शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वैभव शिंदे यांना जयंतरावांकडून राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा शहर विकास आघाडीचे नेते, माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा शहर विकास आघाडीचे नेते, माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची येथे एका कार्यक्रमात भेट झाली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे सध्या भाजपमध्ये असलेले शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सुरुवातीला एकमेकांचे विरोधक होते. मात्र, नव्वदच्या दशकानंतर दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शिंदे यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. आष्टा नगरपालिकेची सूत्रेही शिंदे यांच्याकडे देण्यात आली, तर त्यांचे पुत्र वैभव यांना पंचायत समिती देण्यात आली.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राष्ट्रवादीची उमेदवारी वैभव शिंदे यांना देण्यात आली. त्यांच्या विरोधात तत्कालीन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र सागर व अपक्ष म्हणून संभाजी कचरे रिंगणात होते. कचरे विजयी झाले. हा पराभव जिव्हारी लागलेल्या शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर करून आणले. दरम्यान, विलासराव शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी जयंत पाटील यांनी, ‘वैभव व विशाल शिंदे आमचेच आहेत, त्यांच्या पाठीशी आहोत’, असे सांगितले होते. त्यामुळे वैभव शिंदे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असे चित्र निर्माण झाले. मात्र, त्यानंतर शांतता होती.

दरम्यान, आता जयंत पाटील यांनी आष्टा शहरातील बूथ कमिटी अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी वैभव शिंदे उपस्थित नव्हते. तथापि, रविवारी शिंदे व पाटील यांची तांदूळवाडी येथील कार्यक्रमात दिलखुलास चर्चा रंगली. यावेळी पाटील यांनी शिंदे यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे शिंदे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार का, याची चर्चा रंगली आहे.

कोट

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीत राजकीय चर्चाही झाली. पाटील यांनी राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. आष्टा शहर विकास आघाडी व विलासराव शिंदेप्रेमी कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी निर्णय घेऊ.

- वैभव शिंदे, आष्टा शहर विकास आघाडी