शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

लोकशाहीच्या विचारधारेवर आक्रमण

By admin | Updated: September 3, 2016 01:06 IST

पृथ्वीराज चव्हाण : काँग्रेसच्या प्रचार प्रारंभात एकजुटीवर विचारमंथन

देवराष्ट्रे : लोकशाहीच्या विचारधारेवर आक्रमण होत आहे. सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. राज्य सरकार चालवते, की अधिकारी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांवर हल्ले होत असून, प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने कायदा सुव्यवस्थेचे धिंंडवडे निघाले आहेत. या व्यवस्थेला फडणवीस सरकार जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ते देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे काँग्रेसच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या निवडणूक प्रचार प्रारंभप्रसंगी बोलत होते. या सरकारने जातीयवादाला खत-पाणी घालून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या अशा व्यवस्थेमुळे वैचारिक आक्रमण वाढून लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आ. सदाशिवराव पाटील, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार हाफिज धत्तुरे, सांगलीचे प्रभारी प्रकाश सातपुते, माजी आ. उमाजी सनमडीकर, शैलजा पाटील प्रमुख उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, असंघटित शेतकऱ्यांचा लाभ उठवत दूध व कांद्यासह शेतीमालाचे भाव पाडले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विकास थांबवून सर्व निधी व कार्यालये विदर्भाकडे वळविण्याचा घाट सुरू आहे. हा दुजाभाव करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की विदर्भाचे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. राज्य सरकारमधील १२ दिग्गज मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. लोक संतप्त होऊन मोर्चे काढत आहेत. असे असताना मुख्यमंत्री पक्षांतर्गत विरोधकांचा काटा काढण्यात दंग आहेत. खडसेंना घालवले, मग इतरांना का नाही? पतंगराव कदम म्हणाले, काँग्रगसने गट-तट बाजूला सारून एका विचाराने निवडणुका जिंकणे गरजेचे आहे. यावेळी प्रतिक पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनीमनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील, डॉ. जितेश कदम, भीमराव मोहिते, इंद्रजित साळुंखे, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब पाटील, महादेव पाटील, ए. डी. पाटील, पी. एम. पाटील, श्रीकांत लाड, सभापती आकांक्षा तांबेवाघ, महेंद्र लाड, सखाराम सूर्यवंशी, सुरेश मोहिते, सतीश पाटील, सुरेश शिंंदे, राजू मोरे, लता महाडिक, विठ्ठल मुळीक, विजय मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)भाषण काँग्रेसचे, साथ शिवसेनेला!खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने एकीचे बळ दाखवले असते, तर चित्र वेगळे दिसले असते. अनेक नेत्यांनी भाषण काँग्रेसचे केले आणि साथ मात्र शिवसेनेला दिली. त्यांच्याबरोबर जायचे नाही आणि तिकडे गेल्याशिवाय राहायचे नाही, अशी अवस्था झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नसून नेत्यांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम जो दूर क रेल, त्याच्याबरोबर आम्ही आहे, अशी भूमिका माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केली.