शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

कडेगाव तालुक्यातील १७ गावांवर अन्याय

By admin | Updated: April 12, 2016 00:37 IST

शासनाचे दुर्लक्ष : दुष्काळग्रस्त यादीत समावेश नाही

प्रताप महाडिक -- कडेगाव -तालुक्यातील १७ गावांचा समावेश अद्याप दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत झालेला नाही. या गावांची खरीप हंगामातील पीक उत्पादनाची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्तांच्या सर्व निकषास पात्र असतानाही या गावांवर अन्याय का, असा सवाल शेतकरी करत आहेत.कडेगाव तालुक्यातील सोनहिरा खोऱ्यातील सोनसळ, सोनकिरे, शिरसगाव, पाडळी, आसद, मोहित्यांचे वडगाव, देवराष्ट्रे, रामापूर, कुंभारगाव, शिरगाव, अंबक, चिंचणी या १२ गावांसह वांगी, शेळकबाव, हिंगणगाव (खुर्द), शिवणी, वडियेरायबाग ही गाव दुष्काळग्रस्त यादीत अद्यापही समाविष्ट झालेली नाहीत. कडेगाव तालुक्यातील उर्वरित ३९ गावांना शासनाने टंचाईग्रस्त घोषित करून ८ कोटींची मदत दिली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु वंचित राहिलेली १७ गावे मात्र शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. येथे खरीप नंतर रब्बी हंगामही वाया गेला. ताकारी योजनेचे पाणी येथे मिळत असले, तरी अद्यापही हजारो हेक्टर शेती योजनेच्या कालव्यापेक्षा उंच भागात आहे. यामुळे ही शेती योजनेच्या लाभापासूनही वंचित आहे. सध्या या १७ गावातील बहुतांशी विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. कडेगाव तहसीलदार कार्यालयाकडून खरीप हंगामामध्ये ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांची अंदाजित यादी शासनाकडे हंगामाच्या मध्यावधीच्या दरम्यान दिली होती. यामध्ये या १७ गावांचा समावेश नव्हता. परंतु हंगाम संपल्यावर या गावांची खरीप पीक उत्पादन पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राजकीय नेते लक्ष घालणार?आमदार डॉ. पतंगराव कदम तसेच सत्ताधारी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख या दोन्ही नेत्यांनी लक्ष घालून या गावांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा येथील शेतकरी करत आहेत. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांनी या १७ गावांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. शेकापचे सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी कडेगाव तहसील कार्यालयासमोर काळी गुढी उभा करून या गावांवरील अन्यायाचा निषेध केला आहे.चिंचणीत कमी पाऊसकडेगाव तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद चिंचणी या भागात झाली आहे. तरीही हे गाव दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट नाही. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गावातील खरीप, रब्बी हंगामातील पिके वाळून गेली आहेत.