शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बुद्धिमत्ता चाचणी पेपरची फेरतपासणी नाहीच!

By admin | Updated: May 31, 2016 00:29 IST

पालकांची तक्रार : शिष्यवृत्ती निकालात पुन्हा गोलमाल

कडेगाव : चौथीची राज्यस्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा बंद झाली आणि सांगली जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर परीक्षा घेतली. या शिष्यवृत्ती निकालात पुन्हा गोलमाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.या परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम खासगी एजन्सीकडे दिले होते. यासाठी दोन लाख रुपये खर्च केले. परंतु निकालात मात्र मोठ्या प्रमाणावर गोलमाल असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत फेरतपासणीसाठी पालकांचे अर्ज मागवले. फेरतपासणीत भाषा आणि गणित विषयांच्या गुणांमध्ये बदल झाले. परंतु बुद्धिमत्ता चाचणी या पेपरची फेरतपासणी झालीच नाही, अशी तक्रार कडेगाव तालुक्यातील काही पालकांनी केली आहे.कडेगाव जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी सई प्रदीप महाडिक हिला भाषा विषयात ९८ गुण आहेत, तर गणित विषयात ९६ गुण आहेत. याच विद्यार्थिनीला बुद्धिमत्ता चाचणी विषयात मात्र १०० पैकी फक्त ६० गुण मिळाले आहेत. बुद्धिमत्ता चाचणी या विषयात १०० पैकी १०० गुण असतील व जिल्ह्यात प्रथम क्रमांकही माझाच असेल, असा विश्वास सई प्रदीप महाडिक हिने व्यक्त केला आहे. या प्रथम क्रमांकाच्या दावेदार मुलीच्या पालकांनीही तिची उत्तरपत्रिका त्रयस्थ शिक्षक किंवा अधिकाऱ्यांना दाखवावी आणि फेरतपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शाळेचाच विश्वजित शिवनंदन पवार या कडेगाव जि. प. विद्यार्थ्यांला बुद्धिमत्ता चाचणी या विषयात फक्त दोन गुण मिळाले आहेत. हा मुलगा आणि त्याचे पालकही, गुणवत्ता यादीत स्थान मिळणारच, असा दावा करीत आहेत. असामान्य बौद्धिक क्षमतेच्या या मुलाला फक्त दोन गुण मिळतात, यावरून पेपर तपासणीत गोलमाल असल्याचे स्पष्ट होते.बुद्धिमत्ता चाचणीचे पेपर पुन्हा तपासले जावेत किंवा उत्तरपत्रिका पालक किंवा त्रयस्थांना दाखवाव्यात, अशी मागणी विश्वजितच्या पालकांनी केली आहे. अशाप्रकारे फेरतपासणीतही गोलमाल झाल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)उत्तरपत्रिका दाखविणार - नीशादेवी वाघमोडेचौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या फेरतपासणीतील निकालाबाबतही पालकांच्या तक्रारी आहेत. संबंधित पालकांना उत्तरपत्रिका दाखविण्याचीही आमची तयारी आहे, असे शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी सांगितले.‘लोकमत’चा दणकाचौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर तपासणीत गोलमाल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. यावर फेरतपासणी झाली आणि काही विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, तर काही विद्यार्थ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. कडेगावचे दोन विद्यार्थी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.