शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मिरजेची सुधारित पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Updated: November 5, 2014 00:09 IST

जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर काम : ४५ कोटींच्या योजनेचा खर्च ७० कोटींवर

सदानंद औंधे- मिरज -मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठ्यासाठी जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठा ताण आहे. मिरजेच्या सुधारित नळपाणी योजनेला केंद्र शासनाच्या मंजुरीअभावी ४५ कोटींच्या नळपाणी योजनेचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे. मिरज शहरासाठीची ५० हजार लोकसंख्येला नळ पाणीपुरवठा करणारी जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरत आहे. जुन्या योजनेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, जीर्ण जलवाहिन्या फुटल्याने वारंवार पाणीपुरवठा खंडित होणे, असे प्रकार सुरू आहेत. मिरज शहरासाठी दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मिरजेत २० हजार ४७९ नळ जोडण्या आहेत. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. मात्र सुधारित नळपाणी पुरवठा योजनेकडे महापालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. १७ वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेला कर्जाऊ निधी मिळण्यासाठी योजनेचा आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली नसल्याने ४५ कोटींचा खर्च आता ७० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. सुधारित नळपाणीपुरवठा रखडल्याने तीन कोटी खर्चाची कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनी, अडीच कोटी खर्च करून जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली. भारतनगर, किल्ला भाग, इंदिरानगर, मगदूम मळा येथे पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. समतानगर, वखार भाग, कुपवाड रोड येथे नवीन पाण्याच्या टाक्यांची आवश्यकता असल्याने याठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. २०३७ पर्यंत मिरजेची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सुधारित नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्याच्या सुजल योजनेतून नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुजल योजनेतून सुधारित नळ पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून व कर्ज मिळते; मात्र केंद्र व राज्य शासनाने योजनेसाठी अर्थसहाय्य दिले नसल्याने मिरजेची नळ पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मिरजेच्या नेत्यांचे दुर्लक्षसांगली शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली; मात्र मिरजेची योजना रखडली आहे. महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील महापालिकेचे नेतृत्व करीत असताना व महापालिकेत काँग्रेस सत्तेवर आल्यानंतरही केंद्र व राज्य शासनाकडे मिरजेच्या नळपाणी योजनेबाबत पाठपुरावा झाला नाही. भाजपचे शासन असताना मिरजेचे लोकप्रतिनिधी या योजनेसाठी प्रयत्न करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. जुन्या पाईपलाईनला गळतीमिरज शहर व विस्तारित भागात सुमारे ३५० किलो मीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या जलवाहिन्या आहेत. जुन्या जलवाहिन्या जिर्ण व अपुऱ्या असल्याने वारंवार गळती होऊन सांडपाणी मिसळते. यामुळे शहरातील अनेक भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. जुन्या जलवाहिन्या बदलण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरीअभावी जुनी पाणी पुरवठा यंत्रणा अद्याप वापरात आहे. शहराच्या विस्तारित भागात समतानगर ते कोल्हापूर रस्त्यापर्यंत अद्याप जलवाहिनी नसल्याने येथील नागरिक कूपनलिकेवर अवलंबून आहेत.