शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

इस्लामपुरात गुन्हेगारीला ऊत!

By admin | Updated: June 22, 2015 00:12 IST

पोलिसांची निष्क्रियता चव्हाट्यावर : अधिकाऱ्यांची खोगीरभरती

युनूस शेख - इस्लामपूर -इस्लामपूर शहरासह पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे, शस्त्रे, वन्यजीवांची तस्करी, घरफोड्या, वाटमाऱ्या, महिलांच्या अंगावरील दागिन्यांची लूट, वाहन चोऱ्या अशा गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलीस ठाण्यात ११ अधिकारी असताना चोरट्यांनी उच्छाद मांडून त्यांच्या कार्यक्षमतेचे धिंडवडे काढले आहेत. तपासाच्या पातळीवर तर त्यांची कामगिरी शून्य आहे. इथे पोलीस अधिकाऱ्यांची निव्वळ खोगीर भरती झाली आहे. त्यामुळे इथे खमक्या अधिकाऱ्याची गरज आहे.सध्या इस्लामपूर पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा पोलीस उपनिरीक्षक असा ११ अधिकाऱ्यांचा फौजफाटा आहे. यांच्याबरोबर फक्त ५५ ते ६0 कर्मचारी राबत आहेत. इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील ४0 गावे आहेत. जवळपास दोन लाख लोकसंख्येचा भार या तोकड्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे इथे अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्यापेक्षा कर्तव्यकठोर अधिकारी देऊन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गजरेचे आहे. या गोष्टीची दखल नव्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी घ्यावी.गेल्या दोन वर्षांतील या पोलीस ठाण्याची तपासातील कामगिरी पाहता त्यांची कार्यक्षमता लक्षात येते. शहर व परिसरात अवैध व्यवसाय जोमात आहेत. शस्त्र तस्करी, वन्यजीवांची तस्करी, महिलांचे दागिने हातोहात लूटणाऱ्या धूम टोळ्या, वाहनांची चोरी, घरफोड्या, वाटमाऱ्या अशा पध्दतीच्या गुन्हेगारीने कळस गाठला असतानाही इथले पोलीस श्वानाच्या पाठीमागे पळण्यापर्यंतच चोरट्यांचा माग काढतात. पुढे हाती काही लागत नाही. गेल्या दोन वर्षात इथल्या अधिकाऱ्यांनी एकाही टोळीचा अथवा चोरीचा छडा लावलेला नाही. यावरुन त्यांना गुन्हे तपास व प्रगटीकरणात स्वारस्य नसल्याचे स्पष्ट होते. बोरगाव, ताकारी, कासेगाव परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत धुमाकूळ घालत पोलिसांना आव्हान दिले आहे. किरकोळ चोऱ्यांचा छडा लावू न शकणाऱ्या इथल्या पोलिसांना हे आव्हान पेलवणार का? याची सांशकता आहे. मंडलिक, आवाड पॅटर्न राबविण्याची गरजइस्लामपूर पोलीस उपविभागात गुन्हेगारांच्या उरात धडकी भरवण्याची कामगिरी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय मंडलिक, सारंग आवाड यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी केली होती. गुन्हा घडल्यास फक्त २४ ते ४८ तासांत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गुन्हेगारांना जेरबंद करण्याची खासीयत मंडलिक यांच्याकडे होती. त्यांच्या काळात पोलिसांच्या वर्दीचा धाक होता आणि सामान्य नागरिकांकडून वर्दीचा आदरही केला जात होता. सारंग आवाड यांनी तर परफेक्ट आणि सायलेंट पोलिसिंगचा दणका देत अनेकांना हिसका दाखवला होता. रात्री ११ वाजता शहरात शांतता झाली पाहिजे, असा त्यांचा खाक्या होता. त्यामुळे गुन्हेगारीला पायबंद बसला होता. आता पोलिसिंग म्हणजे फक्त वर्दीचा रुबाब, असा समज झाल्याने गुन्हेगारी बोकाळली आहे.