शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

इस्लामपुरातील गाळे धूळ खात

By admin | Updated: November 13, 2015 23:50 IST

नगरपरिषदेचे व्यापारी संकुल : कोट्यवधींची गुंतवणूक वाऱ्यावर

युनूस शेख - इस्लामपूर नगरपालिकेच्या विकास कामांचा ढिसाळपणा स्पष्ट होऊ लागला आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा मारताना अशाश्वत आणि निकृष्ट दर्जाची कामे करणे, असे नवीन समीकरण समोर येत आहे. जुनी विकासकामे माना टाकत असताना, नवीन विकासकामे वापराविना धूळ खात आहेत. तेथे मद्यपी आणि धूम्रपानाचे अड्डे तयार झाले आहेत. शहरातील काळा मारुती मंदिराच्या पूर्वेस दुमजली व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया बांधकाम आणि दोन वर्षांनी १७ जानेवारी २०१५ ला उद्घाटन, असा प्रवास केलेली ही देखणी इमारत उद्घाटनानंतरही दहा महिने शोभेच्या बाहुलीसारखी उभी आहे. शहरातील युवकांना स्वयंरोजगार करता यावा आणि पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी, या हेतूने हे व्यापारी संकुल तयार झाले. मात्र त्याचा फायदा व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांना होतच नाही, शिवाय पालिकेलाही नाही.एका बाजूला प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसताना, हे व्यापारी संकुल वापरात आणण्याचीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संकुलाचा लाभ कुणालाही मिळालेला नाही. कोट्यवधीची गुंतवणूक धूळ खात पडली आहे. शहरातील विकास कामांचा बोऱ्या उडाला आहे. जलतरण तलाव पूर्णपणे फोडून तेथे नवीन काम सुरू आहे. पूर्वीचे ४०-५० लाख पाण्यात गेले. आता नव्या कामासाठी ७० लाख धरण्यात आले आहेत. पाण्यासारख्या वाया गेलेल्या पैशाचे काय? याला उत्तर नाही. प्रशासनाची गती मंदावली आहे. पदाधिकाऱ्यांची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. मती आणि गती मंदावली तर अधोगती होते, हा निसर्गनियम आहे. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी गती वाढवून विकास कामांचा लाभ नागरिकांना द्यावा, अशी अपेक्षा आहे. आधी काम : मग टेंडर!व्यापारी संकुलाच्या उभारणीपासूनच हे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘आधी काम नंतर टेंडर’ ही इथली जुनी पद्धत या कोट्यवधीच्या व्यापारी संकुल उभारणीसाठी वापरात आली. त्याविरुद्ध येथील कॉँग्रेसचे कार्यकर्ते विजय पवार, स्वाभिमानीचे महेश पाटील, अनिल नरळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्यात येत असताना ई-निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कारवाई झाली नाही. खासदारांच्या पत्रासही वाटाण्याच्या अक्षता जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेबाबत विभागीय आयुक्त, खासदार राजू शेट्टी यांच्याकडे तक्रारी झाल्या. खासदार शेट्टी यांनी नगरविभाग अखत्यारित असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र धाडून कारवाईची मागणी केली. त्यालाही वाटाण्याचा अक्षता लागल्या.