शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेची सुधारित पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Updated: November 5, 2014 00:09 IST

जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर काम : ४५ कोटींच्या योजनेचा खर्च ७० कोटींवर

सदानंद औंधे- मिरज -मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडल्याने वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठ्यासाठी जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर मोठा ताण आहे. मिरजेच्या सुधारित नळपाणी योजनेला केंद्र शासनाच्या मंजुरीअभावी ४५ कोटींच्या नळपाणी योजनेचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे. मिरज शहरासाठीची ५० हजार लोकसंख्येला नळ पाणीपुरवठा करणारी जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरत आहे. जुन्या योजनेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने शहरातील अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, जीर्ण जलवाहिन्या फुटल्याने वारंवार पाणीपुरवठा खंडित होणे, असे प्रकार सुरू आहेत. मिरज शहरासाठी दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मिरजेत २० हजार ४७९ नळ जोडण्या आहेत. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. मात्र सुधारित नळपाणी पुरवठा योजनेकडे महापालिकेचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. १७ वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेला कर्जाऊ निधी मिळण्यासाठी योजनेचा आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे नळपाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली नसल्याने ४५ कोटींचा खर्च आता ७० कोटींपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. सुधारित नळपाणीपुरवठा रखडल्याने तीन कोटी खर्चाची कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनी, अडीच कोटी खर्च करून जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात आली. भारतनगर, किल्ला भाग, इंदिरानगर, मगदूम मळा येथे पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. समतानगर, वखार भाग, कुपवाड रोड येथे नवीन पाण्याच्या टाक्यांची आवश्यकता असल्याने याठिकाणी नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याचा प्रस्ताव आहे. २०३७ पर्यंत मिरजेची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सुधारित नळ पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्याच्या सुजल योजनेतून नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सुजल योजनेतून सुधारित नळ पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून व कर्ज मिळते; मात्र केंद्र व राज्य शासनाने योजनेसाठी अर्थसहाय्य दिले नसल्याने मिरजेची नळ पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. मिरजेच्या नेत्यांचे दुर्लक्षसांगली शहरासाठी सुधारित नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली; मात्र मिरजेची योजना रखडली आहे. महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील महापालिकेचे नेतृत्व करीत असताना व महापालिकेत काँग्रेस सत्तेवर आल्यानंतरही केंद्र व राज्य शासनाकडे मिरजेच्या नळपाणी योजनेबाबत पाठपुरावा झाला नाही. भाजपचे शासन असताना मिरजेचे लोकप्रतिनिधी या योजनेसाठी प्रयत्न करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. जुन्या पाईपलाईनला गळतीमिरज शहर व विस्तारित भागात सुमारे ३५० किलो मीटर लांबीच्या मोठ्या व छोट्या जलवाहिन्या आहेत. जुन्या जलवाहिन्या जिर्ण व अपुऱ्या असल्याने वारंवार गळती होऊन सांडपाणी मिसळते. यामुळे शहरातील अनेक भागात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. जुन्या जलवाहिन्या बदलण्याची अत्यंत आवश्यकता असतानाही नळ पाणीपुरवठा योजनेस मंजुरीअभावी जुनी पाणी पुरवठा यंत्रणा अद्याप वापरात आहे. शहराच्या विस्तारित भागात समतानगर ते कोल्हापूर रस्त्यापर्यंत अद्याप जलवाहिनी नसल्याने येथील नागरिक कूपनलिकेवर अवलंबून आहेत.