शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

चिकुर्डे मंडलच्या मध्यावर पर्जन्यमापक यंत्र बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:31 IST

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील चिकुर्डे महसूल मंडलमधील पर्जन्यमापक यंत्र मंडलच्या मध्यवर्ती भागात बसवावे, अशी मागणी ढगेवाडी, कार्वे, ऐतवडे ...

ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील चिकुर्डे महसूल मंडलमधील पर्जन्यमापक यंत्र मंडलच्या मध्यवर्ती भागात बसवावे, अशी मागणी ढगेवाडी, कार्वे, ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी या गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता यावेत, यासाठी स्वयंचलित हवामान केंद्र उभारावे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत सतत निसर्गाचा लहरीपणा दिसून येत आहे. त्याचा फटका विहीर बागायत शेतकऱ्यांना बसत आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमुळे शेतकरी नेहमे संकटात सापडत आहेत. मंडलमध्ये झालेल्या पावसाचे मोजमाप घेण्यासाठी पर्जन्यमापक असले तरी आज घडीला ते कालबाह्य ठरत आहे. चिकुर्डे मंडलमध्ये ११ गावांचा समावेश आहे, पण मंडलपासून ते शेवटच्या गावापर्यंतचे अंतर १२ किलोमीटर आहे. त्यामुळे मंडलमधील पर्जन्यमापक यंत्र शोभेची वस्तू बनल्यामुळे २०१९ मध्ये गावे दुष्काळी यादीतून वगळली. कार्वे, ढगेवाडी, शेखरवाडी, ऐतवडे बुद्रुक या चार विहीर बागायत ग्रामस्थांनी उपोषण केले. निवडणुकीवर बहिष्काराचा इशाराही दिला. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी पर्जन्यमापक यंत्र मंडलच्या मध्यवर्ती ठिकाणी बसवून तो प्रश्न मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. याबाबत सबनीस म्हणाले की, प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी पाठवला आहे. मंजुरी मिळाली की ते काम मार्गी लागेल.

चौकट

शासनाकडे पाठपुरावा सुरू

पर्जन्यमापक यंत्र लवकर बसवून मिळावे, यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, शशिकांत शेटे यांनी दिली.

चौकट...

पर्जन्यमापक यंत्र शोभेची वस्तू..

गेली तीन ते चार वर्षे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. चिकुर्डे महसूल मंडलमध्ये पावसाचे मोजमाप घेण्यासाठी पर्जन्यमापक यंत्र आहे, ते कोठे आहे, याचा शोध युवक घेत आहेत. संबंधित विभागातील अधिकारीही त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. हे यंत्र म्हणजे शोभेची वस्तू बनली असल्याचे मंडलमधील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.