शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या विचारधारेवर आक्रमण

By admin | Updated: September 3, 2016 01:06 IST

पृथ्वीराज चव्हाण : काँग्रेसच्या प्रचार प्रारंभात एकजुटीवर विचारमंथन

देवराष्ट्रे : लोकशाहीच्या विचारधारेवर आक्रमण होत आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. राज्य सरकार चालवते, की अधिकारी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांवर हल्ले होत असून, प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंंडवडे निघाले आहेत. या व्यवस्थेला फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या निवडणूक प्रचार प्रारंभप्रसंगी बोलत होते. या सरकारने जातीयवादाला खत-पाणी घालून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अशा व्यवस्थेमुळे वैचारिक आक्रमण वाढून लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आ. सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार हाफिज धत्तुरे, सांगलीचे प्रभारी प्रकाश सातपुते, माजी आ. उमाजी सनमडीकर, शैलजा पाटील प्रमुख उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, असंघटित शेतकऱ्यांचा लाभ उठवत दूध व कांद्यासह शेतीमालाचे भाव पाडले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवून सर्व निधी व कार्यालये विदर्भाकडे वळविण्याचा घाट सुरू आहे. हा दुजाभाव करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की विदर्भाचे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राज्य सरकारमधील १२ दिग्गज मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोक संतप्त होऊन मोर्चे काढत आहेत. असे असताना मुख्यमंत्री पक्षांतर्गत विरोधकांचा काटा काढण्यात दंग आहेत. खडसेंना घालवले, मग इतरांना का नाही? पतंगराव कदम म्हणाले, काँग्रगसने गट-तट बाजूला सारून एका विचाराने निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. यावेळी प्रतिक पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनीमनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील, डॉ. जितेश कदम, भीमराव मोहिते, इंद्रजित साळुंखे, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब पाटील, महादेव पाटील, ए. डी. पाटील, पी. एम. पाटील, श्रीकांत लाड, सभापती आकांक्षा तांबेवाघ, महेंद्र लाड, सखाराम सूर्यवंशी, सुरेश मोहिते, सतीश पाटील, सुरेश शिंंदे, राजू मोरे, लता महाडिक, विठ्ठल मुळीक, विजय मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)भाषण काँग्रेसचे, साथ शिवसेनेला!खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने एकीचे बळ दाखवले असते, तर चित्र वेगळे दिसले असते. अनेक नेत्यांनी भाषण काँग्रेसचे केले आणि साथ मात्र शिवसेनेला दिली. त्यांच्याबरोबर जायचे नाही आणि तिकडे गेल्याशिवाय राहायचे नाही, अशी अवस्था झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसून नेत्यांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम जो दूर क रेल, त्याच्याबरोबर आम्ही आहे, अशी भूमिका माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केली.