शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

कदमांवर टीका करण्याऐवजी जत तालुक्याचे प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 22:50 IST

काँग्रेसचा जगतापांना टोला : पाणी प्रश्न मार्गी लावा

जत : आ. विलासराव जगताप यांनी भारती विद्यापीठाची नाहक बदनामी करण्यापेक्षा तालुक्यातील विकासकामांवर लक्ष केंद्रित करून पाण्याचा प्रश्न निकालात काढावा, अशी टीका जत तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी केली आहे. ते म्हणाले की, जगताप यांनी तालुक्यातील चारा, पाणी, वीज दाबनियमन, विभाजन या प्रमुख महत्त्वाच्या प्रश्नांवर विधानसभेत कितीवेळा आवाज उठविला आहे किंवा संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे कितीवेळा कामाचा पाठपुरावा केला आहे, हे त्यांनी जाहीर करावे. आ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून रुग्ण सुविधा, विविध शैक्षणिक सुविधा माफक दरात उपलब्ध केल्या आहेत. आ. विलासराव जगताप यांची लोकप्रियता कमी झाली आहे. त्यामुळे आ. पतंगराव कदम यांच्यावर खोटे आरोप करून ते प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. भारती विद्यापीठ जमीन खरेदी प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी करावी. परंतु नाहक बदनामी करू नये, असेही म्हटले आहे.बिरनाळ, शेगाव साठवण तलाव पाणी पूजन व विविध रस्ते आणि इतर कामे आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजूर होऊन त्यासाठी त्यावेळी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. परंतु या कामाचे फुकटचे श्रेय आ. विलासराव जगताप घेत आहेत, असा आरोप प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. जत पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे का, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची सत्ता आहे, ते समजून येत नाही. जर तेथे भाजपची सत्ता असेल, तर त्यांनी तसे जाहीर करावे. स्वार्थासाठी पक्षाचा वापर करून जगताप यांनी आमदारकी मिळविली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची पक्षनिष्ठा किती आहे, ते तपासून पहावे, असे आवाहनही केले आहे. यावेळी बाजार समिती सभापती संतोष पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, मल्लेश कत्ती, नगरसेवक सुजय शिंदे, मोहन कुलकर्णी व रवींद्र सावंत, बाबासाहेब कोडग, आप्पाराया बिराजदार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)खोट्या आश्वासनांबद्दल जगतापांनी खुलासा करावाउमदी येथील पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांनी खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली आहे. यासंदर्भात त्यांनी खुलासा करावाग्रामपंचायत, जिल्हा बॅँक, बाजार समिती निवडणूक याठिकाणी आ. जगताप यांना हार पत्करावी लागल्यामुळे ते बेताल आरोप करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.