शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील उद्योजकांचा उद्या बंद

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

औद्योगिक संघटनांचा निर्णय : वीज दरवाढीचा निषेध; अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा

कुपवाड : महावितरण कंपनीने इतर राज्यांच्या तुलनेत केलेल्या दुप्पट दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय आज मिरजेत झालेल्या औद्योगिक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला़ त्याचदिवशी सकाळी ११ वाजता विश्रामबाग चौकातून अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे.महावितरण कंपनीकडून राज्यातील उद्योजकांवर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक दरवाढ केली होती. त्यावेळी उद्योजकांनी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन या होऊ घातलेल्या दरवाढीचा निषेध नोंदविला होता. तसेच याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. तरीही या निषेधाची दखल शासनाने घेतली नाही. त्यांनी ३१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ही वीज दरवाढ प्रचंड असून, इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. या दरवाढीच्या विरोधात राज्यातील उद्योजकांनी ३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार जिल्ह्यातील उद्योजकांनीही आज मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीतही महावितरणने केलेल्या दुप्पट दरवाढीचा निषेध नोंदविला. तसेच शुक्रवारी सांगली व परिसरातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचदिवशी सकाळी विश्रामबाग चौकातून महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याबरोबरच वीज बिलांची होळीही करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतरही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उद्योजकांकडून देण्यात आला आहे. बैठकीमध्ये सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उमेद उद्योग समूहाचे प्रमुख सतीश मालू, कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सेक्रेटरी पांडुरंग रूपनर, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, हेमंत महाबळ, दीपक शिंदे, के. एस. भंडारे, सतीश वाघ, शंकरराव तायशेट्टी, हर्षल खरे, दीपक मर्दा, विजय भोसले, अरविंद जोशी, अशोक भोसले, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे योगेश जोशी, डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रभाताई कुलकर्णी, गणेश निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)भ्रष्टाचार लपविण्यासाठी दरवाढवीजगळती, अकार्यक्षम कारभार व भ्रष्टाचार लपविण्यासाठी ही दरवाढ केली आहे. इतर राज्यात कार्यक्षम कारभार सुरू असल्यामुळे तेथे कमी दराने वीज मिळते. महाराष्ट्रात का दर कमी होत नाहीत. यांची अकार्यक्षमता ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. या दरवाढीमुळे उद्योजकांचे कंबरडेच मोडणार आहे, असे मत सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके यांनी व्यक्त केले.