शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरातील गाळे धूळ खात

By admin | Updated: November 13, 2015 23:50 IST

नगरपरिषदेचे व्यापारी संकुल : कोट्यवधींची गुंतवणूक वाऱ्यावर

युनूस शेख - इस्लामपूर नगरपालिकेच्या विकास कामांचा ढिसाळपणा स्पष्ट होऊ लागला आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा मारताना अशाश्वत आणि निकृष्ट दर्जाची कामे करणे, असे नवीन समीकरण समोर येत आहे. जुनी विकासकामे माना टाकत असताना, नवीन विकासकामे वापराविना धूळ खात आहेत. तेथे मद्यपी आणि धूम्रपानाचे अड्डे तयार झाले आहेत. शहरातील काळा मारुती मंदिराच्या पूर्वेस दुमजली व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया बांधकाम आणि दोन वर्षांनी १७ जानेवारी २०१५ ला उद्घाटन, असा प्रवास केलेली ही देखणी इमारत उद्घाटनानंतरही दहा महिने शोभेच्या बाहुलीसारखी उभी आहे. शहरातील युवकांना स्वयंरोजगार करता यावा आणि पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी, या हेतूने हे व्यापारी संकुल तयार झाले. मात्र त्याचा फायदा व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना होतच नाही, शिवाय पालिकेलाही नाही.एका बाजूला प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसताना, हे व्यापारी संकुल वापरात आणण्याचीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संकुलाचा लाभ कुणालाही मिळालेला नाही. कोट्यवधीची गुंतवणूक धूळ खात पडली आहे. शहरातील विकास कामांचा बोऱ्या उडाला आहे. जलतरण तलाव पूर्णपणे फोडून तेथे नवीन काम सुरू आहे. पूर्वीचे ४०-५० लाख पाण्यात गेले. आता नव्या कामासाठी ७० लाख धरण्यात आले आहेत. पाण्यासारख्या वाया गेलेल्या पैशाचे काय? याला उत्तर नाही. प्रशासनाची गती मंदावली आहे. पदाधिकाऱ्यांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. मती आणि गती मंदावली तर अधोगती होते, हा निसर्गनियम आहे. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी गती वाढवून विकास कामांचा लाभ नागरिकांना द्यावा, अशी अपेक्षा आहे. आधी काम : मग टेंडर!व्यापारी संकुलाच्या उभारणीपासूनच हे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘आधी काम नंतर टेंडर’ ही इथली जुनी पद्धत या कोट्यवधीच्या व्यापारी संकुल उभारणीसाठी वापरात आली. त्याविरुद्ध येथील कॉँग्रेसचे कार्यकर्ते विजय पवार, स्वाभिमानीचे महेश पाटील, अनिल नरळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात येत असताना ई-निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कारवाई झाली नाही. खासदारांच्या पत्रासही वाटाण्याच्या अक्षता जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेबाबत विभागीय आयुक्त, खासदार राजू शेट्टी यांच्याकडे तक्रारी झाल्या. खासदार शेट्टी यांनी नगरविभाग अखत्यारित असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र धाडून कारवाईची मागणी केली. त्यालाही वाटाण्याचा अक्षता लागल्या.