शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

सांगलीत २५ जुलैला चातुर्मास कलश स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST

सांगली : सकल दिगंबर जैन समाज, जैनाचार्य विद्यासागरजी सामाजिक प्रतिष्ठान व जैनाचार्य विद्यासागरजी जीवदया न्यास यांच्यावतीने नेमिनाथनगर येथील प्रथमाचार्य ...

सांगली : सकल दिगंबर जैन समाज, जैनाचार्य विद्यासागरजी सामाजिक प्रतिष्ठान व जैनाचार्य विद्यासागरजी जीवदया न्यास यांच्यावतीने नेमिनाथनगर येथील प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी संत निवास येथे चातुर्मासनिमित्त पावन वर्षा योग होणार आहे. यानिमित्ताने रविवार, २५ जुलै रोजी कलश स्थापना होणार आहे, अशी माहिती चातुर्मास संयोजन समितीचे मुख्य संयोजक सुरेश पाटील व जैनाचार्य विद्यासागरजी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, प.पु. संतशिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी मुनिराज यांच्या आशीर्वादाने त्यांचे शिष्य प. पू. मुनिश्री १०८ पवित्रसागर महाराज व प.पू. मुनिश्री १०८ सूपार्श्वसागर महाराज यांचा पवित्र पावन वर्षायोग होणार आहे. कलश स्थापना रविवारी दुपारी दीड वाजता होणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या या चातुर्मासात धर्म प्रभावनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प. पू. पवित्रसागर व प.पू. मुनिश्री सूपार्श्वसागर महाराज यांचे प्रवचन होणार आहे. पवित्रसागर महाराज हे पूर्वाश्रमीचे जबलपूर-मध्य प्रदेशचे असून, हा ३५ वा चातुर्मास प्रथमच सांगलीत होत आहे. त्यांचा जैन धर्माच्या अहिंसा विषयावरील विशेष अभ्यास असून, प्रभावी प्रवचनकार आहेत. त्यांचा लाभ प्रथमच सांगलीकरांना मिळणार आहे.

मुनिश्री सूपार्श्वसागर महाराज हे पूर्वाश्रमीचे समडोळी येथील असून, त्यांचा धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास आहे. धर्मप्रभावनेवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. या कलश स्थापनेच्या कार्यक्रमाचे लाईव्ह यू-ट्यूबवर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्रावक-श्राविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ब्रह्मचारी तात्यासाहेब नेजकर यांच्या मार्गदर्शनाखालील टीममार्फत कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.