शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयर्विन पुलाची जागा बदलली, पीडब्ल्यूडीला माहीतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता पर्यायी पूल हरिपूररोडकडील लिंगायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता पर्यायी पूल हरिपूररोडकडील लिंगायत स्मशानभूमीजवळून जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने भूसंपादनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण पर्यायी पुलाची जागा बदलल्याची कसलीच माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही. महापालिकेच्या कार्यवाहीबाबत बांधकाम विभाग अनभिज्ञ आहे. त्यात आयर्विनजवळील पर्यायी पुलाचा आराखडा अजूनही कायम आहे. त्यामुळे पर्यायी पुलाबाबत गोंधळात नव्याने भर पडली आहे.

आयर्विन पुलाला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पूल अजूनही मजबूत असला तरी, त्याची कालमर्यादा संपली आहे. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावेळी हा मुद्दा लावून धरला. अखेर अर्थसंकल्पात नव्या पर्यायी पुलाच्या २५ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मेनरोड-कापडपेठमार्गे पांजरपोळसमोरून सांगलीवाडीतील चिंचेच्या बनापर्यंत हा पूल उभारण्याचा आराखडा तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची निविदाही काढली, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात होताच सांगलीवाडीच्या नागरिकांनी पर्यायी पुलाला विरोध करीत काम बंद पाडले. तेव्हापासून आजअखेर पुलाच्या कामाला मुहूर्त सापडलेला नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुलासंदर्भात मंत्रालयातही बैठका झाल्या.

आता पर्यायी पुलाची जागा बदलल्याचे सांगितले जात आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी विकास आराखड्यातील सांगलीवाडी ते हरिपूर रोडपर्यंतच्या ८० फुटी रस्त्याच्या भूसंपादनासाठी समिती स्थापन केल्यानंतर या चर्चेला उधाण आले. त्यामुळे आता आयर्विनचा पर्यायी पुल या रस्त्यावर होणार असल्याचे सांगितले जात आहे, पण सार्वजनिक बांधकाम विभागाला जागा बदलल्याची अथवा सध्याचा पुलाचा आराखडा रद्द केल्याची कसलीच माहिती नाही. आजही पूर्वीचा आराखडा कायम असून, तो रद्द करता येत नसल्याचे मत बांधकाम विभागाचे आहे. त्यामुळे नेमका गोंधळ काय हे प्रशासकीय स्तरावरही अजून स्पष्ट झालेला नाही.

चौकट

जुना आराखडा कायमच

आयर्विनजवळ पर्यायी पूल उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी २५ कोटींची तरतूदही केली आहे. त्याचा निविदा काढून ठेकेदाराला वर्कऑर्डरही देण्यात आली आहे. त्यामुळे हा आराखडा अजूनही कायम आहे. त्यात लिंगायत स्मशानभूमीकडे पुलाचे काम करण्याचे झाल्यास नव्याने तांत्रिक मान्यता, आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यात आता आयर्विनजवळच नवीन पूल असावा, असाही मोठा मतप्रवाह आहे. त्यामुळे पुलाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे.