शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पुणदीची वाटचाल शंभर टक्के ठिबक सिंचनाकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:01 IST

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचनाने युक्त करण्याचे शिवधनुष्य तासगाव तालुक्यातील पुणदी गावाने उचलले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ८५ टक्के ...

शरद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : पाण्याचा वापर जपून करावा किंवा पाण्याला संपत्ती मानावी, ही धारणा अनेकांमध्ये नसतेच. शेतीसाठी जपून पाणी वापरण्याऐवजी ‘डुबूक’ पध्दतीला प्राधान्य देण्यात येते. मात्र, या पाण्याचे मोल जाणून संपूर्ण गाव ठिंबक सिंचनाने युक्त करण्याचे शिवधनुष्य तासगाव तालुक्यातील पुणदी गावाने उचलले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ८५ टक्के ठिबक सिंचन पूर्ण झाले आहे. संपूर्ण गावाने शेतीसाठी हा पर्याय स्वीकारल्याने दुष्काळमुक्तीचा आदर्श निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सिंचन योजना कार्यरत असल्या तरी, त्यांची वाढत चाललेली थकबाकी आणि पाण्याचे नियोजन कोलमडत असल्याने शेतकऱ्यांना उभ्या पिकावर नांगर फिरविण्याची वेळ येते. स्वत:च्या मौल्यवान ऐवजाचे आपण जसे रक्षण करतो, तशी मानसिकता पाणी वापरताना कोणामध्ये आढळून येत नाही. मात्र, पुणदी गावाने पाण्याचे मोल जाणले आहे. येथे ज्यांची शेती ठिबकवर नाही, त्यांना पाणी व ग्रामपंचायतीच्या सुविधा मिळणार नाहीत, असा ठरावच सर्वानुमते संमत करण्यात आला आहे. आजवर या गावातील ८५ टक्के शेतकºयांनी ठिबक केले असून, येत्या काही दिवसात गाव १०० टक्के ठिबकयुक्त होण्याकडे वाटचाल सुरू आहे.तासगाव तालुक्यातील पुणदी गावात तीन हजार एकर शेतीक्षेत्र आहे. गावात ५९ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव आहे. तरीही गावात टंचाई निर्माण होत असे. तत्कालीन उपसरपंच व तासगाव बाजार समितीचे विद्यमान सभापती रवींद्र पाटील यांनी दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामसभेत, संपूर्ण गाव ठिबक सिंचनयुक्त करण्याचा प्रस्ताव मांडला. गावकºयांनी त्याला पाठिंबा दिला. जो ठिबक सिंचन करणार नाही, त्यास तलावातून पाणी न देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली. ही मात्रा चांगलीच लागू पडली आणि अखेर संपूर्ण शिवार ठिबक सिंचनाकडे वळले. परिणामी पाण्याचा बेसुमार वापर टळला. आता गावात एकही पीक पाटाच्या पाण्यावर घेतले जात नाही. सध्याच्या कडक उन्हाळ्यातही गावात हिरवाई टिकून आहे. ताकारी योजनेतून तलाव भरण्यात येतो. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्वात जास्त पाणीसाठा पुणदी तलावात आहे.