शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

मिरजेची सुधारित पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Updated: November 5, 2014 00:09 IST

जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर काम : ४५ कोटींच्या योजनेचा खर्च ७० कोटींवर

सदानंद औंधे- मिरज -मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठ्यासाठी जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठा ताण आहे. मिरजेच्या सुधारित नळपाणी योजनेला केंद्र शासनाच्या मंजुरीअभावी ४५ कोटींच्या नळपाणी योजनेचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे. मिरज शहरासाठीची ५० हजार लोकसंख्येला नळ पाणीपुरवठा करणारी जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरत आहे. जुन्या योजनेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, जीर्ण जलवाहिन्या फुटल्याने वारंवार पाणीपुरवठा खंडित होणे, असे प्रकार सुरू आहेत. मिरज शहरासाठी दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मिरजेत २० हजार ४७९ नळ जोडण्या आहेत. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. मात्र सुधारित नळपाणी पुरवठा योजनेकडे महापालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. १७ वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेला कर्जाऊ निधी मिळण्यासाठी योजनेचा आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली नसल्याने ४५ कोटींचा खर्च आता ७० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. सुधारित नळपाणीपुरवठा रखडल्याने तीन कोटी खर्चाची कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनी, अडीच कोटी खर्च करून जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली. भारतनगर, किल्ला भाग, इंदिरानगर, मगदूम मळा येथे पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. समतानगर, वखार भाग, कुपवाड रोड येथे नवीन पाण्याच्या टाक्यांची आवश्यकता असल्याने याठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. २०३७ पर्यंत मिरजेची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सुधारित नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्याच्या सुजल योजनेतून नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुजल योजनेतून सुधारित नळ पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून व कर्ज मिळते; मात्र केंद्र व राज्य शासनाने योजनेसाठी अर्थसहाय्य दिले नसल्याने मिरजेची नळ पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मिरजेच्या नेत्यांचे दुर्लक्षसांगली शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली; मात्र मिरजेची योजना रखडली आहे. महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील महापालिकेचे नेतृत्व करीत असताना व महापालिकेत काँग्रेस सत्तेवर आल्यानंतरही केंद्र व राज्य शासनाकडे मिरजेच्या नळपाणी योजनेबाबत पाठपुरावा झाला नाही. भाजपचे शासन असताना मिरजेचे लोकप्रतिनिधी या योजनेसाठी प्रयत्न करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. जुन्या पाईपलाईनला गळतीमिरज शहर व विस्तारित भागात सुमारे ३५० किलो मीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या जलवाहिन्या आहेत. जुन्या जलवाहिन्या जिर्ण व अपुऱ्या असल्याने वारंवार गळती होऊन सांडपाणी मिसळते. यामुळे शहरातील अनेक भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. जुन्या जलवाहिन्या बदलण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरीअभावी जुनी पाणी पुरवठा यंत्रणा अद्याप वापरात आहे. शहराच्या विस्तारित भागात समतानगर ते कोल्हापूर रस्त्यापर्यंत अद्याप जलवाहिनी नसल्याने येथील नागरिक कूपनलिकेवर अवलंबून आहेत.