शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

संगीता खोत यांच्या शपथपत्राची चौकशी

By admin | Updated: January 7, 2015 23:25 IST

निवडणूक आयोगाचे आदेश : महापालिकेकडून कारवाईस टाळाटाळ

मिरज : मिरजेत महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या स्वाभिमानी आघाडीच्या संगीता विठ्ठल खोत यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिला आहे. संगीता खोत यांनी निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याची तक्रार पराभूत राष्ट्रवादी उमेदवार रूबाबबी रफिक खतीब यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत एक वर्षापूर्वी निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना तक्रारीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते; मात्र महापालिका आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाला कोणताही अहवाल सादर केला नाही. त्यामुळे रूबाबबी खतीब यांनी आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळे कारवाईला टाळाटाळ होत असल्याची तक्रार पुन्हा निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयुक्त अजिज कारचे यांना तत्काळ कारवाई करून तक्रारीबाबत तातडीने अहवाल देण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागळे यांनी दिला आहे. राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाने आयुक्तांकडे विचारणा केली आहे. निवडणूक गैरप्रकाराबाबत आयुक्तांनी न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे रूबाबबी खतीब यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीत संगीता विठ्ठल खोत यांनी निवडणुकीचे शपथपत्र जोडलेले होते. त्यामध्ये अपूर्ण व चुकीची माहिती दिल्याची तक्रार रूबाबी रफिक खतीब यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. याबाबत निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना यापूर्वी तक्रारीबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते. मात्र महापालिका आयुक्तांनी आजपर्यंत कोणताही अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला नाही. त्यामुळे रूबाबबी रफिक खतीब यांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे राजकीय दबावामुळे कारवाईला टाळाटाळ होत असल्याची तक्रार केली. (वार्ताहर)उच्च न्यायालयात दाद मागणार : खतीबनिवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त अजिज कारचे यांना तात्काळ कारवाईचे आदेश देऊन त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव नि. ज. वागळे यांनी महापालिकेला दिला आहे. राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाने आयुक्तांकडे विचारणा केली आहे. महापालिका आयुक्तांनी न्याय नाही दिला तर, आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे खतीब यांनी सांगितले.