शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

मिरजेची सुधारित पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Updated: November 5, 2014 00:09 IST

जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर काम : ४५ कोटींच्या योजनेचा खर्च ७० कोटींवर

सदानंद औंधे- मिरज -मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठ्यासाठी जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठा ताण आहे. मिरजेच्या सुधारित नळपाणी योजनेला केंद्र शासनाच्या मंजुरीअभावी ४५ कोटींच्या नळपाणी योजनेचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे. मिरज शहरासाठीची ५० हजार लोकसंख्येला नळ पाणीपुरवठा करणारी जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरत आहे. जुन्या योजनेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, जीर्ण जलवाहिन्या फुटल्याने वारंवार पाणीपुरवठा खंडित होणे, असे प्रकार सुरू आहेत. मिरज शहरासाठी दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मिरजेत २० हजार ४७९ नळ जोडण्या आहेत. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. मात्र सुधारित नळपाणी पुरवठा योजनेकडे महापालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. १७ वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेला कर्जाऊ निधी मिळण्यासाठी योजनेचा आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली नसल्याने ४५ कोटींचा खर्च आता ७० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. सुधारित नळपाणीपुरवठा रखडल्याने तीन कोटी खर्चाची कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनी, अडीच कोटी खर्च करून जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली. भारतनगर, किल्ला भाग, इंदिरानगर, मगदूम मळा येथे पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. समतानगर, वखार भाग, कुपवाड रोड येथे नवीन पाण्याच्या टाक्यांची आवश्यकता असल्याने याठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. २०३७ पर्यंत मिरजेची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सुधारित नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्याच्या सुजल योजनेतून नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुजल योजनेतून सुधारित नळ पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून व कर्ज मिळते; मात्र केंद्र व राज्य शासनाने योजनेसाठी अर्थसहाय्य दिले नसल्याने मिरजेची नळ पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मिरजेच्या नेत्यांचे दुर्लक्षसांगली शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली; मात्र मिरजेची योजना रखडली आहे. महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील महापालिकेचे नेतृत्व करीत असताना व महापालिकेत काँग्रेस सत्तेवर आल्यानंतरही केंद्र व राज्य शासनाकडे मिरजेच्या नळपाणी योजनेबाबत पाठपुरावा झाला नाही. भाजपचे शासन असताना मिरजेचे लोकप्रतिनिधी या योजनेसाठी प्रयत्न करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. जुन्या पाईपलाईनला गळतीमिरज शहर व विस्तारित भागात सुमारे ३५० किलो मीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या जलवाहिन्या आहेत. जुन्या जलवाहिन्या जिर्ण व अपुऱ्या असल्याने वारंवार गळती होऊन सांडपाणी मिसळते. यामुळे शहरातील अनेक भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. जुन्या जलवाहिन्या बदलण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरीअभावी जुनी पाणी पुरवठा यंत्रणा अद्याप वापरात आहे. शहराच्या विस्तारित भागात समतानगर ते कोल्हापूर रस्त्यापर्यंत अद्याप जलवाहिनी नसल्याने येथील नागरिक कूपनलिकेवर अवलंबून आहेत.