शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्या मालामाल, अडीच कोटी भरले, मिळाले २७ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

सांगली : जिल्ह्यातील पिकांना विम्याचे सुरक्षाकवच देऊ पाहणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या पदरात मिळणारी भरपाई आणि विमा कंपन्यांचा होणारा फायदा यात ...

सांगली : जिल्ह्यातील पिकांना विम्याचे सुरक्षाकवच देऊ पाहणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या पदरात मिळणारी भरपाई आणि विमा कंपन्यांचा होणारा फायदा यात मोठी तफावत आहे. जिल्ह्यात २०२०-२१ वर्षातील खरीप पिकांसाठी २ कोटी ५६ लाखांचा विमा हप्ता भरून शेतकऱ्यांना केवळ २६ लाखांची भरपाई मिळाली असून, याेजनेतून कंपनीच्या पदरात सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम मिळाली.

वर्षानुवर्षे पीक विमा योजनांच्या माध्यमातून विमा कंपन्याच मालामाल होताना दिसत आहेत. दरवर्षी भरपाईसाठी दावा करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात येते. दावा करणाऱ्यांपैकी केवळ काहीच शेतकऱ्यांना भरपाई मिळत असल्याचा अनुभवही जुना आहे. पीक विम्यातील ही नफेखोरी रोखण्यासाठी शासनाने वारंवार काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्यक्षात त्यांना अद्याप यश मिळाले नाही. अजूनही या कंपन्याच फायद्यात आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फायदा या कंपन्यांना शेतकरी व शासनाच्या हप्त्यातून मिळत असतो. हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

मागील खरीप हंगामातही शेतकऱ्यांच्या विमासंरक्षित रकमेच्या हप्त्याचा विचार केल्यास त्याच्या १०.६७ टक्केच रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. म्हणजेच सुमारे ८९ टक्के रकमेचा फायदा विमा कंपनीला झाला.

चौकट

एकूण मंजूर पीक विमा १२८,३७,४०,०००

एकूण सहभागी शेतकरी ९०,५४७

भरलेला विमा हप्ता २,५६,८२,५३९

नुकसानभरपाई २७,४२,४२६

भरपाई मिळालेले शेतकरी ६९१

हवामान आधारित फळपीक विमा योजनेचे शेतकरी २०,७६०

फळपीक योजनेअंतर्गत भरलेला हप्ता ८,५४,३६,०००

फळपीक नुकसानीपोटी मिळालेली भरपाई ३७,८०,०००

चौकट

खरीप हंगाम २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र ५०,८९८ हेक्टर

एकूण जमा रक्कम २७,४२,४२६

चौकट

हजारो शेतकरी बाद

नुकसानीचे दावे हे ऑनलाईन होत असल्याने त्याची माहिती कृषी विभागाकडे येत नाही. तरीही जिल्ह्यातील सुमारे ४० हजारांवर शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबद्दल कंपन्यांकडे दावे दाखल केले होते. यात खरिपासह फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून नियमांचा तोटा होऊन दावे नामंजूर होण्याचे प्रमाण अधिक आहे. सांगली जिल्ह्यासह राज्यातील एकूण परिस्थिती पाहिली तर, दरवर्षी लाखो शेतकऱ्यांचे विमा दावे नामंजूर होत असतात. याबद्दल शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

चौकट

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अधिक फटका

गेल्या तीन वर्षांतील दावे नामंजूर झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहिली, तर आटपाडी, जत, खानापूर या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचा जास्त समावेश आहे. छोट्या-छोट्या गावातील या लोकांचे ऑनलाईन दावे होताना त्यात त्रुटी राहण्याची शक्यता आहे; मात्र त्यावरच बोट ठेवून दावे नामंजूर करण्याकडे कंपन्यांचा कल असतो.

कोट