शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

इस्लामपूरचा आराखडा नगरपालिकेमध्ये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:46 IST

सर्वसाधारण सभा : राज्य शासनावर ठपका

इस्लामपूर : गेल्या तीन वर्षांपासून शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सभागृहाने शासनाच्या मंजुरीची वाट न बघता बहुमताने मंजुरी दिली. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी प्रशासनाच्या बेकायदेशीर कामाचे वाभाडे काढताना, विकासासाठी आलेला कोट्यवधींचा निधी कुठे मुरला, याची आठ दिवसात माहिती द्या, अशी मागणी करीत वातावरण तापवले.पालिका नाट्यगृहात नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वसाधारण सभा झाली.बी. ए. पाटील प्रारूप विकास आराखड्यावर म्हणाले की, नगररचना अधिनियमातील तरतुदीनुसार पालिकेने कार्यवाही केलेली आहे. नियोजन समितीच्या प्रस्तावावर शासनाने किमान सहा महिन्यांत विकास योजनेचा मसुदा मंजूर करणे, प्राधिकरणाला फेरफार करण्याचे निर्देश देणे किंवा मंजुरी देण्यास नकार देऊन नवीन विकास योजना तयार करण्यासाठी निर्देश देण्याची तरतूद आहे. मात्र यावर शासनाकडून वेळेत कोणतीही वैधानिक कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे शहराच्या नियोजनबध्द विकासासाठी हा आराखडा तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी सभागृहाने केलेला ठराव योग्य व कायदेशीर आहे. विरोधी पक्ष नेते विजय कुंभार म्हणाले की, सभागृहाने शासनाविरोधात जाऊन ठराव करण्याची घाई करू नये. त्यासाठी थोडी वाट बघावी. त्यावर खंडेराव जाधव म्हणाले की, शासनाने वेळेत निर्णय न घेतल्याने शहराचा विकास खुंटला आहे. आता वाट बघण्यात अर्थ नाही. कुंभार यांनी गेल्या ३० वर्षात एकही आराखडा करता आला नाही, असा टोला मारला.चिमण डांगे म्हणाले की, गेली १४ महिने शासन निर्णयाची वाट पाहिली, आता मंजुरी द्या. विरोधी गटाचे कपिल ओसवाल म्हणाले की, शहर विकासाला आमचा विरोध नाही. मात्र आरक्षणानंतर हरकती घेतलेल्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे.शेवटी कुंभार व ओसवाल यांनी विरोध दर्शवल्यानंतर हा प्रारूप विकास आराखडा बहुमताने मंजूर करण्यात आला. सभेतील चर्चेत विजयभाऊ पाटील, आनंदराव मलगुंडे, अरुणादेवी पाटील यांनी भाग घेतला. (वार्ताहर)संजय कोरेंचा सत्ताधाऱ्यांवरही निशाणाउपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी प्रशासनासह सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला. तांत्रिक मंजुरी मिळण्याआधी निविदा निघते, कामे होतात. उपनगरातील नागरिकांना उपेक्षित ठेवले जाते. शेताकडे जाणाऱ्या वस्त्यांवरील रस्त्यांचे डांबरीकरण होते. डांबरीकरण, काँक्रिटीकरण फोडून पेव्हींग ब्लॉक बसवले जातात. त्यामुळे विकासासाठी आलेला पैसा कोठे गेला, याची पूर्ण माहिती आहे. आठ दिवसात या पैशांचा हिशेब द्या, अशी मागणी त्यांनी केली.