शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील उद्योजकांचा उद्या बंद

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

औद्योगिक संघटनांचा निर्णय : वीज दरवाढीचा निषेध; अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा

कुपवाड : महावितरण कंपनीने इतर राज्यांच्या तुलनेत केलेल्या दुप्पट दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय आज मिरजेत झालेल्या औद्योगिक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला़ त्याचदिवशी सकाळी ११ वाजता विश्रामबाग चौकातून अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे.महावितरण कंपनीकडून राज्यातील उद्योजकांवर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक दरवाढ केली होती. त्यावेळी उद्योजकांनी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन या होऊ घातलेल्या दरवाढीचा निषेध नोंदविला होता. तसेच याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. तरीही या निषेधाची दखल शासनाने घेतली नाही. त्यांनी ३१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ही वीज दरवाढ प्रचंड असून, इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. या दरवाढीच्या विरोधात राज्यातील उद्योजकांनी ३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार जिल्ह्यातील उद्योजकांनीही आज मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीतही महावितरणने केलेल्या दुप्पट दरवाढीचा निषेध नोंदविला. तसेच शुक्रवारी सांगली व परिसरातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचदिवशी सकाळी विश्रामबाग चौकातून महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याबरोबरच वीज बिलांची होळीही करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतरही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उद्योजकांकडून देण्यात आला आहे. बैठकीमध्ये सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उमेद उद्योग समूहाचे प्रमुख सतीश मालू, कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सेक्रेटरी पांडुरंग रूपनर, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, हेमंत महाबळ, दीपक शिंदे, के. एस. भंडारे, सतीश वाघ, शंकरराव तायशेट्टी, हर्षल खरे, दीपक मर्दा, विजय भोसले, अरविंद जोशी, अशोक भोसले, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे योगेश जोशी, डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रभाताई कुलकर्णी, गणेश निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)भ्रष्टाचार लपविण्यासाठी दरवाढवीजगळती, अकार्यक्षम कारभार व भ्रष्टाचार लपविण्यासाठी ही दरवाढ केली आहे. इतर राज्यात कार्यक्षम कारभार सुरू असल्यामुळे तेथे कमी दराने वीज मिळते. महाराष्ट्रात का दर कमी होत नाहीत. यांची अकार्यक्षमता ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. या दरवाढीमुळे उद्योजकांचे कंबरडेच मोडणार आहे, असे मत सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके यांनी व्यक्त केले.