शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

बेदाणा उधळण थांबवण्यासाठी हवा बाजार समित्यांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST

दत्ता पाटील तासगाव : बाजार समित्यांत होणाऱ्या सौद्यावेळी बेदाण्याची उधळणपट्टी करून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. ...

दत्ता पाटील

तासगाव : बाजार समित्यांत होणाऱ्या सौद्यावेळी बेदाण्याची उधळणपट्टी करून कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्याचा उद्योग राजरोसपणे सुरू आहे. या उधळपट्टीची सगळी माहिती बाजार समित्यांकडे आहे. मात्र, अडत्यांशी असणारे लागेबांधे आणि आर्थिक हितसंबंध यामुळे याविरोधात सर्वांचीच गांधारीची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या बेदाण्यातून अडते पैसे मिळवत असतील, तर तूट हवीच कशाला? असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. यावर सक्षम पर्याय अमलात आणला, तर तुटीची पद्धत बंद होईल. मात्र, त्यासाठी बाजार समित्यांनी सक्षम पुढाकार घ्यायला हवा.

बाजार समित्यांत बेदाणा सौद्यावेळी प्रत्येक बॉक्समधून दोन ते चार किलो बेदाण्याची उधळण होते. उधळलेला बेदाणा संबंधित अडते पुन्हा विक्री करून त्यातून कोट्यवधी रुपये मिळवितात. ‘लोकमत’ला मिळालेल्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना तूट दाखवून एका अडत्याला वर्षाला पंचवीस ते पन्नास लाख रुपये उत्पन्न मिळते.

तुटीतून शेतकऱ्यांना लुटण्याची पद्धत अनेक वर्षांपासून सुरू आहे. तुटीबाबत तक्रार केली, तर अडत्यांकडून पैसे वेळेत दिले जात नाहीत. बाजार समितीत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सत्तेच्या उबीला बसलेले सत्ताधारी शेतकऱ्यांची तक्रार नसल्याचे कारण सांगून कारवाई करत नाहीत. सत्तेतील अनेक बगलबच्च्चांसह अनेक संचालकांची अडत दुकाने आहेत. या अडत दुकानदार आणि व्यापाऱ्यांशी सत्ताधाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळे मुळावर घाव कोणीच घालत नाही. मात्र, बाजार समितीने ठरवले, तर तुटीची पद्धत मुळापासून बंद करणे सहज शक्य आहे.

बाजार समितीतून होणारी लूट आकडेवारीसह चव्हाट्यावर आणल्यानंतर अनेक बेदाणा उत्पादकांनी ‘लोकमत’कडे शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार सांगितले. व्यापाऱ्यांकडून सुरू असलेल्या सावकारीचे अनेक कारनामे आहेत. याविरोधात ‘तूट बंद, लूट बंद’ असा नारा देत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

चौकट :

हवा आहे पर्याय; पण अमलात कोण आणणार?

बेदाणा सौद्यात होणारी लूट थांबवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. सौद्यावेळी उधळलेला बेदाण्यावर शेतकऱ्यांचाच हक्क आहे. मुळातच केवळ माल पाहून पुन्हा तो बॉक्स सील केल्यास तूट होणार नाही. हे शक्य नसल्यास उधळण झालेल्या बेदाण्यावर अडत्यांचा हक्क राहू नये, यासाठी बाजार समितीने ठोस धोरण अमलात आणायला हवे. सौद्यावेळी उधळण झालेला बेदाणा बाजार समितीने ताब्यात घेऊन त्याची विक्री करायला हवी. त्यातून येणारे पैसे संबंधित शेतकऱ्यांना देता येणे शक्य आहे किंवा या पैशांतून बाजार समित्यांना शेतकरी हिताची योजना राबविणेही शक्य आहे. उधळण करून काही फायदाच होत नसेल, तर अडत्यांकडून उधळण आपोआपच थांबू शकते. पर्याय आहेत; पण लुटीत सगळेच भागीदार असल्याने अमलात आणणार कोण? असा प्रश्न आहे.