शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

शेतकऱ्यांना व्याजमाफीचे गाजर

By admin | Updated: January 4, 2017 23:09 IST

जयंत पाटील : गौंडवाडी येथे विविध विकास कामांचा प्रारंभ

इस्लामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतरच्या पन्नासाव्या दिवशी केलेल्या भाषणात देशातील जनतेला काळ्या धनाचा हिशेब द्यायला हवा होता़ मात्र त्यांनी त्याबद्दल ब्र शब्दही काढला नाही. उलट नोटाबंदीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांच्या व्याजमाफीचे गाजर दाखविले आहे, असे मत माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केले. आम्हाला कोणाचा पराभव करायचा नसून, गेल्या २५-३0 वर्षात केलेला विकास रथ पुढे घेऊन जायचा आहे, अशा शब्दात त्यांनी निवडणुकीमागील भूमिकाही स्पष्ट केली.गौंडवाडी (ता़ वाळवा) येथे ९0 लाख रूपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याची योजना व १0 लाख रुपये खर्चून बांधलेल्या नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन आ़ पाटील यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संजय पाटील, महिला राष्ट्रवादी तालुकाध्यक्षा सौ़ सुस्मिता जाधव उपस्थित होत्या़ राजू मुल्ला, सचिन मोहिते यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.आ़ पाटील म्हणाले, बोरगाव जि़ प़ मतदारसंघामध्ये सर्वांच्या मान्यतेने उमेदवार निश्चित करू़ मात्र एकदा उमेदवार निश्चित झाला की, सर्व राग-लोभ, गट-तट बाजूला ठेवून त्याच्या पाठीशी उभे राहा़ ज्याप्रमाणे मला विधानसभेला मतदान करता, त्याप्रमाणे या निवडणुकांमध्येही मतदान व्हायला हवे़ सभापती रवींद्र बर्डे, विनायकराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. विश्वास चव्हाण, बाबासाहेब चव्हाण यांनी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीवरील पत्रा काढून टुमदार इमारत दिली, तसेच गावाला शुध्द व मुबलक पिण्याच्या पाण्याची योजना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नितीन चव्हाण, महेश जाधव, सुरेश हुडे यांनी मनोगत व्यक्त के ले.याप्रसंगी सुभाषराव पाटील, नंदकुमार पाटील, कार्तिक पाटील, माणिक पाटील, उदय शिंदे, दत्ता खोत, धनाजी पाटील, आनंदराव लकेसर, वसंत कदम, काकासाहेब यादव, शंकर यादव, जयकर साटपे, प्रशांत कदम, विनायक यादव, सुरेखा चव्हाण, पूनम निकम, पुष्पा कुंभार, अनिल चव्हाण, तुषार चव्हाण, बापूसाहेब चव्हाण, ज्योती चव्हाण उपस्थित होते़ अनिल चव्हाण यांनी आभार मानले, शंकर कदम-ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)चर्चा : मतदारांशीमतदारांशी चर्चा करूनच येथील उमेदवार निश्चित करणार आहे. यामुळे सामान्य कार्यकर्त्यापासून पदाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनी यासाठी प्रयत्न करा. सर्वांंच्या इच्छेनुसार उमेदवार ठरणार असल्याने गट-तट विसरून प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले. रवींद्र बर्डे, विनायकराव पाटील यांनी पिण्याच्या पाण्याची योजना दिल्याबद्दलही या कार्यक्रमामध्ये कृतज्ञता व्यक्त केली.