शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘म्हैसाळ’बाबत नेत्याकडून हीन दर्जाचे राजकारण : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:08 IST

सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठी एकीकडे मी ताकद पणाला लावली असताना, एका नेत्याने योजना बंदच रहावी म्हणून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले होते

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात चुकीची परंपरा पाडू नका

सांगली : म्हैसाळ योजनेच्या आवर्तनासाठी एकीकडे मी ताकद पणाला लावली असताना, एका नेत्याने योजना बंदच रहावी म्हणून अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण केले होते. अशाप्रकारच्या राजकारणाची सांगलीची परंपरा नाही, असे मत खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ते म्हणाले की, माझ्या प्रयत्नावेळी जिल्ह्यातील भाजपसहीत कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या आमदारांनीही योजना सुरू व्हावी म्हणून प्रयत्न केले. आ. सुमनताई पाटीलही या प्रयत्नांना पाठबळ देत होत्या. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे यात राजकारण आणणे चुकीचे होते, मात्र एका राजकीय नेत्याने माझे प्रयत्न यशस्वी होऊ नयेत म्हणून प्रयत्न चालविले होते. त्यांची ही कृष्णकृत्ये अखेर माझ्यासमोर आली. वास्तविक इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण कधीच सांगली जिल्ह्यात झाले नव्हते. आम्हीसुद्धा राजकारणात असल्या गोष्टी कधीच केल्या नाहीत. चुकीची परंपरा कोणीतरी पाडू पहात आहे. परंपरेला हा डाग आहे. निवडणुकीपुरते राजकारण मर्यादित ठेवून लोकांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यायला हवे.ते म्हणाले की, म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मदत केली. एकवेळ माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता, मात्र माझी नाराजी पक्ष किंवा कोणत्या नेत्यावर नव्हती. जलदगतीने निर्णय होत नव्हता म्हणून माझी नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. सध्यस्थितीत कोणतीही नाराजी नाही. योजनेच्या थकीत वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढे शेतकºयांना अत्यंत माफक दरातील बिल भरणे सहज शक्य होईल. त्यामुळे शासनाचा निर्णयावर मी समाधानी आहे.राजीनाम्यामागे राजकारण नव्हते!ज्या जनतेने मला निवडून दिले, त्यांच्यासाठी माझे प्रयत्न यशस्वी होत नसतील तर, पदावर रहायचे कशाला, असा विचार करून नाराजीतून राजीनामा दिला होता. मात्र यामागे माझे कोणतेही राजकारण नव्हते. स्टंटबाजी करून मोठे व्हायचे नाही. लोकांसाठी काही तरी भरीव कार्य करायचे आहे, असे संजयकाका म्हणाले.नेता कोण?योजना बंद रहावी म्हणून प्रयत्न करणारा तो नेता कोण, असा प्रश्न विचारल्यानंतर संजयकाका पाटील म्हणाले की, त्या गोष्टीतून पुन्हा राजकारण होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे कोणाचे नाव घेणार नाही. संजयकाकांचा निशाणा पक्षातीलच एका नेत्यावर असावा, अशी चर्चा आता रंगली आहे.