शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सांगली जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रियेची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:29 IST

निकाल हा कंपनीमार्फत की बँकेमार्फत दिलेला आहे, हेच समजत नाही. याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नुकत्याच करण्यात आलेल्या चारशे लिपिक पदांच्या भरतीची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी काही उमेदवारांच्यावतीने बँक प्रशासन आणि जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले. भरती प्रक्रियेची चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँकेच्या लिपिकवर्गीय चारशे पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र टेक्निकल इस्टिट्यूट आॅफ सॉफ्टवेअर हार्डवेअर अमरावती या कंपनीची नियुक्ती केली होती. कंपनीमार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल लागला. यानंतर नियुक्त करण्यात आलेल्या समितीने पात्र उमेदवारांची दहा गुणांसाठी तोंडी मुलाखत घेतली. याचा निकाल सोमवारी प्रसिद्ध झाला. मात्र निकालाबाबत परीक्षार्र्थींमध्ये संभ्रम आहे. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर केवळ नापास उमेदवारांना गुण कळवण्यात आले.

अंतिम निवड यादी उमेदवारांच्या नावासहित न लावता बैठक क्रमांकानुसार लावण्यात आली आहे. निकाल हा कंपनीमार्फत की बँकेमार्फत दिलेला आहे, हेच समजत नाही. याबाबतची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर अमित पारेकर, जगदीश पाटील, विजयसिंह घोरपडे, सुनील पारेकर, विशाल गायकवाड, विजय पवार, अमित पाटील, मोहन चव्हाण आणि सत्यवान म्हारगुडे यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :bankबँकjobनोकरी