शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

इस्लामपुरात विरोधकांची मोट कृष्णेच्या डोहात

By admin | Updated: June 27, 2015 00:20 IST

बाजार समिती निवडणूक : राष्ट्रवादीचा मार्ग सुकर; नेत्यांतील दुहीचे पुन्हा दर्शन

अशोक पाटील - इस्लामपूर -विधानसभा निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात एकास एक उमेदवार देण्याचा विरोधकांचा डाव अंतिमक्षणी फसला. जिल्हा बँकेत विरोधकांची मोट बांधण्यासाठी खमके नेतृत्व मिळूनही काँग्रेसला यश मिळाले नाही. आता इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील गटाविरोधात काँग्रेस, शिवसेना आणि महाडिक गटाने वेगवेगळे अर्ज भरले आहेत. यामुळे विरोधकांमध्ये एकी नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.इस्लामपूर मतदारसंघात शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, आनंदराव पवार, सी. बी. पाटील, अभिजित पाटील, जितेंद्र पाटील, वैभव पवार आदी दिग्गज नेते जयंत पाटील यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात, परंतु या विरोधकांमध्ये एकी नसल्याने, प्रत्येकवेळी जयंत पाटील बाजी मारतात. सध्या बाजार समितीतही हीच परिस्थिती असल्याने निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे चित्र आहे.शिवाजीराव नाईक आणि सी. बी. पाटील यांच्यातील दरी आजही कायम आहे. आनंदराव पवार, वैभव पवार, विक्रम पाटील यांच्यामध्ये धुसफूस आहे. नानासाहेब महाडिक, काँगे्रसचे वाळवा तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील व जितेंद्र पाटील यांच्यात अंतर्गत कलह आहे. या सर्व नेत्यांची मोट सध्यातरी कृष्णेच्या डोहात बुडाली आहे. ही मोट बांधण्यासाठी वाळवा तालुक्यात खमके नेतृत्व नाही. त्यातूनही एखादे नेतृत्व पुढे आल्यास त्याला कोणीही मान्यता देत नाही. प्रत्येकाचा अहंभाव जागा होतो. याचाच फायदा जयंत पाटील यांना मिळत आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी मोट बांधून निवडणूक लढविली. यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश मिळाले. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी वेगवेगळे अर्ज भरले असले तरी, आम्ही एकत्र येऊन एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करू.- सी. बी. पाटील, संचालक, जिल्हा बँकराष्ट्रवादीतून निवडणूक लढविणाऱ्या व्यापारी गटातील उमेदवारांनी गेल्या पाच वर्षांपासून मार्केट सेस भरलेला नाही. त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरवावेत यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. हमाल, तोलाईदार गटातून बाबूराव पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी राजारामबापू कारखान्यातील कोट्यवधीचे कंत्राट घेतले आहे. त्यालाही आक्षेप आहे.- विजय पवार, युवक काँग्रेस वाळवा तालुकाध्यक्ष.