शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदलीवरून सावळागोंधळ

By admin | Updated: June 17, 2016 00:23 IST

सोयीसाठी पदाधिकारी आग्रही : नियमानुसारच बदल्या झाल्याचा सीईओंचा दावा

सांगली : आंतरजिल्हा बदलीतून जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांच्या बदलीवरून जिल्हा परिषदेत सुरू असलेला गोंधळ थांबण्याची चिन्हे नसून, या शिक्षकांची सोय कमी अन् गैरसोयच जास्त झाल्याच्या तक्रारी होत आहेत. दरम्यान, पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या सोयींचा आग्रह सुरू असतानाच, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मात्र, शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बदलीची प्रक्रिया राबविली असून यात बदल करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.दरम्यान, शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीला झालेला विलंब, सीईटीतील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देताना झालेली दिरंगाई व पदाधिकाऱ्यांत बदलीवरून असलेले मतभेद याचा फटका या शिक्षकांना बसला आहे. यामुळे शाळा सुरू झाल्या तरी अजूनही बदल्यांचा घोळ सुरूच असल्याचे चित्र आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून जिल्हा परिषदेकडे ७७ शिक्षक हजर झाले होते. मुख्याध्यापकांची पदोन्नती न झाल्याने रिक्त जागांवर पदस्थापना थांबली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली प्रक्रिया राबवित या शिक्षकांना बदलीचे आदेश जारी केले होते. मात्र, यात त्या शिक्षकांची सोय कमी आणि गैरसोयच अधिक झाल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या होत्या.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, मुख्याध्यापकांना पदोन्नती देऊन अथवा रिक्त असलेल्या जागांवर नियुक्ती देण्यासंदर्भात शिक्षण विभागाला पुरेसा वेळ दिला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने बदली प्रक्रिया राबविण्यात आली. बदली करत असताना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व इतर शिफारशींचा विचार करण्यात आलेला आहे. याबाबतचा आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करत बदल्या केल्या असल्याने, या बदल्यांचे आदेश रद्द करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठीच बदली प्रक्रिया शिक्षण विभाग व पदाधिकाऱ्यांना बदलीसाठी पुरेसा वेळ दिला होता. मात्र, त्यांनी ती राबविल्याने आपल्या अधिकारात या बदल्या केल्या आहेत. जिल्ह्यातील ६६ शाळांमध्ये तर शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकच नसल्याने या बदल्या करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठीच ही प्रक्रिया राबविल्याचे सीईओ डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.