शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिकच्या रस्त्यांची त्रयस्थातर्फे चौकशी

By admin | Updated: July 19, 2014 23:23 IST

अधिकाऱ्यांना इशारा : नियोजन समितीचा १७५ कोटींचा आराखडा मंजूर

सांगली : जिल्ह्यातील विशेषत: मिरज पूर्वभागातील रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब झाला असून, याची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करून यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा आज (शनिवार) नियोजन समितीच्या सभेत पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. यावेळी जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा १७५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले. कदम यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात सभा झाली. यावेळी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराज पाटील, आ. सदाशिवराव पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. प्रकाश शेंडगे, पालक सचिव एस. एस. संधू, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, महापालिका आयुक्त अजिज कारचे आदी उपस्थित होते. कदम म्हणाले की, मिरज पूर्वभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यासाठी अठरा कोटी मंजूर झाले आहेत. झालेल्या रस्त्यांबाबत तक्रारी आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांच्या दर्जाबाबत त्रयस्थ एजन्सीमार्फत चौकशी करण्यात येईल. योजना आराखड्यातून होणाऱ्या सर्वच कामांची वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विशेष पथकामार्फत तपासणी करण्याचे नियोजन आहे. रस्त्याच्या कामाची सर्व माहिती वेबसाईटवर टाकली जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध होणाऱ्या निधीचा योग्य पध्दतीने खर्च होणे बंधनकारक आहे. कामांच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड सहन केली जाणार नाही. याची दखल घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)तुम्ही सांगाल तो उमेदवार भाजप देईल!नियोजन समितीमध्ये भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे बोलण्यासाठी उभे राहिले असता, पतंगराव त्यांना म्हणाले की, यावेळी जतमधून भाजपकडून तुम्ही उभे राहणार का विलासराव जगताप?, यावर शेंडगे यांनी आधी टंचाईवर बोलूया, असे सांगितले. त्यानंतर पतंगरावांनी हाच प्रश्न जगतापांना विचारला. यानंतर जगताप म्हणाले की, साहेब तुम्ही सांगाल तो उमेदवार भाजप देईल. यावर हशा पिकला. पाणी योजनातून काही सदस्यांनी मोफत पाणी देण्याची मागणी केली. त्यावर सध्याचे पाणी केवळ पिण्यासाठीच असून, शेतीसाठी नसल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. फुकटचे पाणी दिल्यास सिंचन योजना बंद पडतील, असा इशारा त्यांनी दिला.