शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

कृष्णा नदी अखंडित वाहती ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक

By अशोक डोंबाळे | Updated: March 15, 2024 15:58 IST

कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ४७.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. टंचाई काळासाठी म्हणून वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे, अशी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.

सांगली : कोयना धरणामध्ये सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ४७.५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. टंचाई काळासाठी म्हणून वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी मिळावे, अशी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. कोयना धरणात मुबलक पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडी पडण्याचे कारण काय, असा सवालही सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला. यापुढे कृष्णा नदी अखंडित वाहती राहिली पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याबद्दल कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार यांनी सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेतली. यावेळी खाडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, औद्योगिक क्षेत्रातही पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोयना, वारणासह सर्व धरणांमध्ये वीजनिर्मितीसाठी आवश्यक तेवढे पाणी ठेवूनही कृष्णा नदीत पाणी सोडण्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली आहे. वीजनिर्मितीमधील १२ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे. पण, सांगली जिल्ह्याच्या वाट्यातील ४७.५ टीएमसी पाण्याचा पूर्ण वापर केला नाही. सांगली जिल्ह्याच्या हक्काचे ते सर्व पाणी वापरल्यानंतर जादा १२ टीएमसी पाणी मिळणार आहे. कुठेही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.पाण्यासाठी नागरिकांचे हाल

जलसंपदा विभाग कोयना, वारणा आदी धरणांतून वीजनिर्मितीचे कारण पुढे करून पुरेसे पाणी नदीत सोडत नाहीत. त्यामुळे या नद्यांच्या काठावरील सर्व रब्बी पिके धोक्यात आली आहेत. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. औद्योगिक क्षेत्रातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही अधिकारी पाणी व्यवस्थापन गांभीर्याने करत नाहीत. सातारा जिल्ह्यातील नेते पाण्याचे राजकारण करत आहेत, असा आरोप पूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, विजयकुमार दिवाण यांनी केला.