शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी खोटेच बोलतात

By admin | Updated: July 28, 2015 00:30 IST

विजय कुंभार : कारभाऱ्यांची हुकूमशाही, शहरातील विकासकामांची वाईट स्थिती

अशोक पाटील - इस्लामपूर पालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि त्यांचे शासकीय नियुक्त सत्तावीसावे मुख्याधिकारी नीलेश देशमुख म्हणजे ‘हायफाय’ योजनेचे पुरस्कर्ते आहेत. चार वर्षात विकास कामांची वाईट अवस्था झाली आहे. राष्ट्रवादीतील मतभेदाचा फायदा घेऊन हेच हायटेक मुख्याधिकारी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना चुकीचा सल्ला देतात. त्यामुळेच सत्ताधारी खोटे बोलतात, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.कुंभार म्हणाले, रस्ते, गटारी, वाहतूक, आरोग्य, नागरी सुविधांपासून शहर शेकडो मैल दूर आहे. गेल्या साडेचार वर्षात सत्ताधाऱ्यांचा कारभार पाहता, मुख्याधिकारी देशमुख यांनी बेकायदेशीर कामे कायदेशीर केली आहेत. विकासकामांवरील खर्चापेक्षा प्रशासकीय खर्च प्रचंड वाढवला आहे. मंजुर आकृतीबंधापेक्षा अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा भरणा केला आहे. प्रशासकीय बदल्यांच्या नावाखाली बेकायदेशीर अंतर्गत बदल्या केल्या आहेत. पालिकेचा अर्थसंकल्प वास्तववादी न करता रकमांची तोंडमिळवणी केली आहे. शासकीय लेखापरीक्षणातील आक्षेप याच मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात वाढले आहेत. त्यातील काही दोष वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूष करून दुरुस्त करुन घेतले आहेत. शासनाच्या विविध विकास कामांसाठी आलेला निधी विकास कामांवर खर्च करण्यापेक्षा हायफाय जाहिराती व सर्व्हे करणाऱ्या एजन्सीवर खर्च करुन नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेसाठी आलेला निधी संपूर्ण सर्व्हे एजन्सीवर खर्च केल्याचे दिसते. शहरातील वायफाय सेवा सुरू होण्यापूर्वीच त्याचा गाजावाजा सुरू आहे. वास्तविक पाहता, ही सेवा बी.एस.एन.एल. कडून घेणे गरजेचे असताना, नगरपालिकेने खासगी कंपनीची सेवा कार्यरत करण्याचा घाट घातला आहे, असे ते म्हणाले. दलित वस्तीअंतर्गत मिळणारा निधी सहायक संचालक नगररचना सांगली आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची मंजुरी घेऊन इतर विकास कामांसाठी बेकायदेशीररित्या वापरला जातो, असा आरोपही कुंभार यांनी केला.खासगी पुरस्कार...पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी पाणी पुरवठा पुरस्काराबाबत विरोधकांना चिमटे काढले, यावरून त्यांचे अज्ञान दिसून येते. हा पुरस्कार शासनाचा असल्याचे सांगून दिशाभूल केली आहे. खासगी नोंदणीकृत फौंडेशनचा हा पुरस्कार आहे. असे पुरस्कार राज्यातील बाजारात विकत मिळतात, असा आरोपही कुंभार यांनी केला आहे.मुख्याधिकारी देशमुख यांना आघाडी शासनाने सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाल केव्हाच पूर्ण झाला आहे. नगरविकासच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी मुक्काम वाढविला आहे. याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली असून, त्यांची बदली निश्चित आहे. बदली न झाल्यास आपण राजकारण सोडू.- विक्रम पाटील, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चाभारतीय दूरसंचार निगमच्या विविध योजना यशस्वीपणे कार्यान्वित आहेत. ब्रॉडबँड व वाय-फाय सेवा विनातक्रार व माफक दरात उपलब्ध आहेत. मात्र इस्लामपूर पालिकेने वाय-फाय योजनेसाठी आमच्याकडे कोणताही प्रस्ताव दिला नाही. प्रस्ताव दिला असता, तर मंजुरीसाठी तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असता.- प्रकाश पाटील, मंडल अधिकारी, बी.एस.एन.एल., इस्लामपूर