शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात निकालाची उत्सुकता शिगेला

By admin | Updated: October 18, 2014 23:52 IST

प्रशासन सज्ज : कडेकोट पोलीस बंदोबस्त

सांगली : उमेदवारांची वाढलेली धडधड, कार्यकर्ते, नागरिकांमध्ये शिगेला गेलेली उत्सुकता, चर्चा आणि अंदाजांना आलेले उधाण यांना पूर्णविराम देत उद्या, रविवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. जिल्ह्यातील तुल्यबळ लढतींमुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, निकालानंतर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत आहेत. गेले महिनाभर विधानसभा निवडणुकीचा धडाका सुरू होता. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत दिग्गज नेते रिंगणात आहेत. सहा माजी मंत्र्यांसह सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अनेकांच्या अस्तित्वाची ही लढाई असल्यामुळे या उमेदवारांवर निकालाबाबत कमालीचे दडपण आले आहे. प्रथमच चौरंगी, पंचरंगी आणि बहुरंगी लढती होत असल्याने निकालाबाबतचे अंदाज बांधणे मुश्कील होत आहे. उमेदवारही संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली आहे. कार्यकर्ते, उमेदवारांचे समर्थक आणि नागरिकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या दुपारी बारापर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा फैसला होणार आहे. मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. कोणाच्या घरी दिवाळी ?आमदारकीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि खरी दिवाळी कोणाच्या दारी साजरी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आठ विजयी उमेदवार वगळता अन्य ९९ उमेदवारांच्या पदरी निराशा येणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी कोणासाठी लाभदायी ठरणार, याची चर्चा रंगली आहे.