शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

इस्लामपूर विकास आराखड्याची बैठक रद्द

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान : भाजप-राष्ट्रवादीचा वाद; ३५ वर्षांनंतरही आराखड्याला मुहूर्त नाही

अशोक पाटील --इस्लामपूर इस्लामपूर शहराच्या नियोजित विकास आराखड्याला नगरविकास खाते अंतिम मंजुरी देणार होते. परंतु भाजप-राष्ट्रवादीच्या वादात या आराखड्याचे तीनतेरा वाजले आहेत. शासनाने वेळेत मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपल्या अधिकारात विकास आराखडा मंजूर करण्याचा डाव आखला होता. परंतु शुक्रवारी ही बैठक अचानक रद्द करण्यात आली.१९८0 च्या विकास आराखड्यानंतर नियोजित विकास आराखड्याला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आराखड्याबाबतीत सर्व मुद्दे पूर्ण करुन तो अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दरबारात म्हणजे नगरविकास खात्याकडे पाठविला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याला अंतिम मंजुरी दिलेली नाही. ती मुदतीत न दिल्याने आराखडा सत्ताधारी राष्ट्रवादी आपल्या ताकदीवर स्थानिक पातळीवर मंजूर करणार होती. यासाठी त्यांनी नवीन वर्षाचा मुहूर्त साधून १ जानेवारीरोजी विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये विकास आराखडा हा एकच मुद्दा होता. परंतु ऐनवेळी ही सभाच रद्द करण्याचा निर्णय झाल्याने, यामागे नेमके काय राजकारण दडले आहे, याबाबत तर्क—वितर्क लढवले जात आहेत.इस्लामपूर शहराची लोकसंख्या आणि वाढती उपनगरे पाहता, गुंठेवारीचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे. बेकायदेशीर खरेदी व्यवहार सर्रास सुरु आहेत. बेसुमार अनधिकृत बांधकामे झाली आहेत. त्यांना सुविधा पुरविताना पालिकेपुढे अनेक अडचणी येत आहेत.२00३ मध्ये प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यात सर्वसामान्यांच्या मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात आरक्षण टाकण्यात आले होते, तर सत्ताधाऱ्यांतील काहींनी आपले भूखंड कायदेशीरित्या बिगरशेती करुन त्यांची विक्रीही केली. या साखळीमध्ये पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. या विकास आराखड्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. तो रद्द करुन, सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा तयार करुन पुन्हा मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता.त्यावरही विरोधी पक्षनेते विजय कुंभार, विक्रम पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी आणि काँग्रेसचे वैभव पवार यांनी आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिलेली नाही. त्यामुळेच सत्ताधारी आपल्या ताकदीवर हा विकास आराखडा मंजूर करण्याच्या तयारीत होते. परंतु अंतिमक्षणी यासाठी आयोजित केलेली सभाच रद्द करण्यात आली. हे कोणाच्या आदेशावरुन झाले, याची चर्चा सध्या सुरू आहे.विरोधी पक्षनेते कुंभार म्हणाले की, गेल्या ३५ वर्षांपासून पालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, तरीही त्यांना आराखडा मंजूर करता आलेला नाही. आता राज्य व केंद्रात आमची सत्ता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरणारा हा आराखडा रद्द करु. जनतेच्या हिताविरोधी कोणतेही निर्णय होऊ देणार नाही. तेरा वर्षांपूर्वीच्या आराखड्यात गोलमाल तेरा वर्षांपूर्वीच्या विकास आराखड्यात सर्वसामान्यांच्या मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात आरक्षण टाकण्यात आले होते, तर सत्ताधाऱ्यांतील काहींनी आपले भूखंड कायदेशीरित्या बिगरशेती करुन त्यांची विक्रीही केली. या साखळीमध्ये पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. या विकास आराखड्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. तो रद्द करुन, सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा तयार करुन पुन्हा मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कोण काय म्हणाले?सत्ताधाऱ्यांनी त्यांना पाहिजे तसा विकास आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत आराखडा मंजूर करुन घ्यायची घाई झाली आहे. यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे. जर सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेची यंत्रणा हाताशी धरुन हा आराखडा मंजूर केला, तर याविरोधात आम्ही लढू. आम्ही यापूर्वीच जनहित याचिका दाखल केली आहे.- वैभव पवार, माजी नगरसेवकविकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनदरबारी आहे. तो मंजूर होऊन येण्यासाठी काय निर्णय घ्यायचे, यासाठीच बैठकीचे आयोजन केले होते. परंतु शुक्रवारी लग्नाचे मुहूर्त असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. यासाठीची बैठक सर्वांना विचारात घेऊन पुन्हा घेण्यात येईल. याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, जनतेच्या हिताचेच निर्णय घेण्यात येतील. या आराखड्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. - सुभाष सूर्यवंशी, नगराध्यक्ष