शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

बुद्धिमत्ता चाचणी पेपरची फेरतपासणी नाहीच!

By admin | Updated: May 31, 2016 00:29 IST

पालकांची तक्रार : शिष्यवृत्ती निकालात पुन्हा गोलमाल

कडेगाव : चौथीची राज्यस्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा बंद झाली आणि सांगली जिल्हा परिषदेने जिल्हास्तरावर परीक्षा घेतली. या शिष्यवृत्ती निकालात पुन्हा गोलमाल झाल्याचे स्पष्ट होत आहे. पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.या परीक्षेच्या पेपर तपासणीचे काम खासगी एजन्सीकडे दिले होते. यासाठी दोन लाख रुपये खर्च केले. परंतु निकालात मात्र मोठ्या प्रमाणावर गोलमाल असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत फेरतपासणीसाठी पालकांचे अर्ज मागवले. फेरतपासणीत भाषा आणि गणित विषयांच्या गुणांमध्ये बदल झाले. परंतु बुद्धिमत्ता चाचणी या पेपरची फेरतपासणी झालीच नाही, अशी तक्रार कडेगाव तालुक्यातील काही पालकांनी केली आहे.कडेगाव जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी सई प्रदीप महाडिक हिला भाषा विषयात ९८ गुण आहेत, तर गणित विषयात ९६ गुण आहेत. याच विद्यार्थिनीला बुद्धिमत्ता चाचणी विषयात मात्र १०० पैकी फक्त ६० गुण मिळाले आहेत. बुद्धिमत्ता चाचणी या विषयात १०० पैकी १०० गुण असतील व जिल्ह्यात प्रथम क्रमांकही माझाच असेल, असा विश्वास सई प्रदीप महाडिक हिने व्यक्त केला आहे. या प्रथम क्रमांकाच्या दावेदार मुलीच्या पालकांनीही तिची उत्तरपत्रिका त्रयस्थ शिक्षक किंवा अधिकाऱ्यांना दाखवावी आणि फेरतपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शाळेचाच विश्वजित शिवनंदन पवार या कडेगाव जि. प. विद्यार्थ्यांला बुद्धिमत्ता चाचणी या विषयात फक्त दोन गुण मिळाले आहेत. हा मुलगा आणि त्याचे पालकही, गुणवत्ता यादीत स्थान मिळणारच, असा दावा करीत आहेत. असामान्य बौद्धिक क्षमतेच्या या मुलाला फक्त दोन गुण मिळतात, यावरून पेपर तपासणीत गोलमाल असल्याचे स्पष्ट होते.बुद्धिमत्ता चाचणीचे पेपर पुन्हा तपासले जावेत किंवा उत्तरपत्रिका पालक किंवा त्रयस्थांना दाखवाव्यात, अशी मागणी विश्वजितच्या पालकांनी केली आहे. अशाप्रकारे फेरतपासणीतही गोलमाल झाल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)उत्तरपत्रिका दाखविणार - नीशादेवी वाघमोडेचौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या फेरतपासणीतील निकालाबाबतही पालकांच्या तक्रारी आहेत. संबंधित पालकांना उत्तरपत्रिका दाखविण्याचीही आमची तयारी आहे, असे शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी सांगितले.‘लोकमत’चा दणकाचौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर तपासणीत गोलमाल झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. यावर फेरतपासणी झाली आणि काही विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, तर काही विद्यार्थ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. कडेगावचे दोन विद्यार्थी अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.