शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

गोगलगार्इंचा ४०० हेक्टरवर प्रादुर्भाव

By admin | Updated: July 7, 2016 00:19 IST

मिरज पूर्व भागातील स्थिती : उपाययोजनेसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

संजय माने ल्ल टाकळी मिरज पूर्व भागातील सुमारे १५ गावांतील ४०० हेक्टरवर शंखी गोगलगार्इंचा प्रादुर्भाव झाला आहे. गोगलगार्इंच्या उपद्रवाने होणाऱ्या पीक नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कृषी विभागाने गोगलगाय निर्मूलनासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. मिरज पूर्व भागात पावसामुळे पिके जोमात आहेत. मात्र दलदलीने गोगलगार्इंचे प्रमाण वाढले आहे. टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, एरंडोली, मालगावसह पूर्व भागामध्ये द्राक्ष, दोडका, कारली, वांगी, ढबू, फ्लॉवर, भुईमुगाच्या शेंगा, मिरची या पिकांचे गोगलगार्इंकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांचे कोवळे कोंब व सालीसह फळे फस्त केली जात असल्याने संपूर्ण झाड वाळत आहे. द्राक्ष उत्पादकांनाही गोगलगार्इंमुळे फटका बसत आहे. पाच ते सहा फूट उंच असणाऱ्या द्राक्षवेलीवर गोगलगार्इंचा वावर आहे. औषधांचाही या गोगलगार्इंवर परिणाम होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. ओढ्या-नाल्यांच्या परिसरात गोगलगार्इंची संख्या मोठी आहे. गोगलगार्इंवर औषधांची फवारणी केल्यास त्या थोडा वेळ शंखामध्ये लपून बसतात. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही. घरगुती उपाय म्हणून शेतकरी तंबाखूच्या भुकटीचा वापर करीत आहेत. हा उपायही तात्पुरता ठरत आहे. दुसऱ्यादिवशी पुन्हा हजारोंच्या संख्येने गोगलगाई शेतात वावरताना दिसतात. शेतकऱ्यांनी गोगलगाई वेचून पुरून टाकण्याचाही प्रयत्न केला, मात्र तोही अयशस्वी ठरू लागल्याने शेतातील गोगलगार्इंचा बंदोबस्त करायचा कसा?, या चिंतेत शेतकरी आहेत. बंदोबस्तासाठी उपाययोजना सुरू मिरज पूर्व भागातील ४०० हेक्टरवरील तूर, मूग, उडीद, झेंडू, भुईमुगाच्या शेंगा या पिकांवर गोगलगार्इंचा प्रादुर्भाव झाला आहे. गोगलगाय निर्मूलनासाठी एक किलो पोहे अथवा चिरमुऱ्यामध्ये पाव किलो गुळाचे पाणी व ५० ते १०० मि.लि क्लोरोपायरी फस्ट या कीटनाशकाचे मिश्रण तयार करुन गोगलगार्इंचा प्रादुर्भाव वाढलेल्या ठिकाणी सायंकाळच्यावेळी वापर केल्यास गोगलगाय निर्मूलनासाठी मदत होणार असल्याची माहिती मंडल कृषी अधिकारी नंदकुमार मेंढे यांनी दिली. गोगलगार्इंच्या निर्मूलनासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना कराव्यात, यासाठी शुक्रवार, दि. ८ रोजी एरंडोली विठ्ठल मंदिर येथे कृषी सप्ताहानिमित्त कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे डॉ. पांडुरंग मोहिते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.