शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिकच्या रस्त्यांची त्रयस्थातर्फे चौकशी

By admin | Updated: July 19, 2014 23:23 IST

अधिकाऱ्यांना इशारा : नियोजन समितीचा १७५ कोटींचा आराखडा मंजूर

सांगली : जिल्ह्यातील विशेषत: मिरज पूर्वभागातील रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब झाला असून, याची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा आज (शनिवार) नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. यावेळी जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा १७५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले. कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात सभा झाली. यावेळी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, आ. सदाशिवराव पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. प्रकाश शेंडगे, पालक सचिव एस. एस. संधू, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, महापालिका आयुक्त अजिज कारचे आदी उपस्थित होते. कदम म्हणाले की, मिरज पूर्वभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यासाठी अठरा कोटी मंजूर झाले आहेत. झालेल्या रस्त्यांबाबत तक्रारी आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांच्या दर्जाबाबत त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी करण्यात येईल. योजना आराखड्यातून होणाऱ्या सर्वच कामांची वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचे नियोजन आहे. रस्त्याच्या कामाची सर्व माहिती वेबसाईटवर टाकली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा योग्य पध्दतीने खर्च होणे बंधनकारक आहे. कामांच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड सहन केली जाणार नाही. याची दखल घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)तुम्ही सांगाल तो उमेदवार भाजप देईल!नियोजन समितीमध्ये भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे बोलण्यासाठी उभे राहिले असता, पतंगराव त्यांना म्हणाले की, यावेळी जतमधून भाजपकडून तुम्ही उभे राहणार का विलासराव जगताप?, यावर शेंडगे यांनी आधी टंचाईवर बोलूया, असे सांगितले. त्यानंतर पतंगरावांनी हाच प्रश्न जगतापांना विचारला. यानंतर जगताप म्हणाले की, साहेब तुम्ही सांगाल तो उमेदवार भाजप देईल. यावर हशा पिकला. पाणी योजनातून काही सदस्यांनी मोफत पाणी देण्याची मागणी केली. त्यावर सध्याचे पाणी केवळ पिण्यासाठीच असून, शेतीसाठी नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. फुकटचे पाणी दिल्यास सिंचन योजना बंद पडतील, असा इशारा त्यांनी दिला.