शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

चिकुर्डे मंडलच्या मध्यावर पर्जन्यमापक यंत्र बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील चिकुर्डे महसूल मंडलमधील पर्जन्यमापक यंत्र मंडलच्या मध्यवर्ती भागात बसवावे, अशी मागणी ढगेवाडी, कार्वे, ऐतवडे ...

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील चिकुर्डे महसूल मंडलमधील पर्जन्यमापक यंत्र मंडलच्या मध्यवर्ती भागात बसवावे, अशी मागणी ढगेवाडी, कार्वे, ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता यावेत, यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारावे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सतत निसर्गाचा लहरीपणा दिसून येत आहे. त्याचा फटका विहीर बागायत शेतकऱ्यांना बसत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमुळे शेतकरी नेहमे संकटात सापडत आहेत. मंडलमध्ये झालेल्या पावसाचे मोजमाप घेण्यासाठी पर्जन्यमापक असले तरी आज घडीला ते कालबाह्य ठरत आहे. चिकुर्डे मंडलमध्ये ११ गावांचा समावेश आहे, पण मंडलपासून ते शेवटच्या गावापर्यंतचे अंतर १२ किलोमीटर आहे. त्यामुळे मंडलमधील पर्जन्यमापक यंत्र शोभेची वस्तू बनल्यामुळे २०१९ मध्ये गावे दुष्काळी यादीतून वगळली. कार्वे, ढगेवाडी, शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुक या चार विहीर बागायत ग्रामस्थांनी उपोषण केले. निवडणुकीवर बहिष्काराचा इशाराही दिला. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी पर्जन्यमापक यंत्र मंडलच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवून तो प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. याबाबत सबनीस म्हणाले की, प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला आहे. मंजुरी मिळाली की ते काम मार्गी लागेल.

चौकट

शासनाकडे पाठपुरावा सुरू

पर्जन्यमापक यंत्र लवकर बसवून मिळावे, यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, शशिकांत शेटे यांनी दिली.

चौकट...

पर्जन्यमापक यंत्र शोभेची वस्तू..

गेली तीन ते चार वर्षे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. चिकुर्डे महसूल मंडलमध्ये पावसाचे मोजमाप घेण्यासाठी पर्जन्यमापक यंत्र आहे, ते कोठे आहे, याचा शोध युवक घेत आहेत. संबंधित विभागातील अधिकारीही त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. हे यंत्र म्हणजे शोभेची वस्तू बनली असल्याचे मंडलमधील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.