शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्या मालामाल, अडीच कोटी भरले, मिळाले २७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील पिकांना विम्याचे सुरक्षाकवच देऊ पाहणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या पदरात मिळणारी भरपाई आणि विमा कंपन्यांचा होणारा फायदा यात ...

सांगली : जिल्ह्यातील पिकांना विम्याचे सुरक्षाकवच देऊ पाहणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या पदरात मिळणारी भरपाई आणि विमा कंपन्यांचा होणारा फायदा यात मोठी तफावत आहे. जिल्ह्यात २०२०-२१ वर्षातील खरीप पिकांसाठी २ कोटी ५६ लाखांचा विमा हप्ता भरून शेतकऱ्यांना केवळ २६ लाखांची भरपाई मिळाली असून, याेजनेतून कंपनीच्या पदरात सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम मिळाली.

वर्षानुवर्षे पीक विमा योजनांच्या माध्यमातून विमा कंपन्याच मालामाल होताना दिसत आहेत. दरवर्षी भरपाईसाठी दावा करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येते. दावा करणाऱ्यांपैकी केवळ काहीच शेतकऱ्यांना भरपाई मिळत असल्याचा अनुभवही जुना आहे. पीक विम्यातील ही नफेखोरी रोखण्यासाठी शासनाने वारंवार काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्यक्षात त्यांना अद्याप यश मिळाले नाही. अजूनही या कंपन्याच फायद्यात आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फायदा या कंपन्यांना शेतकरी व शासनाच्या हप्त्यातून मिळत असतो. हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

मागील खरीप हंगामातही शेतकऱ्यांच्या विमासंरक्षित रकमेच्या हप्त्याचा विचार केल्यास त्याच्या १०.६७ टक्केच रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. म्हणजेच सुमारे ८९ टक्के रकमेचा फायदा विमा कंपनीला झाला.

चौकट

एकूण मंजूर पीक विमा १२८,३७,४०,०००

एकूण सहभागी शेतकरी ९०,५४७

भरलेला विमा हप्ता २,५६,८२,५३९

नुकसानभरपाई २७,४२,४२६

भरपाई मिळालेले शेतकरी ६९१

हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे शेतकरी २०,७६०

फळपीक योजनेअंतर्गत भरलेला हप्ता ८,५४,३६,०००

फळपीक नुकसानीपोटी मिळालेली भरपाई ३७,८०,०००

चौकट

खरीप हंगाम २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र ५०,८९८ हेक्टर

एकूण जमा रक्कम २७,४२,४२६

चौकट

हजारो शेतकरी बाद

नुकसानीचे दावे हे ऑनलाईन होत असल्याने त्याची माहिती कृषी विभागाकडे येत नाही. तरीही जिल्ह्यातील सुमारे ४० हजारांवर शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल कंपन्यांकडे दावे दाखल केले होते. यात खरिपासह फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून नियमांचा तोटा होऊन दावे नामंजूर होण्याचे प्रमाण अधिक आहे. सांगली जिल्ह्यासह राज्यातील एकूण परिस्थिती पाहिली तर, दरवर्षी लाखो शेतकऱ्यांचे विमा दावे नामंजूर होत असतात. याबद्दल शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

चौकट

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अधिक फटका

गेल्या तीन वर्षांतील दावे नामंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहिली, तर आटपाडी, जत, खानापूर या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा जास्त समावेश आहे. छोट्या-छोट्या गावातील या लोकांचे ऑनलाईन दावे होताना त्यात त्रुटी राहण्याची शक्यता आहे; मात्र त्यावरच बोट ठेवून दावे नामंजूर करण्याकडे कंपन्यांचा कल असतो.

कोट