शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पुणदीची वाटचाल शंभर टक्के ठिबक सिंचनाकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:01 IST

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचनाने युक्त करण्याचे शिवधनुष्य तासगाव तालुक्यातील पुणदी गावाने उचलले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ८५ टक्के ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचनाने युक्त करण्याचे शिवधनुष्य तासगाव तालुक्यातील पुणदी गावाने उचलले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ८५ टक्के ठिबक सिंचन पूर्ण झाले आहे. संपूर्ण गावाने शेतीसाठी हा पर्याय स्वीकारल्याने दुष्काळमुक्तीचा आदर्श निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सिंचन योजना कार्यरत असल्या तरी, त्यांची वाढत चाललेली थकबाकी आणि पाण्याचे नियोजन कोलमडत असल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ येते. स्वत:च्या मौल्यवान ऐवजाचे आपण जसे रक्षण करतो, तशी मानसिकता पाणी वापरताना कोणामध्ये आढळून येत नाही. मात्र, पुणदी गावाने पाण्याचे मोल जाणले आहे. येथे ज्यांची शेती ठिबकवर नाही, त्यांना पाणी व ग्रामपंचायतीच्या सुविधा मिळणार नाहीत, असा ठरावच सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. आजवर या गावातील ८५ टक्के शेतकºयांनी ठिबक केले असून, येत्या काही दिवसात गाव १०० टक्के ठिबकयुक्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे.तासगाव तालुक्यातील पुणदी गावात तीन हजार एकर शेतीक्षेत्र आहे. गावात ५९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव आहे. तरीही गावात टंचाई निर्माण होत असे. तत्कालीन उपसरपंच व तासगाव बाजार समितीचे विद्यमान सभापती रवींद्र पाटील यांनी दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामसभेत, संपूर्ण गाव ठिबक सिंचनयुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. गावकºयांनी त्याला पाठिंबा दिला. जो ठिबक सिंचन करणार नाही, त्यास तलावातून पाणी न देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. ही मात्रा चांगलीच लागू पडली आणि अखेर संपूर्ण शिवार ठिबक सिंचनाकडे वळले. परिणामी पाण्याचा बेसुमार वापर टळला. आता गावात एकही पीक पाटाच्या पाण्यावर घेतले जात नाही. सध्याच्या कडक उन्हाळ्यातही गावात हिरवाई टिकून आहे. ताकारी योजनेतून तलाव भरण्यात येतो. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात जास्त पाणीसाठा पुणदी तलावात आहे.