शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विमा कंपन्या मालामाल, अडीच कोटी भरले, मिळाले २७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील पिकांना विम्याचे सुरक्षाकवच देऊ पाहणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या पदरात मिळणारी भरपाई आणि विमा कंपन्यांचा होणारा फायदा यात ...

सांगली : जिल्ह्यातील पिकांना विम्याचे सुरक्षाकवच देऊ पाहणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या पदरात मिळणारी भरपाई आणि विमा कंपन्यांचा होणारा फायदा यात मोठी तफावत आहे. जिल्ह्यात २०२०-२१ वर्षातील खरीप पिकांसाठी २ कोटी ५६ लाखांचा विमा हप्ता भरून शेतकऱ्यांना केवळ २६ लाखांची भरपाई मिळाली असून, याेजनेतून कंपनीच्या पदरात सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम मिळाली.

वर्षानुवर्षे पीक विमा योजनांच्या माध्यमातून विमा कंपन्याच मालामाल होताना दिसत आहेत. दरवर्षी भरपाईसाठी दावा करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येते. दावा करणाऱ्यांपैकी केवळ काहीच शेतकऱ्यांना भरपाई मिळत असल्याचा अनुभवही जुना आहे. पीक विम्यातील ही नफेखोरी रोखण्यासाठी शासनाने वारंवार काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्यक्षात त्यांना अद्याप यश मिळाले नाही. अजूनही या कंपन्याच फायद्यात आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फायदा या कंपन्यांना शेतकरी व शासनाच्या हप्त्यातून मिळत असतो. हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

मागील खरीप हंगामातही शेतकऱ्यांच्या विमासंरक्षित रकमेच्या हप्त्याचा विचार केल्यास त्याच्या १०.६७ टक्केच रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. म्हणजेच सुमारे ८९ टक्के रकमेचा फायदा विमा कंपनीला झाला.

चौकट

एकूण मंजूर पीक विमा १२८,३७,४०,०००

एकूण सहभागी शेतकरी ९०,५४७

भरलेला विमा हप्ता २,५६,८२,५३९

नुकसानभरपाई २७,४२,४२६

भरपाई मिळालेले शेतकरी ६९१

हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे शेतकरी २०,७६०

फळपीक योजनेअंतर्गत भरलेला हप्ता ८,५४,३६,०००

फळपीक नुकसानीपोटी मिळालेली भरपाई ३७,८०,०००

चौकट

खरीप हंगाम २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र ५०,८९८ हेक्टर

एकूण जमा रक्कम २७,४२,४२६

चौकट

हजारो शेतकरी बाद

नुकसानीचे दावे हे ऑनलाईन होत असल्याने त्याची माहिती कृषी विभागाकडे येत नाही. तरीही जिल्ह्यातील सुमारे ४० हजारांवर शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल कंपन्यांकडे दावे दाखल केले होते. यात खरिपासह फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून नियमांचा तोटा होऊन दावे नामंजूर होण्याचे प्रमाण अधिक आहे. सांगली जिल्ह्यासह राज्यातील एकूण परिस्थिती पाहिली तर, दरवर्षी लाखो शेतकऱ्यांचे विमा दावे नामंजूर होत असतात. याबद्दल शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

चौकट

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अधिक फटका

गेल्या तीन वर्षांतील दावे नामंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहिली, तर आटपाडी, जत, खानापूर या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा जास्त समावेश आहे. छोट्या-छोट्या गावातील या लोकांचे ऑनलाईन दावे होताना त्यात त्रुटी राहण्याची शक्यता आहे; मात्र त्यावरच बोट ठेवून दावे नामंजूर करण्याकडे कंपन्यांचा कल असतो.

कोट