केलेली आहे. नियोजन समितीच्या प्रस्तावावर शासनाने किमान सहा महिन्यांत विकास योजनेचा मसुदा मंजूर करणे, प्राधिकरणाला फेरफार करण्याचे निर्देश देणे किंवा मंजुरी देण्यास नकार देऊन नवीन विकास योजना तयार करण्यासाठी निर्देश देण्याची तरतूद आहे. मात्र यावर शासनाकडून वेळेत कोणतीही वैधानिक कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी हा आराखडा तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी सभागृहाने केलेला ठराव योग्य व कायदेशीर आहे. विरोधी पक्ष नेते विजय कुंभार म्हणाले की, सभागृहाने शासनाविरोधात जाऊन ठराव करण्याची घाई करू नये. त्यासाठी थोडी वाट बघावी. त्यावर खंडेराव जाधव म्हणाले की, शासनाने वेळेत निर्णय न घेतल्याने शहराचा विकास खुंटला आहे. आता वाट बघण्यात अर्थ नाही. कुंभार यांनी गेल्या ३० वर्षात एकही आराखडा करता आला नाही, असा टोला मारला.चिमण डांगे म्हणाले की, गेली १४ महिने शासन निर्णयाची वाट पाहिली, आता मंजुरी द्या. विरोधी गटाचे कपिल ओसवाल म्हणाले की, शहर विकासाला आमचा विरोध नाही. मात्र आरक्षणानंतर हरकती घेतलेल्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे.शेवटी कुंभार व ओसवाल यांनी विरोध दर्शवल्यानंतर हा प्रारूप विकास आराखडा बहुमताने मंजूर करण्यात आला. सभेतील चर्चेत विजयभाऊ पाटील, आनंदराव मलगुंडे, अरुणादेवी पाटील यांनी भाग घेतला. (वार्ताहर)संजय कोरेंचा सत्ताधाऱ्यांवरही निशाणाउपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी प्रशासनासह सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला. तांत्रिक मंजुरी मिळण्याआधी निविदा निघते, कामे होतात. उपनगरातील नागरिकांना उपेक्षित ठेवले जाते. शेताकडे जाणाऱ्या वस्त्यांवरील रस्त्यांचे डांबरीकरण होते. डांबरीकरण, काँक्रिटीकरण फोडून पेव्हींग ब्लॉक बसवले जातात. त्यामुळे विकासासाठी आलेला पैसा कोठे गेला, याची पूर्ण माहिती आहे. आठ दिवसात या पैशांचा हिशेब द्या, अशी मागणी त्यांनी केली.